बुधवार, 2 सितंबर 2020

त्रिपिटक म्हणजे हिंदू विचारांची भेसळ


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमीवर "महायानी" भिक्षु चंद्रमणी यांनी "त्रिसरण आणि पंचशील" दिले. हे विचार बुद्धाचे म्हणायचे कि भिक्षूंचे? ते बुद्धाचे म्हटले तर ते नंतर त्रिपिटकात का घुसडण्यात आले? जुण्या चार निकायात होते का? “त्रिशरण आणि पंचशील” म्हणजे “धम्म” का? परंतु बाबासाहेबांनी त्याच्या जोडीला नंतर “२२ प्रतिज्ञा” दिल्या. त्या प्रासंगिक होत्या. त्यात सुद्धा ‘बुद्धाला’ त्यांच्या ‘धम्माला’ शरण जाण्याच्या प्रतिज्ञा आहेत पण ‘संघाला’ शरण जाण्याची एकही प्रतिज्ञा नाही हे विशेष आहे. या “२२ प्रतिज्ञा”त हिंदू देवी-देवता व त्यांचे अवतार, उपासना व त्यांच्या रूढींना नकार म्हणजे धर्मांतर आहे तर आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता आणि पंचशील यांचा स्विकार आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ५ जुलै १९४१ ला सायंकाळी मुंबईतील ‘सिद्धार्थ कालेजा’तील सभेत मनोगत व्यक्त केले, “बौद्ध धम्म हा तर्कावर अधिष्ठित आहे. या उलट हिंदुधर्माला तर्काची ओळख नाही. त्यांनी उदाहरणा दाखल सत्याचे विश्लेषण केले नाही. आपल्या इंद्रियांपैकी कोणत्याही एका अथवा अधिक इंद्रियाने एखाद्या वस्तूविषयी वा भावना विषयी साक्ष दिली तरच तेथे सत्याचा आविष्कार होतो, असे गौतम बुद्धाचे म्हणणे आहे. ज्या प्रसंगी इंद्रियाची साक्ष काढता येत नसेल त्या प्रसंगी सत्याऐवजी काहीतरी गुढ असल्याचे सांगण्यात येते. निस्वार्थपणे कार्य करीत राहावे हे बुद्धाचे मत असेल तर कोणीही ते कार्य का करावे? बुद्धाचे स्वतःचे मुळचे तत्वज्ञान व बुद्धाच्या मरणानंतर त्यांच्या शिष्यांनी भरती केलेले तत्वज्ञान यातील फरक प्रथम लक्षात घेतला पाहिजे, ज्याला इंग्रजीत Acquisitiveness (जास्त आधासिपणा) म्हणतात, तो दुर्गुण माणसांमध्ये जास्त असू नये, एवढेच बुद्धाचे म्हणणे होते.” (जनता दि.- ९ जुलै १९४९)


तसेच दिनांक ८ मे १९५५ ला नरेपार्क, मुंबई येथे भारतीय बुद्धजन समितीच्या वतीने बुद्धजयंती पार पाडण्यात आली तेथे बाबासाहेब म्हणाले, “बौद्ध धम्मामध्ये दोन (हीनयान व महायान) प्रकारचे लोक आहेत. या धम्माचे संशोधन करण्याचा माझा मार्ग नाही. माझे मुख्य कार्य प्रचार करण्याचे आहे. आम्हाला लोकांना बुद्धिष्ट करून घ्यावयाचे आहे, हेच माझे कर्तव्य होय.” (धम्मचक्र प्रवर्तनाय, संकलन- प्रदीप गायकवाड, पृष्ठ- २१४) त्यामुळे संशोधन न करता जो धम्म दिल्या गेला, त्यात हिंदू विचारांची भेसळ राहिली आहे. तिला नाली काढून, दूर करून शुद्ध, आसील पाणी करण्याची त्यांची ईच्छा होती पण शरीर साथ देत नसल्याची सूचना त्यांनी वेळोवेळी दिली होती. एवढेच नाही तर “हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती” या मथळ्याखाली सन १९५० मध्ये बाबासाहेबांनी आपले विचार मांडले ते बघणे अति आवश्यक आहे, “ज्या मजकुराच्या आधारावर वादविवाद करावयाचा तो मजकूर मूळचाच आणि सत्य आहे कि तो नंतरच्या भिक्षूंनी घुसडून दिलेला आहे, हे ठरविणे, हा मुद्याचा प्रश्न आहे.


“बुद्धाच्या शिकवनुकीतील प्रमुख अंगे कोणती? सुत्तपिटक सध्या कोणत्या अवस्थेत आहे? बुद्धाच्या शिकवनुकीशी असबंध वाटणाऱ्या कल्पना आणि ब्राह्मणी विचारसरणीच्या पौराणिक कथा ‘बुद्ध देवा’च्या नावाखाली त्यात घुसडल्या आहेत. ब्राह्मणी मठसंप्रदायातील राहणीची अवास्तव वर्णने त्यात घालण्यात आलेली आहेत. ती राहणीच आदर्शमय होय, ती बुद्धधम्माची आदरणीय आचारपद्धती होय, हे सर्व भाषविण्यात आलेले आहे. सुत्त पिटकाचे सध्याचे विद्रूप आणि ओंगळ रूप पाहून ‘ऱ्हीस डेविड्स’ यांना आश्चर्याचा धक्काच बसला.... सुत्त पिटकाच्या पानापानात खरा गौतम दिसत नाही.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, खंड- ६, पृष्ठ- १४८, संकलक- मा. फ. गांजरे, नागपूर) ”असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. त्या भेसळीचा परिणाम काय झाला ते आपण पाहूया.

महायानी साहित्य विश्वास कर्णयायोग्य नाही, ज़री ते त्रिपिटक या ग्रंथ भंडरात असले तरी त्याची मीमांसा करने आवश्यक आहें, ते न करता बुडिज़म चा प्रचार केल्यास *बहुजन हित-सुख* करता येनार नाही, माझ्या अभ्यासत फ़क्त आर्य अष्टांगिक मार्गा शिवाय दूसरे कोणते ही विचार धम्म उद्धेश पूर्ति करण्यास मदत करु शकत नाही_ पांच शील, १० पारमिता, विपस्सना, ध्यान - समाधि, पूजा-पाठ, बोधिसत्व कल्पना, पूर्वजन्म-पुनर्जन्म ही विषय बुडिज़म पासुन भटकनती करण्या साठी निर्माण करन्यात आले आहेत, त्या पासुन सावध राहने / दूर राहने जनतेच्या फ़ायद्याचे आहें।

धम्म : भगवान, ध्यान, समाधी आणि विपस्सना

भारतात विपस्सना विधि ही बुद्धाच्या आधीपासूनच सुरु होती. “आलार कालाम” नावाचे ऋषी तिचे प्रवर्तक होते. त्यांच्या आश्रमात गौतमाने ते शिक्षण घेतले आणि तिला सोडून पण दिले. कारण ते टाकावू वाटले. व्यवहारिक वाटले नाही. आजमात्र त्याच टाकावू “समाधीला भिक्षु लोक बळी पडत असतील आणि त्यांचा प्रचार करीत असतील तर त्यांच्या या कृत्याला धम्म प्रचार म्हणायचे का? आर्य अष्टांगिक मार्गात “सम्यक समाधी” म्हणून एक मार्ग आहे. तो “समाधी” नव्हे तर “सम्यक समाधी” आहे. समाधी हा धर्मविचार आहे. धर्म हिंदू, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम वगैरे लोकांचा आहे तर धम्म हा बुद्धाचा, बौद्धांसाठी आहे. धम्म हा धर्मापासून वेगळा आहे. समाधी, तंद्री, प्राणायाम हा मार्ग बौद्धांचा नव्हे तर हिंदूंचा आहे. भिक्षु बिचारे गुरूने जे सांगितले ते मुकाट्याने ऐकणारे आज्ञाधारी शिष्य. गुरु आंधळा तर शिष्यही आंधळा.


विपस्सना म्हणजे महान तत्वज्ञान का? त्याचा वर्ण, जाती व्यवस्था उच्चाटनासाठी किंवा "आदर्श लोकशाही"च्या निर्मितीसाठी फायदा होतो का? सर्दी-पड्शासारखे रोग तर साध्या हळदीच्या चाय पिल्याने पण दुरुस्त होतात. त्यासाठी दररोज विपस्सनेचा छंद का करावा? वि + पस्सना (पस्स म्हणजे पहा) अर्थात विशिष्ट + पाहणे. याचा अर्थ विशिष्ट दृष्टीने, पद्धतीने पाहणे. विशिष्ट दृष्टी म्हणजे कोणती दृष्टी? श्वास नाकातून शरीरात जातांना त्यावर लक्ष ठेवणे, त्याला किती वेळ रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करणे व ते बाहेर सोडतांना त्यावर लक्ष केंद्रित करणे या पद्धतीने जीवनातील वा समाजातील कोणते प्रश्न सुटू शकतात? श्वासाचा आणि बुद्धीचा काही संबंध आहे का? सर्व अनित्य असतांना चित्त स्थिर कसे होऊ शकेल? चित्ताला स्थिर करण्याचा उद्धेश काय?


डोळे लावल्याने शांती मिळते कि डोळ्या समोरील प्रश्नांच्या सोडवणुकीतून शांती मिळते? त्यामुळे सामाजिक परिवर्तन शक्य आहे का? महायानी विचारांच्या हिंदू धर्माचा पगडा इंजिनियर पदावर कार्यरत असलेल्या लोकांवर होतो तेव्हा त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टी आहे म्हणायचे का? जे ज्ञान बहुजनांच्या विकासाला पूरक नाही ते कसे सामाजिक विज्ञान मानावे? आंबेडकरी बौद्ध भिक्षुंवर सुद्धा आहे तर गृहस्थांवर का नसणार? महायानाला बुद्ध विचार मानायचे का? बुद्धाच्या धम्मात समाधी असताना वेगळ्या समाधीची, विपस्सनेची गरज का? बौद्ध लोक धम्माच्या नावावर हिंदू धर्माचे पालन करीत राहिले तर हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार होईल पण धम्माचा होणार नाही. बौद्ध लोक जर तर्कज्ञानी नसतील तर त्यांना कोणीही ठकवू शकतात, जे ठकतात ते दुःखी होतात व ठकवणारे सुखी होतात. स्वार्थी लोकांच्या ठकवेगीरीतून बाहेर पडल्यासच कल्याण आहे, अन्यथा दुख, शोषण आहे.


“प्रज्ञा- शील- समाधी” हा शब्दप्रयोग महायानी भिक्षूंनी धम्म प्रचारात वापरला आहे. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, शील म्हणजे सदाचार व समाधी म्हणजे तंद्री, एकाग्रता, ह्यात कुठेतरी “सम्यक” शब्द वा विचार आला आहे का? सम्यक म्हणजे उचित, योग्य, आदर्श असा अर्थ घेतला तर भिक्षु आपापल्या मताप्रमाणे त्याचा अर्थ लावून धम्म प्रचार करताना दिसतात पण बुद्धाच्या “आर्य अष्टांगिक मार्गा”चा उद्देश जगाची पुनर्रचना करण्याचा आहे. त्यासाठी भिक्षु “प्रज्ञा-शील-समाधी” तून कोणता बोध देतात? ज्या “प्रज्ञा- शील- समाधी”च्या विचारात “सम्यक” शब्दालाच वजा केल्या जात असेल त्याचा अर्थ धम्माभिप्रेत, धम्माच्या उद्देशाला पूरक सांगितला जात आहे, असे कसे म्हणता येईल?


“अत्त दीपो भव” यांचा अर्थ “स्वयं प्रकाशित व्हा”. “स्वतःच्या दीपक स्वताच बना,” असा सांगितला जातो. याचा दुसरा अर्थ हा होतो कि दुसऱ्याचे ऐकू नका, मानु नका. वनस्पतींना आपण स्वयंपोशी म्हणतो तरी त्यांचा आधार सूर्य, पाणी, जमीन व हवा आहे कि नाही? स्वयंपूर्ण कोण ते मानव आहेत? मानव वनस्पतींवर व प्राण्यांवर अवलंबून आहेत. ते मानवांच्या पूर्व बुद्धीवर अवलंबून आहे. ते स्वयंपूर्ण कसे असू शकतात? बुद्धाने कोणालाही “सर्वज्ञ” समजले नाही, याचा अर्थ कितीदाही “अत्त-दीपो-भव” म्हणत गेले तरी बुद्धितील अंधार घालवता येणार नाही. प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नव्हता व नाही. म्हणूनच तो एकाकी जीवन जगण्याऐवजी समाज, समूह करून राहतो. दुसऱ्याचा जळत्या दिव्याच्या ज्योतीचा आधार घेवून आपली ज्योत पेटविली जात असेल तर त्याला “अत्त-दीपो-भव” कसे म्हणता येईल?


‘या आणि पहा, आपल्या डोळ्यांनी पहा, काय पहा? स्वतः अनुभव घ्या.’ कसला अनुभव? अनुभवण्याचा उद्देश काय? श्वास शरीरात जात आहे व येत आहे, हे प्रत्यक्ष विपस्सना, ध्यान, झेनाचे नियम पाळून अनुभवा. असा प्रचार हजारो वर्षापासून चालू आहे पण त्याचा जग बदल साठी फायदा झाला का? हा अनुभव ब्रम्हदेशातील महायानी भिक्षु-भिक्षूंनी हजारो वर्षापासून घेतला तरी आज त्यांना रस्त्यावर उतरून मोर्चा का काढावा लागतो? त्यांच्यावर लाठीचार हल्ला होतो? त्यांच्या हातात बेड्या घालून त्यांची मारहाण का होत आहे? महायानी “अत्त-दीपो-भव” च्या विचारांनी कोणत्या उद्दिष्टाला गाठले आहे?


भगवान कोणाला म्हणावे? बुद्धाला “भगवंत” व “भगवान” म्हणणे म्हणजे सुद्धा मूर्खपणा आहे. हे शब्द महावीराना, रामाला, कृष्णाला सुद्धा वापरले जातात. त्याच अर्थाने बुद्धाला सुद्धा वापरतात. भगवान म्हणजे काय? भग म्हणजे भोक व वान म्हणजे शरीर, रूप, काया. भोकातून निघालेली काया म्हणजे भगवान. कोणता आदर्श यात दडला आहे? काही भिक्षु म्हणतात संपूर्ण तृष्णेला परतवून लावणे, त्यागणे, सोडणे म्हणजे भगवान. भग म्हणजे भागवून, परतवून लावणे आणि वान म्हणजे वांट (want). वांट म्हणजे इच्छा, तृष्णा. संपूर्ण तृष्णा त्याग म्हणजे भगवान. भगवान चा तर्क चुकीच्या कसा आहे? “वान” म्हणजे इंग्रजीतील “want” कसा होतो? भगवान मधील “भग”चा मराठी अर्थ आणि “वान” चा इंग्रजी अर्थ घेवून “भगवान” चे समर्थन कशासाठी हवे?


भगवान जर आदरवाचक शब्द असेल तर “भगवान बुद्ध” का म्हणावे? बुद्धाला भगवान म्हणून त्यांना “परमात्मा” बनवण्याचे प्रयत्न आहेत. त्यांना आदरच द्यायचा आहे तर बुद्धाच्या नावाआधी महामानव, श्री. श्रीमान, जी, आदरणीय, किंवा माननीय का लावले जात नाही? जे शब्द हिंदू लोक राम, कृष्ण, शिव, शंकर, विष्णू, रजनीश इत्यादी ईश्वरांच्या नावासमोर लावतात त्या शब्दाला बुद्धाच्या पुढे का लावण्यात येत आहे? जर हा शब्द एवढा आदरवाचक होता तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “द बुद्ध अंड हिज धम्म” या महान ग्रंथात “द” ऐवजी ते “भगवान” असे शीर्षक का करू शकले नाहीत? मात्र एका प्रसिद्ध भिक्षूने त्या ग्रंथाचे हिंदी अनुवाद करतांना “भगवान बुद्ध और उनका धर्म” असा करण्यात आला. भिक्षु कोणत्या विचारांचे आहेत, बुद्धाच्या कि हिंदूंच्या? पालीतील “भगवंतु,” “भगवा” म्हणजे “भगवान” नाही. संस्कृत भाषेतील “भगवान” शब्दाची ही उचलेगीरी नसेल का? अनीश्वरवादी धम्माला ईश्वरवादी बनवून संपवण्याचा हा कुटील डाव आहे. (बुद्ध धम्म : भ्रांतिनिवारण, लेखक- डॉ. सुरेंद्र अज्ञात, बुद्धिष्ट पब्लिकेशन हाउस)


भगवान हा भारतीय भाषेतील शब्द आहे तेव्हा त्याचा अर्थ लावतांना त्यातील काही शब्दांनाच इंग्रजी अर्थ लावून नंतर त्याचे भारतीय अर्थात रुपांतर करण्याचा आटापिटा भिक्षु का करतात? कारण त्यांना धम्मात अंध:श्रद्धा पसरवायची आहे. त्यामुळे धम्म लयास गेला तरी त्याची त्यांना फिकीर नाही, फक्त भिक्षूंची भिक्षुकी चालली म्हणजे झाले. ह्या अतार्किक विचारांनाच बुद्धाने अज्ञान म्हटले आहे. ज्ञानाला विज्ञानी बनविण्यासाठी तर्कज्ञान षडायतनाने घ्यावे लागेल. ‘भगवंत’ आणि ‘भगवान’ ह्या शब्दांला बुद्धाच्या वैज्ञानिक धम्मात मुळीच वाव देवू नये. अन्यथा “बुद्ध देवा” तुझी ज्ञानगंगा सुरु होईल व हिंदू व बौद्ध धम्मात अंतर राहणार नाही, धम्म समजवायला कठीण जाईल. समजावता येणार नाही आणि धम्माचा लोप होईल, पाली सुत्तातले भगवत्तो म्हणजे भगवान नव्हे, तर भगवे वस्त्र, चिवरधारी बुद्ध असा आहे. ही उचलेगिरी महायानी भिक्षूंची ही उचलेगिरी केव्हापर्यंत चालवायची? याला विज्ञान म्हणावे कि अज्ञान? भिक्षूंच्या फालतू व अवैज्ञानिक विचारांची चौकशी झालीच पाहिजे.


गुरु-शिष्य परंपरेतून अनेक वाईट, अवैज्ञातून विचार बौद्ध धम्मातील त्रिपिटकात समाविष्ट आहेत. त्याचा आधार घेवून “द बुद्ध अंड हिज धम्म” हा ग्रंथ निर्माण झाला. ज्याचे आधारच गुरु शिष्य परंपरेतील आहेत, त्या ग्रंथाला “बहुजन हिताय- बहुजन सुखाय” ग्रंथ म्हणता येईल का? त्रिपिटक हे धम्माचे संशोधित विचार दाखविणारे ग्रंथ नाहीत. गुरु-शिष्य परंपरेत शिष्य नेहमी गुरूच्या विचारांचा आदर करतो. त्याने खोटेही विचार सांगितले तरी तो त्यावर प्रश्न करीत नाही. आज बाबासाहेब आंबेडकर हे आमचे केवळ पिताच राहिले नाहीत तर गुरु सुद्धा बनले आहेत. त्यांना अंध:भक्त नको होते. पण आज त्यांच्या धम्मात डोळस किती आहेत? त्यांनी जे शिकविले ते आपण डोळे झाकून स्वीकारले? याला विज्ञान म्हणावे का? जे स्वीकारले ते समझले कि नाही हा गौण प्रश्न. जे स्वीकारले ते समझले नसेल अशांना इतरांना समजावण्याची जबाबदारी दिली जात असेल तर समझवतांना तो काय समझवणार? आणि ऐकणाऱ्याला धम्म कसा व कोणता समझला असेल? याची आपण कधी परीक्षा घेतली का?

भारतीय संविधानाची जडन-घडन

भारतात हजारो वर्षापासून वर्णव्यवस्था आहेसुरुवातीला त्यात तीन वर्ण होतेनंतर हळूहळू चवथा वर्ण अस्तित्वात आलावर्णव्यवस्थेची निर्मिती ईश्वराने नाहीतर स्वार्थीऐतखाऊनिर्लज्यवैज्ञानिकअंध:श्रद्धाळू पुजारी ब्राम्हणांनी केलीज्यांचा देव ब्रम्हा असे ते “ब्राम्हण,” या वर्णाला शिक्षक  पुजाऱ्याचे काम करून “दान” दक्षिणा म्हणून मिळत असेज्यांचा देव विष्णू असे ते “क्षत्रिय,” ज्यांच्यावर शासनातून सुरक्षा करण्याची जबाबदारी होती ज्यांच्या बदल्यात त्यांना “कर” वसूल करण्याचा अधिकार असेज्यांचा देव महेश असे ते “वैश्य”, ज्यांना व्यापार करून “नफा” कमावण्याचे स्वातंत्र्य असे तर ज्यांचा देव शंकर ते “शुद्र” ज्यांच्या वाट्याला ब्राम्हणक्षत्रिय तथा वैश्य या तिन्ही वर्नियांची लोकांची “सेवा” करण्याची जबाबदारी असे.

मौर्य राजा “ब्रहदरथ” म्हणजे बौद्ध सम्राट अशोकाच्या नातू (अशोक विजयादशमी : धम्मचक्र प्रवर्तन दिन –एनजीकांबळेपृष्ठ-१०यांचा त्यांच्याच राज्यातील “पुष्यमित्र शुंग” या ब्राह्मण सेनापतीने कपट करून वध केला  जुण्या वर्ण व्यवस्थेची निनिर्मिती करण्यासाठी काम “मनु” नावाच्या ऋषिवर सोपविण्यात आलेत्यांनी “मनुस्मृती” लिहून वर्णव्यवस्थेला पुनर्जीवित करण्यासाठी राजा सुधांशुच्या राजाश्रयातून तिच्या अंमलबजावणीची सुरुवात करण्यात आलीअसंख्य बौद्ध भिक्षूंची हत्या करण्यात आलीधम्म प्रचाराला आला घालण्यात आलाअनेक भिक्षुणी  भिक्षु यांनी देश-विदेशात पलायन केलेजे लोक बुद्ध तथा त्यांच्या धम्माची उपासना करीत होते अशांना “अस्पृश्य” करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केलेब्राह्मण बुद्धाला  त्यांच्या भिक्षु संघाला शत्रू समजू लागलेबौद्धांच्या संपत्तीवरविहारांवर बळजबरीने अतिक्रमण झाले.

शुद्रपशु ढोल और नारीयह सब ताडन के अधिकारी” असा हुकुम काढणारी “मनुस्मृती” लोकांच्या मनावर हजारो वर्षे राज्य करीत होती.“शुद्र आणि स्त्रियायांना “बहुसंख्याक हिन्दु” असून सुद्धा त्यांना शिक्षण आणि संपत्ती पासून वंचित ठेवण्यात आलेज्या-ज्या लोकांनी वर्णव्यवस्थेला सह देण्याचा प्रयत्न केला त्यांना “अस्पृश्य” नावाची अमानवीय उपाधी बहाल करण्यात आलीहिंदुधर्माच्या दृष्टीने तो पाचवा वर्ण ठरलाभारतात मुस्लिमांचे आक्रमण झाले त्यात हिंदू राजे पराभूत झालेत्यांनी हिंदूंच्या मंदिरांची दुर्दशा केलीपरंतु हिंदुवर आले असता आले असता सुद्धा काळी ३३ कोठी देवांपैकी एकही देव-देवी तथा “ब्रम्ह” देव सुद्धा औतरित होवू सकला नाही.

आम्ही ब्राह्मण-ब्राह्मणआमचे सोयरे मुसलमान” अशी महाराष्ट्रात म्हण आहेकारण हिंदूंनी युद्ध करण्याऐवजी मुस्लिमांचे मांडलिक होणे पसंद केलेवर्ण-व्यवस्तेच्या -व्यवहारिक मुर्खपणाच्या विचारामुळे सामान्य लोकं देवभोळे म्हणजे मानसिक रोगीपरावलंबी झालेहिंदू प्रत्येक संकट समयी आरतीपूजा-अर्चा करीत राहिलेभारतात इंग्रज आलेमुस्लीम आलेडच आलेपोर्तुगीज आलेया सर्वासमोर हिंदुनी सरनागती पत्करली  आरती ओवाळत बसलेइंग्रज भारतात व्यापार करायला आलेत्यांनी आपल्या सोबत ख्रिश्चन धर्म आणलामंदिरमज्जीदगुरुद्वारागिरजाघर यांच्या बाजूला चर्च ही बनत गेलेपरंतु माणसाला माणूस समजण्या ऐवजी “हैवान” समजण्याची प्रथा सुरूच राहिली.

विविधतेत एकता शोधण्याचा एकता शोधून सुद्धा सापडली नाही तरी आजही विविधतेला ध्येय समजून राष्ट्रीय हितांना तिलांजली दिल्या जात आहेअशी विविधता कोणत्या कामाची जी जाती-धर्माच्या बंधनामुळे आपल्याच देशातील लोकांना बेठी व्यवहारापासून दूर ठेवण्यात येत आहेइंग्रजी ख्रिस्चन धर्माच्या वाढत्या प्रभावाला पाहून हिंदुधर्म भारतातून समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही या भीतीपोठी त्यांनी इंग्रजी शासनाचा विरोध सुरु केलासन १८५७ ला “मंगल पांडे” नावाच्या ब्राम्हण सैनिकाने हिंदूंच्या “धार्मिक भावना” दु:खावल्या जात आहेत या सबबीखाली आवाज उठवलापुढे भारतीय स्वातंत्रतेच्या मागणीला सुरुवात झालीकाहींनी धर्माच्या आड राहून राजकारणात जीव ओतला तर काहींनी हिंदुधर्माच्या सुधारणेवर जोर दिला.

सन १८५७ ला पुण्यात इंग्रजी सरकारातील न्यायमूर्ती रानडे यांनी जोतीराव फुलेगोपाळ गणेश आगरकर इत्यादी धर्मसुधाराकांच्या माध्यमातून हिंदुधर्म सुधारणा परिषद बोलावलीहिंदुनी इंग्रजांकडून झालेला धार्मिक अन्याय दूर करण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे त्या सोबतच अस्पृश्य हिंदूवर स्पृश्य हिंदू कडून होत असलेला अन्याय नष्ट केला पाहिजेहिंदू धर्मातील -वैज्ञांनिकजुन्या-अनावश्यक चालीरीतींना झुगारून देण्याची गरज आहेअसा एक बुद्धीवन्ताचा मतप्रवाह सुरु झालाराजकीय सुधारने सोबातच धार्मिक सुधारणा  संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी वाढत गेली.

मध्य-प्रदेशात सन १८९१ ला इंग्रजांच्या “महु मिलिटरी कॉलोनी “भीमराव” आंबेडकरांचा जन्म झालात्यांचे वडील इंग्रजी सैन्यात सुभेदार होतेवडिलांच्या निवृत्ती नंतर ते महाराष्ट्रात साताऱ्याला आलेतळ्याचा बांधकामावर मजुरांचा पगार वाटप करण्यासाठी रामजीला काम मिळालेपरिवार मोठा  मिळकत कमीपण अशाही स्थितीत त्यांनी मुलांना शिक्षण द्यायला सुरुवात केलीभीमरावांच्या बालमनावर लहानपणापासूनच अस्पृश्यतेचे  गरीबीचे चटके बसत गेलेत्यांच्या मनात हिंदुधर्मातील अस्पृश्यतेबद्दल तिरस्कार वाढत गेलाइंग्रजी राजवट जेवढी जुलमी नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त जुलमी हिंदुधर्माच्या चालीरीती वाटत होत्याहिंदू आपल्याच धर्मातील लोकांवर अन्याय-अत्याचार करीत आहेत त्याचे कारण बाबासाहेबांनी हेरलेहिंदुधर्माची मुळे कापण्यासाठी अहोरात्र अभ्यास केला.

इंग्रजाच्या राजकीय हुकुमशाही विरुद्ध संघर्ष करतांनाच बाबासाहेबांनी हिंदुधर्माच्या सुधारणेवर अधिक जोर दिलाकाळाराम मंदिराचे दरवाजे ठोठावलेहिंदुधर्माचे ठेकेदार ब्राह्मण  त्यांची ब्राह्मणशाही म्हणजे हिंदुधर्म असून तो जोपर्यंत राहील तोपर्यंत भारतीय राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही असा त्यांचा ठाम विश्वास बनलाब्राह्मणशाही  इंग्रजशाही संपविण्यासाठी अधिकाधिक  आवश्यक ते शिक्षण घेणे गरजेचे होते म्हणून त्यांनी ब्राह्मणांना लाज्विता येईल एवढी विद्वत्ता निर्माण करून हिंदुधर्माविरुद्ध बंड करण्यासाठी “समता सैनिक दलाची निर्मिती केलीअश्पृश्य हिंदुसाठी इंग्रजांकडून राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक  आर्थिक स्वतंत्र हवे होतेमात्र कांग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला तरीही हिंदू  मुस्लीम पुढाऱ्यांची उपस्थिती भरपूर होती.

बाबासाहेबांनी अस्पृश्य हिंदूंना ब्राह्मणशाही विरुद्ध जागविण्यासाठी वृत्तपत्रे चालवलीसभासंमेलनेसत्याग्रहनिवेदने  आंदोलनांचा वापर केलाहिंदुधर्मातील क्रूर अस्पृश्यतेच्या प्रथेविरुद्ध गोलमेज परिषदेत प्रभावीपणे विश्वव्यापी रणशिंग फुंकलेइंग्रज सरकारच्या डोक्यावर ह्या प्रथेविरोधात उचित पाहुल  उचलल्यामुळे सुधारणा  करण्याचे खापर फोडलेतेव्हा हिंदुधर्मात अस्पृश्य हिंदू  स्पृश्य हिंदू असे दोन गट निर्माण झाल्याचे सिद्ध झालेहिंदू नेते घाबरले.

डॉभीमराव आंबेडकर सुद्धा बॉरिष्टर जिन्हा प्रमाणेच अलग भारताचा तुकडा मागू शकतातअशी भीती हिंदूंच्या मनात होतीजर तसे झाले असते तर हिंदू ब्राह्मण गांधीचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही अशी दाट शंका वास करीत होतीम्हणून गांधीने दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृश्य हिंदूंच्या मागण्यांना विरोध केलासामाजिक  आर्थिक स्वातंत्र्याचा मुद्धा हा आमचा आपसी हिंदु धर्मांतर्गत मुद्धा आहेअसे म्हणून इंग्रजांना आमरण उपोषण करण्याची धमकी दिलीगांधीने भारतात अधिक धुमाकूळ घालू नये म्हणून गांधीला येरवडा जेल मध्य बंद केलेमात्र गांधीने तिथेच आमरण उपोषण सुरु केले.

वर्णवादी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कांग्रेसचा मोहनदास गांधी (वैश्यहा नेता “संत” बनून बळीचा बकरा बनलापुण्याच्या येरवडा तुरुंगात अस्पृश्य हिंदूंच्या हक्कांच्या विरोधात दिनांक २०--१९३२ ला स्पृश्य हिंदू मोहनचंद गांधीने मरण व्रत धरलेस्पृश्य हिंदूंनी बाबासाहेबांची मनधरणी करण्यासाठी धावधूप सुरु केलीते गांधीचे प्राण वाचविण्याकरिता नव्हेतर हिंदुधर्माचे तुकडे होऊ नये म्हणूनबाबासाहेबांना जातीय वाटाघाटी करण्यासाठी स्पृश्य हिंदूं नेत्यांनी अस्पृश्य हिंदू नेत्याजवळ लोटांगण घालायला सुरुवात केले-स्पृश्य हिंदूंसोबत धार्मिक वाटाघाटी करण्यासाठी स्पृश्य हिंदूंनी “पुणे-करार” केलातो दिवस २४ सप्टेंबर १९३२ होताया दिवसाला बाबासाहेबांनी अस्पृश्याचा “मुक्तीदिन” म्हणून पाळण्याची सूचना केली होती.

हजारो वर्षापासून चालत आलेली हि अमानवीय प्रथा जी शिवाजी महाराजाला ही संपविता आली नाही ती संपवनारा तो दिवस होतापुणे कराराच्या त्या क्षणाला बाबासाहेव सुवर्णमध्य समजत होतेयातून स्वतंत्र भारतात अस्पृश्य हिंदूसाठी बहुमूल्य सुविधासंधी आणि अधिकार देण्याची हमी स्पृश्य हिंदुच्या ठेकेदारांनी म्हणजे ब्राह्मणांनी मजबुरीने का असेना दिलीज्यांना  विचारता कोणतेही त्यांच्या अहितांचे निर्णय घेण्यात येत होते त्यांच्या मतांना एवढे महत्व प्राप्त झाले कि ते भारतीय स्वातंत्र्यसाठी महत्वाचे ठरलेया कराराची प्रत इंग्रज सरकारला पाठविण्यात आली तेव्हा कुठे भारताच्या स्वातंत्र्याची दरवाजे उघडी झालीत.

सन १९४६ ला तत्कालीन स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉराजेन्द्रप्रसाद आणि प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक ठराव पाठवलात्यात “राज्य-समाजवादी” सांसदीय सार्वभौम लोकशाही निर्माण करण्यासाठी भावी भारताचे संविधान कसे असावेयाची तरतूद विशद करण्यात आली होतीहाच ठराव नंतर “स्टेट एंड माएनॉरिटीज” या मथळ्याखाली प्रकाशित करण्यात आलाजर तो कांग्रेसने पास केला असता तर राजकीय लोकशाही अंतर्गतच “आर्थिक लोकशाही” देणारी जगातील पहिली  “आदर्श राज्यघटना” म्हणून भारतीय संविधानाचा गौरव झाला असतात्यातून भारतात “एक व्यक्ती-एक मतां” सोबतच “एक व्यक्तिएक मूल्य” सुद्धा निर्माण झाले असतेइथे कोणीही मजूर नसता  कोणीही मालक नसताराव  रंक एक झटक्यात संपले असतेसर्व लोक केवळ राजकीयच नाही तर आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा समान असतेभारतातील सर्व शेतीचेउद्योगांचे तथा विम्याचे राष्ट्रीयकरण झाले असते.

राज्य समाजवादी” धोरणातून शेती राष्ट्राच्या अधिन असतीशेटजींची जमीनदारी आणि खोत पद्धत संपली असतीपुंजीवादाला आळा बसला असतामोठे उद्योग जे टाटा-बाटांच्या मालकीचे होते ते सरकारी मालकीचे झाले असते ज्यात मजुरांची पिळवणूक नसतीभटजींची राजसत्ता शेटजींच्या पुंजीवादी गुलामीतून मुक्त झाली असतीएकटी सरकारी विमा कंपनी असती तर शक्तीच्या विमा किस्तीतून सरकार चालविण्यासाठी सततभरपूरबिनव्याजी संपत्ती जमा झाली असती.

देशातील कोणत्याहि राज्य-सरकारांना शासन-प्रशासन चालविण्यासाठी उधारीच्या कर्जाची वाट पाहावी लागली नसती वा केंद्र सरकारच्या मदतीची गरज नसतीदेश कर्जबाजारी झाला नसतापुंजीवादी कायद्या ऐवजी लोककल्याणकारी कायदे बनविल्या गेले असते  ते राबविण्यासाठी सरकार जवळ मुबलक संपत्ती असतीसर्व भारतीय नागरिकांना रशियाप्रमाणेच शिक्षणरोजगारआरोग्यसुविधाअन्नवस्त्रनिवारा आणि मनोरंजन या साधनांची ग्यारंटीहमी मिळाली असतीत्यातून बेरोजगारीउपासमारीआत्महत्याधार्मिक आतंकवादआर्थिक नक्षलवादअन्यायी जातीयवाद आणि नकोशा गरिबीचा अंत झाला असताचोरीबदमाशीनशाहिंसा  ठकवणूक दिसली नसतीसर्व जनता सुखी-समाधानी झाली असतीन्यायस्वातंत्र्यसमता  बंधुत्वाचे वातावरण जिकडे-तिकडे वाहत असते.

डॉबाबासाहेब आंबेडकर या “राष्ट्रीय पुरुषाला केवळ “अस्पृश्य हिंदूंचा नेता” म्हणून कांग्रेसने मान्यता दिलीमोठ्या प्रयासाने बाबासाहेबांना संविधान निर्मितीच्या “मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेडॉबाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान बनवितांना वेळोवेळी भाषणे केलीतत्यातील काही महत्वाचे मुदये लक्षात घेणे काळाची आहेम्हणून ते पुढीलप्रमाणे आहेत...

() “लोकशाहीला व्यवस्थित चालविण्यासाठी राष्ट्रीय एकता निर्माण करण्याची गरज आहेत्यासाठी लोकांच्या जीवनातील धार्मिकजातीय भेदभाव समाप्त करणे फारच गरजेचे आहेविशिष्ट वर्गाच्या कोणत्याही अंध:श्रद्धांची डोके:दुखी करणाऱ्या कार्यक्रमांना पायबंद घालण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवेत मग ते शासकीय पातळीवर असोत कि प्रशासकीय पातळीवर असोत.” (संविधान सभादिनांक --१९४८)

() “आमची राज्यघटना सांसदीय लोकशाहीला प्रतिपादित करीत आहेसांसदीय लोकशाही म्हणजे “एक व्यक्ती-एक मत.” ज्यातून कोणत्याही एका वर्गाला सतत हुकुमशाही निर्माण करण्याचा अधिकार मिळणार नाही अशी राज्य पद्धतीराजकीय लोकशाहीची स्थापना करतानाच तिला आर्थिक लोकशाहीचे “आदर्श” स्वरूप प्राप्त करून देण्यात यावे”. (संविधान सभादिनांक १९-११-१९४८)

() “मी विनम्रतेने सूचना करू इच्छितो किआमच्या राज्यांची पायाभरणी अशी असायला हवी कित्यात सामान्यबहुजनांची सुरक्षा व्हायला पाहिजे तसेच थोड्या लोकांसोबत सुद्धा न्यायपूर्ण वागणूक केली जावीकोणीही न्यायापासून अलिप्त राहता कामा नये.” (संविधान सभादिनांक १०--४९)

() “२६ जानेवारी १९५० पासून आपण राजकीय दृष्ट्या तर समान होणार परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहीलह्या विषंगतीला अविलंब दूर करायला हवेअन्यथा विषमतेने पिडीत झालेले झालेले लोक केवळ राजकीय लोकशाहीची हमी देणाऱ्या संविधानाला उद्वस्थ करतील.” (संविधान सभादिनांक २५-११-१९४९)

() “संविधान रुपी उत्तम मंदिराची रचना आम्ही देवतांसाठी केलीपरंतु ते विराजमान होण्या अगोदरच त्यांच्या जागेवर शैतानानी कब्जा केला आहेआता तर या संविधानालाच जाळण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.” (विधानसभादिनांक १९--१९५५)
बाबासाहेबांनी हे संविधान लिहिले नसते तरी ब्रिटिश सरकारनी नेमलेल्या सर जॉन “साईमन कमिशनच्या माध्यमातून आणि गोलमेज परिषदेतून जे हक्क अस्पृस्यांसाठी मिळवून घेतले होते ते मिळालेच असतेकारण त्याच आधारावर भारताला स्वातंत्र्य मिळालेअन्यथा बाबासाहेबांच्या तक्रारीवर इंग्रजांनी दिलेले स्वातंत्र्य हिसकावून सुद्धा घेतले असतेही बाबासाहेबांची भीती कांग्रेसला असल्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना संविधान निर्मितीच्या “मसुदा समितीवर घेतले.

बाबासाहेबांनी अस्पृश्यतेतर लोकांना वर्ण व्यवस्थेच्या जोखडातून मुक्ती मिळवून त्यांना हि राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मोबदला मिळवून देणाऱ्या महत्वाच्या कार्यासाठी “घटना समिती प्रवेश केलात्यामुळे हिंदू स्त्रियांसाठी “हिंदू कोड बिल”, सक्षम लोकशाहीसाठी “समान नागरी कायदा” आणि जंगली जातीभटक्या जातीअनुसूचित जमातीइतर मागास जाती तथा अन्य धर्मिय लोकांच्या हितासाठी “स्वतंत्र आयोग” बनविण्याची शिफारस करता आली.

संपत्तीला व्यक्तींचे मौलिक अधिकार बनविण्या विरुद्ध बाबासाहेब आंबेडकर होते पण......! भारतीय संविधानात सार्वजनिक बहुजनांच्या हिताविरुद्ध भर पडली. “काळे कलम” ज्या ‘कलम-३१” ला बाबासाहेब मानतात ते कांग्रेसच्या आशीर्वादाने निर्माण झाले. “संविधाना द्वारे कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या जीवन वा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून अलिप्त केल्या जाणार नाही” या जापानी संविधानातील विचारांनी कांग्रेस नेते अति प्रभावित होते.

व्यक्तिगत स्वातंत्र्याला” ते “व्यक्तिगत संपत्ती” या अर्थाने घेत होतेया विचारातील अंधारातून कांग्रेसने “कलम-३१ची निर्मिती केली  व्यक्तिगत संपत्तीपासून कोणालाही वंचित केल्या जावू नयेम्हणून आग्रह धरलाया कलमामुळे भारतीय नागरिकांना “व्यक्तिगत संपत्ती” धारण करण्याचा “मुलभूत अधिकार” म्हणून बहाल करण्यात आलाभारतीय संविधानात कांग्रेसने सार्वजनिक हिताला बाजूला सारून “व्यक्तिगत संपत्तीला” व्यक्तीच्या मुलभूत अधिकारात संमिलीत करवून घेतले  संविधानाच्या माध्यमातून भांडवलशाही उभी केली.

भारतीय संविधानात “कलम-२४” हे सुद्धा कांग्रेसच्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी घुसडले आहेज्यात सार्वजनिक हितासाठी संपत्ती अधिग्रहित करताना व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याची अट घालण्यात आलीसामान्य लोकांच्या हितासाठी शेटजींना मोबदला दिल्याशिवाय त्यांच्या संपत्तीला हस्तगत करता येणार नाही याचा अर्थ सामान्य लोकांच्या हितापेक्षा मुठभर पुंजीपतींचे हित कांग्रेसला अतिशय महत्वाचे वाटत होतेडॉबाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “अन्य देशांतील लोकशाही विफल होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे “प्रौढ मताधिकार” आणि “मौलिक अधिकारा” या विचारांच्या पलीकडे ते जाऊच शकले नाहीतआमच्या संविधानात सुद्धा त्यापेक्षा काहीच वेगळे नाहीमग प्रश्न पडतो किहे कांग्रेसी संविधान तरी कसे काय सफल होईलसंविधानाच्या विफलतेची सर्व कारणे संविधानात सुरुवातीसच हिंदू कांग्रेसने घुसडून ठेवलेली आहेत.

पूर्वीपासूनच कांग्रेसवादी नेत्यांची “राष्ट्रीय भावने” पेक्षा हिंदूधर्माची “धार्मिक भावना” उफाळून येत होती  अजूनही ती उफाळून येत आहेपरिणामी शीख आतंकवादीमुस्लीम आतंकवादी आणि हिंदू आतंकवादी इथे वावरत आहेतमोठ्या संख्येने आर्थिक पिडवणूकीमुळे हिंदू नक्षलवादी तर मुस्लिम आतंकवादी बनत आहेतहिंदू धर्मातील अंध:श्रद्धेला राष्ट्रीय भावनेपेक्षा  प्रगत विज्ञानापेक्षा महान समजणाऱ्या कांग्रेस सरकारने बहुसंख्यांक जनतेला भिकारी बनविले आहे.

बाबासाहेबांना “भारतीय निर्वाचान मंडळ” स्वतंत्र असावे असे वाटत होते तथा उमेदवारी घेतेवेळी  सोडतेवेळी व्यक्तिगत संपत्तीचा गोषवारा देणे-घेणे आवश्यक मानले होतेकाँग्रेसने भारतीय निर्वाचन पद्धतीला दोषपूर्ण ठेवले कारण कांग्रेसच्या राजकीय चोरांना आर्थिक भ्रष्टाचार करुन सुखरूप पळता यावेत्याचा परिणाम “निवडणूक मंडळ” हे सत्ताधारी लोकांच्या हातातील बाहुले बनलेपुंजीवादी संविधानामुळे प्रामाणिक उमेदवार निवडून येण्याची शक्यताच मावळली आहे.

बाबासाहेबांनी “समान नागरी कायद्याचा आग्रह धरला असतात्याला हिंदू-मुस्लीम राजकीय नेत्यांनी पद्धतशीर बगल दिली  लोकसंख्या वृद्धीला चालना मिळालीसंतती ही ईश्वरीय कृती आहे त्याचे नियंत्रण करणे म्हणजे देवाला विरोध करणे अर्थात पापाचे वाटेकरी बनणे ही भोळी समजूत ठेवून हिंदू-मुस्लीम या दोन्ही धर्मांच्या लोकांनी भारताची अमर्याद लोकसंख्या वाढवण्याच्या कारखान्यांना जीवदान दिलेभारतातील मर्यादित भूमी आणि अमर्याद लोकसंख्या हे समीकरण “भारतीय संविधान” कसे पेलणारलोकसंख्येला आळा घालण्यासाठी कठोर प्रामाणिक पाउलांची आवश्यकता पूर्वीही होती  आजही आहे.

राष्ट्रीय बंधुत्वतेच्या भावनेला तडा देण्यासाठी संविधानातील शुल्लक चुका सुद्धा देशाच्या विनाशाला कारणीभूत होऊ शकतातही बाब लक्षात ठेवून बाबासाहेबांनी सरकारी व्यवहारासाठी “एक देशएक भाषा” ही सूचना पण केली होतीमात्र तसे  करता राज्य सरकार चालविण्यासाठी क्षेत्रिय भाषा निवडण्याची संधी राज्यांना देण्यात आली.
भारतीय संविधान “जसे” बाबासाहेबांना हवे होते “तसे” तत्कालीन सत्ताधारी लोकांनी लिहू दिले नाही म्हणून त्यांना आपल्या मंत्रीपदाचा त्याग करावा लागला होता ही बाब आंबेडकरी जनता का विसरली आहेत?. संविधानाची निर्मिती करूनही बाबासाहेब खूप खुश नव्हते.

भारतीय संविधान लिहिण्यासाठी ज्या आशेने ते पुढे आले “त्या” आशेवर कांग्रेसने पाणी टाकले  सरदार पटेलच्या पुंजीवादाला बळकट करणारेमार्क्सच्या नक्षलवादाला जीवदान देणारेलोहियांच्या जातीयवादाला खतपाणी घालणारेविनायक सावरकरांच्या विनाशक हिंदुधर्माच्या -वैज्ञानिक वर्ण-व्यवस्थेला खतपाणी घालून मंदिरांची अमर्याद संपत्ती वाढविणारे संविधान बाबासाहेबांच्या हातून लिहून घेतल्या गेले.

डॉबाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या “दिशा निर्देशक” तत्वांना वर्णाश्रम व्यवस्थेप्रमाने संविधानाच्या शेवटच्या चवथ्या भागात सम्मिलित केलेजेव्हापर्यंत हे संविधान “एक व्यक्तीएक मूल्य” या विचारांचा अंगीकार करीत नाही तोपर्यंत ते आंबेडकरवादी म्हणायचेच कसे त्याचा जय-जयकार सामान्य बहुसंख्याक भारतीय जनतेने का करावामोहनचंद गांधीने सामान्य जनतेच्या सहाय्याने मिळालेल्या “भारतीय स्वातंत्र्याला सरदार पटेलांच्या माध्यमातून टाटा-बीडला यांना दान केलेमग प्रश्न येतो तो गांधी-कांग्रेस हे सामान्य ९०लोकांचे कैवारी आहेत कि पुंजीवादाचेजातीयवादीवर्णवादी कांग्रेसच्या बहुमतांनी अस्तित्वात आलेले भारतीय संविधानातील कलमे रिकाम्या तिजोरीतून सामन्यासाठी रचण्यात आलेल्या दिखावटी योजनांची पुरती कसे  केव्हापर्यंत करतील?

व्यक्तिवादापेक्षा बाबासाहेब आंबेडकर विचाराला अधिक नव्हे तर सर्वाधिक महत्त्व देत होतेहे समजावून देण्यासाठी त्यांनी “माझ्या नावाचा जय-जयकार करण्याऐवजी ज्या गोष्टी माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेतत्या पूर्ण करण्यासाठीतुम्ही प्राणपणाने लढा.” त्यांच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेतयाचा शोध घेतांना लक्षात येते कि बुरसटलेल्या हिंदुधर्माचा अर्थात जातीवर्णवर्ग व्यवस्थेचा अंत करणे  त्याऐवजी लोकशाहीवादी गौतम बुद्धाच्या “सम्यक् धम्माची स्थापना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात करून सुख-शांतीची निर्मिती करणे.

आंबेडकरवाद काय आहेआंबेडकरवाद म्हणजे बुद्धधम्म अर्थात “महान सुखाचा मध्यममार्ग” जो लोकशाहीच्या न्यायस्वातंत्र्यसमता आणि बंधुभाव या चारही नैतिक मुल्यांची शिकवण देतोती शिकवण म्हणजे (सम्यक् दृष्टी अर्थात अनित्यअनात्मअनीश्वर आणि कार्य-कारणीय (वैज्ञानिकध्येय; (सम्यक् संकल्प म्हणजे सम्यक् दृष्टी प्रमाणे वागण्याचा निश्चय; (सम्यक् वाचा म्हणजे सम्यक् संकल्पा प्रमाणे भाषण-संभाषण; (सम्यक् कर्म म्हणजे सम्यक् वाचे प्रमाणे आचरण; (सम्यक् आजीविका म्हणजे सम्यक् कर्मा प्रमाणे जीवन निर्वाह; (सम्यक् व्यायाम म्हणजे सम्यक् आजीविकेची वैज्ञानिक सवय; (सम्यक् स्मृती म्हणजे सम्यक व्यायामाची सतत आठवणआणि  (सम्यक् समाधी म्हणजे सम्यक् स्मृतींची जोपासनाअन्य सात ही मार्गांचे एकाग्र चित्ताने जतन करने.

धम्म शिक्षण म्हणजे भारतीय संविधान काजे संविधान जिवंत माणसांना गरिबी आणि मृत देवांना श्रीमंती देते असे संविधान बाबासाहेबांना अभिप्रेत होते का? “भारतीय संविधान” म्हणजे “बुद्ध आणि त्यांचा धम्म” नाहीहे लक्षात घेणे गरजेचे आहेसामान्य ९०पिडीत भारतीय नागरिकांना लोकांना वर्णवादीवर्गवादी संविधानाची पूजा का करण्याची गरज का भासावी?

सध्या भारतात नवीन संविधान लागू होऊन ६३ वर्ष पूर्ण होत आहेतसंवैधानिक उणीवातून देशात वर्ण व्यवस्तेची फळे भरपूर प्रमाणात वाढायला लागलीतब्राह्मणक्षत्रियवैश्य या उच्च वर्णीय १५लोकांचे सरकारी नोकरीतील प्रमाण ८८आहेशैक्षणिक क्षेत्रात ७८आहेव्यापार  उद्धोग-धंद्यात ९७%आहेकृषी क्षेत्रात ९४आहे आणि धार्मिक स्तरावर १००कब्जा आहेत्यामुळे मुठभर भारतीय लोकांना मानसन्मानप्रसिद्धी सुख आणि समाधान आहेयासाठीच इंग्रज सरकारने भारताला स्वातंत्र्य बहाल केले होते काआणि आमच्या देशातील तत्कालीन सामान्य लोकांची सुद्धा इच्छा स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सहकार्य करण्याची होती कादेशासाठी फासीवर जाणारे भगतसिंगराजगुरू आणि चंद्रशेखर यांची इच्छा भारतात पुंजीवादी व्यवस्था राबवायची होती काजुण्या वर्ण व्यवस्थेत सुद्धा जेवढे ऐश्वर्य प्राप्त झाले नव्हते त्यापेक्षा कितीतरी जास्त हित या संविधानाने भटजी-शेटजीनां बहाल केले आहेतरीही या संविधानाला “बहुजन हिताय-बहुजन सुखाय” संविधान म्हणायचे का?

आता प्रश्न हा आहे कि या “भारतीय संविधानाची वर्णवादी जडण-घडण” सुधारायची कि संपवण्याचीहे संविधान सुधारता यावे म्हणून घटनेत “बदल” घडविण्याची परवानगी देणारे कलम घालण्यात आले पण बहुमत नसेल तर तसे करता येत नाहीपुंजीवादी भारतात मतांना विकत घेण्याची क्षमता सामान्य गरीब जनतेत नाही परंतु ते सामुहिक उठाव करून “एक मतएक मूल्य” या “आर्थिक लोकशाही” विचारला संविधानबद्ध करवून घेवू शकतातजर तसे लवकर झाले नाही तर या संविधानाचे राज्य धोक्यात येईलतथा “सायमन कमिशन” आणि “गोलमेज परिषदेच्या संघर्षातून मिळालेल्या तुटपुंज्या सुविधा सुद्धा धोक्यात येतील.


रात्र वैऱ्यांची आहे आणि जनता झोपलेली आहेआंबेडकरी जनतेने पोकळ भावनेच्या आहारी जाण्याऐवजी योग्य  ठोस विचारांती “महान उद्धेश पूर्ती” करिता मार्गक्रमण करणे आवश्यक आहेकांग्रेसी लोकांनी बाबासाहेबांना “आधुनिक मनू” का म्हटलेयाचा सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहेआपली शक्ती विधायक आणि सार्वजनिक विकासपुरक कार्यातच खर्च करायला हवीकवी सुरेश भटांनी बाबासाहेबांचा उपदेश आंबेडकरी लोकांना उद्धेशून मोजक्या शब्दांत मांडला तो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे,“जा काही मानू नका उपकार माझापण जातांना मात्र बंद करा ही दुकानेअसा मांडू नका बाजार माझा.”