रविवार, 16 जून 2013

बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा ! (?)



टिव्ही आणि वर्तमानपत्र हे हिन्दू-मुस्लिम पूंजीवादी लोकांचे आहेत ते मुद्धाम अंधश्रद्धा फैलावुन लोकांना नको त्या कामत व्यस्त ठेवतात, त्याच प्रमाने अम्बेडकरी वाहिन्या सुद्धा बुद्धाच्या नावावर जाग्रति करण्या ऐवजी अंधश्रद्धा पस्रवित आहेत. भिक्षु = पुरोहित झाले आहेत.... आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे बघायचे वाकून, ही अवस्था जोवर बलागली जाईल तोपर्यंत, देशातील पुरोहित, भिक्षु, मुल्ल्हा जनतेच्या डोळ्यात हिरोती टाकुन अंध करुण लूटत राहतील, हे लोक स्वार्थ करण्यासाठी धर्म, धम्माचा आश्रय घेतात.

भिक्षु नावाच्या पुरोहितान्नी बुद्धाला "बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा " करुण सोडले, "बुद्ध भगवान" केले, सत्यनारायण कथा / परित्राण सूत्र पाठ सारखे कर्मकांड सुरु केले... हिन्दुधर्म आणि बौद्धांचा धम्म यात कोणता फरक राहिला आहे? मूर्ति पूजा हिंदुधर्मात आहे त्याची प्रतिकृति बौद्ध करीत आहेत, तो "राम" देव गेला आणि "भीम" देव आला, भीमाला जर अंध होवून पूजत राहिले तर कोंनता फ़ायदा होइल? बुद्ध-अम्बेडकर यांच्या पूजा-अर्चा करण्या पलिकडे अम्बेडकरी लोकांनी/ संस्था/ पक्षांनी कोणते विशेष कार्य केले? हिन्दू सारखे इथे बुद्ध मंदिर/विहार, तिथे बुद्ध मंदिर/विहार करुण काय फायदा? 

जिवंत बौद्ध उपाशी आणि त्यांचे मृत नेते/महापुरुष तुपाशी, हा कोणता पुरोगामी विचार आहे? हा कोणता बुद्धिज़्म आहे? हा कोणता अम्बेडकरवाद आहे? बाबासाहेब अम्बेडकर हे अर्थ शास्त्राचे गाढे अभ्यासक होते पण त्यांच्याकडून कोणते प्रगतीचे अर्थशास्त्र अम्बेडकरी जनता शिकली? पूंजीवादी अर्थ शास्त्राला आपलेसे म्हणावे म्हणायला पाहिजे का? अम्बेडकरी लोक आर्थिक समतेच्या बाजूला उभे नाहीत, त्याचा परिणाम ते स्वार्थी आहेत, तर त्यांच्या कड़े "बुद्धं शरणम गच्छामि" च्या पलिकड़ील कोणता नविन विचार आहे? उठले की सुटले चालले डोळे लावायला, तर अशाने सर्वंगीण प्रगतीचा धम्म गवसेल का?

भारतीय बौद्धाना धम्म माहित नसल्यामुळे ते दुसर्यांना योग्य पद्धतीने धम्म समजावू सकत नाही. त्यांचा अम्बेडकर सुद्धा पक्का नाही, त्याचा परिणाम ते फ़क्त बुद्ध अम्बेडकर यांच्या मुर्त्या/फोटोलाच धम्म समजत आहेत. तर्क विरहित अम्बेडकरी प्रचार म्हणजे मुजोरी आहे, जे इतरांना बोचत आहे, लोक दुक्खी होवून अम्बेडकर साहेबांना/त्यांच्या मुर्त्यांना अपमानित करीत आहेत. मुर्त्या/विहारे उभारण्या ऐवजी धम्म वर्ग घेवुन शिक्षण दिल्या शिवाय शाला/कालेज च्या शिक्षनाला विशेष महत्त्व नाही.

कोणी बाबासाहेब अम्बेडकर यांच्या मुर्त्यांना काले फासले तर त्यावर इलाज म्हणजे पोलिसात रिपोर्ट देने हा एक कायदेशीर मार्ग अम्बेडकरी जनतेला नेहमी दिसत आला आहे, जो मार्ग उचित, समुचित नाही. तसे करुण काय विपरीत प्रयोग थांबले का? कोणती ही हलचल ही विचारांनी प्रेरित असते, जे अशी कृत्य करतात ते अज्ञानी म्हणजे बाबासाहेब यांच्या मोठेपणाला जानत नाहीत. त्यांना ते कृत्ये करायाला जर कोणी उचकवले असेल तर त्यांना असे कृत्य करने अनुचित आहे, हे समजव्नारे डोके समोर आले का? जर त्या डोक्यांनि आपले काम सतत केले असते तर असे प्रकार घडले असते का? अम्बेडकरी जनतेच्या विरोधातील धग कमी करण्यासाठी अम्बेडकरी जनतेनी कोणते ठोस कार्य केले आहे? कधी कधी याला वोट दया, त्याला वोट दया, असे म्हणत राहिले.

भावनिक आक्रोश म्हणजे अम्बेडकरवाद नाही. पोलिसी दड़प शाहिच्या आधारे अम्बेडकरी मुर्त्यांची/चित्रांची/नावाची विटंबना थाम्बवता येइल, अशी जर बौद्धांची संजुत असेल तर ती त्यांनी लवकरात लवकर मनातून काढून टाकावी, अशी माझी अम्बेडकरी जनतेला विनंती आहे. गरीबी हटाओ, अमीरी हटाओ ...!

बुद्धधम्म म्हणजे आदर्श लोकशाही


लोकशाही म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव यांची संयुक्त जोपासना अर्थात धम्म होय. ज्याप्रमाणे सम्यक दृष्टी वर सम्यक संकल्प, सम्यक संकल्पावर सम्यक वाचा, सम्यक वाचेवर सम्यक कर्म, सम्यक कर्मावर सम्यक आजीविका, सम्यक आजीविकेवर सम्यक प्रयत्न, सम्यक प्रयत्नावर सम्यक स्मृती आणि सम्यक स्मृतीवर सम्यक समाधी निर्भर आहे. त्याच प्रमाणे न्यायावर स्वातंत्र्य, स्वातंत्र्यावर समता, समतेवर बंधुभाव आणि बंधुत्वावर विश्व अधिष्ठित आहे. दिनांक ३ आक्टोंबर १९५४ रोजी दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण प्रसारित झाले त्यात त्यांनी या विषयावर भरपूर प्रकाश टाकला तो असा, “स्वातंत्र्य, समता आणि सहभाव हे नैतिक मूल्य फ्रेंच राज्य क्रांतीपासून उसने घेतले नसून ते माझे जीवन विषयक तत्वज्ञान मी माझे गुरु गौतम बुद्धा पासून घेतले आहे. माझ्या तत्वज्ञानाचे मुळ राजकारणात नसून धम्मात आहे. माझ्या जीवनविषयक तत्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावयाचे आहे. पण अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक असते...

“माझ्या तत्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे, तरी सुद्धा त्यात संपूर्ण समतेला मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता ही स्वतात्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे. माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून स्वरक्षण मिळावे म्हणूनच कायदे-कानुनचे स्थान गृहीत धरलेले आहे पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो. कारण स्वातंत्र्य आणि समतेच्या भंगाबाबद कायदा खात्रीने मदत करू शकेल यात मला विश्वास वाटत नाही. मी बंधुत्वाला सर्वोच्च स्थान देवू इच्छितो कारण स्वतंत्रता आणि समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाव हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे. आणि बंधुभाव आठव मानभाव हे धम्माचे दुसरे नाव आहे...

“कायदा व सह्भावाचे मूल्यमापन करतांना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा हा धर्मातीत असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो. या उलट सहभाव अथवा धम्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्याकाचे कर्त्यव्य गणले जाते...राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता व सहभाव या जीवन मूल्यांना मान्यता मिळाली आहे तथापि प्रचलित हिंदू सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे हि तत्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत. असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे? कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही. माझा माझ्या जीवन विषयक तत्वज्ञानावर पुरेसा विश्वास आहे आणि म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा तो राजकीय ध्येयवाद बनला आहे. तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल, अशी मला उमेद आहे.” (मुक्तछंद, सन- १९७६) धम्मातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा अतिरेक, कमी व अधिक टोके टाळण्यासाठी तो सम्यक, मध्यम, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श, आचरणशील, सर्वांगीण व सर्वांना कल्याणकारी अशा लोकशाही तत्वावर, विचारांवर उभा आहे...

प्राचीन भारतीय इतिहासाला राजकीय अंग कसे होते? ते सांगताना दिनांक २४ सप्टेम्बर १९४४ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मद्रासच्या ‘प्रभात’ टॉकीजमध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “जगात कुठल्याही देशात प्राचीन हिंदुस्थान सारखे प्रचंड गतिमान राजकारण नव्हते आणि हिंदुस्थान हा बदुधा एकाच देश असा आहे कि, जेथे जगात दुसरीकडे कोठेही दिसली नाही अशी क्रांती घडून आली होती.....बुद्धाने सत्याची व्याख्या अगदी सोप्या शब्दांत सांगितली होती. इंद्रियांना कळू शकेल तेच सत्य होय. दुसऱ्या भाषेत सांगावयाचे झाल्यास कुन्या अधिकाऱ्याने सांगितलेली गोष्टच सत्य, असे नाही. उलट ब्राम्हणांचे म्हणणे असे कि, जे वेदाप्रमाणे आहे तेच सत्य (हास्य). बौद्ध क्रांतिकारक होते आणि ब्राम्हण प्रतिगामी. जर ईस्लाम धर्माने ह्या देशात पाहुल टाकले नसते तर आणखी काही काल हा ब्राम्हण बौद्धातला लढा चालला असता. जगाच्या इतिहासात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा आदेश देणारे ‘बुद्ध’ हेच पहिले व्यक्ती असतील......धर्म, अर्थ, संस्कृती व राजकारण एकात जुंपून चालणारी चातुर्वण्य व्यवस्था ही केवळ सामाजिक प्रथा नाही, ते एक राजकीय तत्वज्ञान आहे, असे सिद्ध करण्यासाठी मनुस्मृती लिहिण्यात आली.”

न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या चार लोकशाही मुल्यांवर तत्वावर धम्म अधिष्ठित आहे. बुद्धाने भिक्षु संघ ही सम्यक, नैतिक मूल्यावर विनय नियमांची निर्मिती केली. संघात लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. कार्ल मार्क्सच्या ‘कम्युन” मध्ये आणि भिक्षूच्या “संघा” मध्ये फरक तो हाच आहे. भिक्षुसंघ लोकशाही विचारांवर तर साम्यवादी “कम्युन” हा शोषित कामगारांच्या हुकुमशाहीवर अधिष्ठित आहे. म्हणूनच धम्मापेक्षा साम्यवाद महान नाही, तर तो लहान आहे. कारण ‘कम्युन’ द्वेषावर तर धम्म प्रेमावर अधिष्ठित आहे. द्वेषाचे आयुष्य कमी तर प्रेमाचे आयुष्य जास्त असते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’च्या, खंड आठव्यातील, भाग तीन मध्ये, बुद्धाचा “सम्यकवाद” "कार्यकारण" सिद्धांतात मांडला, तो बघूया.
१. तृष्णे मुळे लाभाची ओढ होते.
२. लाभा मुळे कामवासना निर्माण होते.
३. कामवासने मुळे लालसा निर्माण होते.
४. लालसे मुळे दृढता (हाव) निर्माण होते.
५. दृढते मुळे स्वामित्व (स्वार्थ) निर्माण होते.
६. स्वमित्वा मुळे (अमर्याद) लोभ निर्माण होते.
७. लोभा मुळे अधिक स्वामित्व (आसक्ती) निर्माण होते.
८. स्वमित्वा मुळे संपत्तीवर पहारा (कुंपण) होतो.
९. पहाऱ्या मुळे संघर्ष (झगडा) निर्माण होतो.
१०. संघर्षा मुळे निंदा (अपमान) निर्माण होते.
११. निंदे मुळे असत्य (खोटेपणा) बाहेर येते.
१२. असत्य बाहेर आल्यामुळे दुःख (पश्चाताप) निर्माण होते.

ही प्रतीत्यसमुत्पादाची अनुलोम साखळी आहे. मज्जीम निकायातील “चुलसकुलदायि सुत्तात” प्रतीत्यसमुत्पादाचा सिद्धांत आहे. “इमस्मिम सती ईदं होती.” (ह्या च्या होण्याने हे होते.) “इमस्मिम असती ईदं न होती.” (ह्या च्या नसल्याने हे होत नाही.) “इमस्य विरोध ईदं निरुज्झती.” (ह्या च्या विरोधाने त्याचा विरोध होतो.) कोणताही संस्कारित पदार्थ नित्य, अशाश्वत नाही तर तो अनित्य आहे, क्षणिक आहे. कार्य पदार्थाच्या कार्यकारण सिद्धांतामुळे होते. प्रतीत्यसमुत्पादाला “मध्यम वर्ग” सुद्धा म्हणतात. प्रत्येयामुळे उत्पन्न (उत्पाद) नव्हे तर ‘परिवर्तन’, अनित्य होते. प्रतीत्यसमुत्पाद हा शब्द भिक्षूंची देन आहे, त्यामुळे इथे तो शब्द महत्वाचा नसून त्याचा अर्थ “ह्या मुळे हे होते” ते होतच राहते, हा ‘अनित्य बोध’ महत्वाचा आहे.

ब्राम्हणवादी व मार्क्सवादी विचारांचे लोक समाजावर हुकुमशाही लादत असतील तर त्याचा विरोध करावा, हा बाबासाहेबांचा संदेश होता. त्याचप्रमाणे जातीच्या नावावर महारांनी मांगांवर, चमारांणी महार जातीवर व इतर जातीवर सुद्धा हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करू नये. असे बाबासाहेबांचे स्पष्ट विचार होते. जाती, धर्म व वर्ग विचारी लोक मूर्खच नव्हे त्यातील बरेच लोक अज्ञानी, तानाशाही, हुकुमशाही वृत्तीचे असतात. त्यात फारच कमी लोक ज्ञानी व लोकशाही विचारांचे असतात. कोणताही वर्ग बौद्धिक दृष्ट्या परिपूर्ण, स्वच्छ नाही म्हणून जाती, वर्ग, वर्ण व धर्म या विषयांवर भांडत बसने, त्यांचा मनात गर्व बाळगणे, ते सोडणे आवश्यक आहे. तरच धम्मातील नैतीकेची शिकवण आपल्या आचरणात येईल. त्यातूनच आपल्या संघटना, संस्था मजबूत होतील, व उद्देशपूर्ती होईल.

सम्यकमार्ग म्हणजे धम्म


म्यकमार्ग म्हणजे धम्म. तथागत गौतम बुद्धाने ई.सा.पूर्व- ५२८ मध्ये “सारनाथ” येथे “प्रथम धम्मचक्र परिवर्तन” केले. त्यात त्यांनी “आर्य अष्टांगिक मार्ग” या मध्यम मार्गाचे प्रबोधन केले. ते सुखी जीवनाचे उत्तम, “आदर्श तत्वज्ञान” होते. ते समजून घेने काळाची गरज आहे. त्यातील आठही मार्ग परस्पर पूरक आहेत. त्यातून एकही उना केला तरी धम्म समजता येणार नाही, एवढे ते महत्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले, “सम्यक दृष्टी विकसित करणे याचा अर्थ ‘प्रतीत्य समुत्पादा’च्या “कार्यकारण भावा”ला विकसित करणे.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म; ४:४: सद्धधम्म, १:४) 


१. सम्यक दृस्टी- सम्यक म्हणजे उचित, श्रेष्ठ, परम आदर् आणि दृष्टी म्हणजे दृष्टीकोन, विचार, तत्वज्ञान ही सम्यक विचारांतील प्रथम पायरी आहे. त्यात “कार्यकारण सिद्धांत” म्हणजे “ह्या चे कारण हे आहे”. “ह्या मुळे हे होते”, “हे असेल तर ते होते,” पण “हे नसेल तर ते होणार नाही,” याचा बोध केला आहे. हा परस्परावलंबी, परस्परपूरक सिद्धांत बारा अंगावर अधिष्ठित आहे. ते विचार धम्म राज्याला पूरक आहेत.

१. अज्ञान- चार महाभूतरूपी मानवीय रज व विर्यातून कलल, अर्बुदरुपी असर्वज्ञ जीव म्हणजे परिणाम. 
२. संस्कार- गर्भात सप्तधातू रस, रक्त, मांस, मज्जा, मेद, अस्थी व वीर्य यांच्या मदतीने पेशींची उत्क्रांती. 
३. विज्ञान- पदार्थामुळे मेंदू, डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा या भौतिक अनात्म स्नायूंचा विकास होतो.
४. नामरूप- नाम म्हणजे चेतना, मन, चित्त, विचार व रूप म्हणजे शरीर, काया, देह यांचा अनात्म सहयोग. 
५. षडायतन- पंचेद्रियांच्या मदतीने मेंदूसारख्या सहाव्या इंद्रियाच्या तर्कज्ञानाने सत्याची परीक्षा संभव. 
६. स्पर्श- बाळाचे गर्भातून बाहेर पडून बाह्य जगाचा बाळाला स्पर्श होणे म्हणजे मानवी, अनीश्वर कृती सिद्ध. 
७. वेदना- भौतिक-अभौतिक गरजा क्षमविण्यासाठी आईच्या दुधाची व प्रेमाची दु:खदायी धडपड. 
८. तृष्णा- शारीरिक व मानसिक ईच्छेची अभौतिक वेदना दूर करण्याचा सतत संघर्ष. 
९. उपादान- भौतिक, अन्न, पाणी, हवा उष्णता व अभौतिक दया, प्रेम या तृष्णेच्या पूर्तीसाठी आशावादी प्रयत्न. 
१०. भव- शारीरिक दैनंदिन गरजा आणि मानसिक पद, पैसा, प्रतिष्ठा, किर्तीचा आहारी जाने. 
११. जन्म- ईच्छापूर्तीसाठी अप्रमादी, जागृत, विज्ञानी बनून दु:खाचा उदय रोखणे . 
१२. उपायास- शरीर म्हणजे क्षणभंगुर, अनित्य, परिवर्तनीय असल्याने रोग, म्हातारपण, मृत्यु, शोक, दु:ख ही अटळ प्रक्रिया आहे. म्हणून शरीराच्या षडायतनचा (इंद्रियांचा) अवास्तव लाड नको, त्यातून महाभयंकर दु:ख निर्माण होते. 

नैसर्गिक वैज्ञानिक ज्ञानाच्या अभावामुळे अज्ञान, अज्ञानामुळे संस्कार, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे षडायतन, षडायतणामुळे स्पर्श, स्पर्शामुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपदानामुळे भव, भवामुळे जन्म आणि जन्मामुळे दुख, हा प्रतिलोम, अधोगतीला दर्शवणारा मार्ग आहे तर अनुलोम, पुरोगामी मार्ग ज्ञानापासून सुरु होऊन सुखापर्यंत पुढे-पुढे सरकत असतो. ह्याचे प्रतिलोम-अनुलोम अंग म्हणजे एकूण २४ भाग आहेत. जर कार्यकारण सिद्धांताची ‘सम्यक दृष्टी’ समजली तर ‘आर्य अष्टांगिक मार्ग’ अर्थात धम्म समजणे सहज सोपे आहे.

२. सम्यक संकल्प- सम्यक दृष्टी प्रमाणे सम्यक, श्रेष्ठ, परम, आदर्श, उचित निश्चयाचा सतत अंगीकार.
३. सम्यक वाणी- सम्यक संकल्पा नुसार सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श संवाद व प्रवचनाचा सतत उद्घोष.
४. सम्यक कर्म- सम्यक वाणीप्रमाणे सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श कर्तव्य, कार्याच्चा सतत आविष्कार.
५. सम्यक आजीविका- सम्यक कर्मानुसार सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श सदाचाराची सतत कामना.
६. सम्यक व्यायाम- सम्यक उपजीविके प्रमाणे सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श प्रयत्नांची सतत सवय.
७. सम्यक स्मृती – सम्यक व्यायामा नुसार सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श स्मरण, आठवणीची सतत जागृती.
८. सम्यक समाधी- सम्यक स्मृती नुसार सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श चित्ताची एकाग्रता ठेवून ‘बहुजन हित आणि सुख’ जोपासण्याची सतत अपेक्षा, ज्यातून धम्मराज्य म्हणजे विश्वाची पुनर्रचना साकार करता येईल.

बहुजन म्हणजे बहु + जन, अनेक + लोक, अनंत + जनता, सर्व + लोक. विशिष्ठ संख्येत सामावलेले, केवळ दुःखीच नव्हे तर सुखी लोक सुद्धा. बहुजन म्हणजे दुःखी, कष्टी लोक असा त्याचा संकुचित अर्थ नाही बहुजन म्हणजे एक नव्हे, तर सर्वच समजावे. बहुजन शब्दात व्यक्तिगत नव्हे तर सामाजिक अर्थ आहे. हाच अर्थ बुद्धाच्या प्रत्यक्ष कृतीतून साकार झाला आहे. प्राचीन गणराज्य पद्धतीवर सुद्धा वर्णव्यवस्थेची छाप होती. शक्य संघ हे गणराज्य पद्धतीप्रमाणे कार्य करायचे परंतु त्याचा सेनापती “ब्राम्हण” होता. क्षत्रिय वर्गाच्या संघात ब्राम्हणाचे कार्य काय दर्शवतो? गणराज्य पद्धती हि वर्णवादी विचारांनी बरबटलेली होती. सिद्धार्थाने वर्ण व्यवस्थेचा अभिमान केला नाही. उलट तिला तोडण्यासाठीच ब्राम्हण शाक्य संघ सेनापतीच्या आदेशाचे पालन न केल्याने शाक्य विरुद्ध कोलिय यांच्यातील युद्ध टाळले. 

शाक्य संघाचे सभासद सिद्धार्थचे चुलत भाऊ “आनंद” सुद्धा होते. ते भिक्षु संघात दाखल होताना ‘उपाली’ नावाच्या नाव्यास घेवून आले. बुद्धाच्या भिक्षु संघात वर्ण व्यवस्थेला स्थान नाही हे सिद्ध करण्यासाठी आनंदाच्या आधी उपालीला दीक्षा दिली व संघात त्यांचे स्थान आनंदाच्या “क्षत्रिय” वर्णापेक्षा महान ठरविले. भिक्षु संघात जो प्रथम दीक्षा घेतो त्याला नंतर दीक्षा घेणारा नेहमी मान देत असतो. ही गुणांची दीक्षा असते, जन्माची नाही. जन्मावर आधारलेल्या वर्ण व्यवस्थेचा विरोध हा बुद्धाच्या भिक्षु संघातील नियामांवरून दिसून येते. जाती, धर्मावर आधारित बहुजनांची कल्पना बुद्धाची नव्हतीच हे या ठिकाणी बौद्ध जनतेनी समजून घ्यावे. तर आणि तरच बुद्धाचे धम्मराज्य विश्वात प्रस्थापित होऊन ते सतत नांदू शकेल. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “बुद्ध आणि त्यांचा धम्म”च्या प्रस्तावनेत उल्लेख केला, “मी हे नमूद करू इच्छितो कि बुद्धीझमचा अभ्यास करावयास आवश्यक तीन पुस्तकाच्या संचातील हे (बुद्ध आणि त्यांचा धम्म) एक पुस्तक होय. अन्य दोन पुस्तके म्हणजे १. बुद्ध आणि कार्ल मार्क्स व २. प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती आहेत, ते लवकरात लवकर प्रसिद्ध होतील, अशी मी आशा करतो.” धम्म म्हणजे हिंदुधर्म नाही आणि साम्यवाद सुद्धा नाही. धम्म म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. धम्म म्हणजे “आदर्श लोकशाही.” आदर्श लोकशाहीच्या निर्मितीसाठीच गौतम ने “आर्य अष्टांगिक मार्ग” म्हणजे “परम सुखाचा मार्ग” सांगितला आहे. 

आर्य अष्टांगिक मार्गातील प्रथम दोन मार्ग म्हणजे ‘सम्यक दृष्टी’ व ‘सम्यक संकल्प’ हे आदर्श दृष्टीकोन, विचार, प्रज्ञा, बुद्धिमत्ता, तत्वज्ञान व आदर्श निश्चय दर्शक आहेत, त्यातून आदर्श “न्याय” बुद्धी प्राप्त होते. तीन व चार क्रमांकाच्या सम्यक मार्गातून वाचा व कर्माचा बोध होतो त्यातून आदर्श संवाद, संभाषण, भाषण व त्यावर आधारित कार्य, कर्तव्य, काम म्हणजे “बोले तैसा चाले” या न्यायनिष्ठ आदर्श “स्वातंत्र्य” विचारांचा बोध होतो. पाच व सहा या क्रमांकाच्या सम्यक आजीविका व सम्यक व्यायाम या आदर्श सदाचारी आचारातून उचित प्रयत्न, सवयीने न्याय-स्वातंत्र्यनिष्ठ आदर्श “समता” मूलक विचारांचा बोध होतो. तसेच सातव्या व आठव्या मी सम्यक स्मृती व सम्यक समाधी मार्गातून आदर्श आठवणीची, स्मरणीय मनाची एकाग्रता म्हणजे आदर्श “बंधुभाव” जाणवतो. 

न्याय, स्वतंत्रता व समतेशिवाय ‘बंधुत्वाला’ अर्थ नाही. ते सुद्धा न्याय, स्वातंत्र्य आणि समतेवर अधिष्टीत हवे. ज्या प्रमाणे अष्टांगिक मार्ग परस्परांना पूरक आहेत त्याच-प्रमाणे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव हे नैतिक आहेत सुद्धा परस्पर पूरक आहेत. त्याशिवाय लोकशाहीची व्याख्या अपूर्ण आहे.

बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही


दिनांक २९ नोव्हेंबर १९४४ ला पुण्यात झालेल्या आपल्या ओजस्वी भाषणात डॉ. बाबासाहेबांनी हिंदुधर्माची पोलखोल केली, त्यात ते म्हणले, “वेद हे ईश्वरनिर्मित आहेत, अपौरुष आहेत, अशी त्याची वानगी सांगण्यात येते. पण त्याला इतिहासात कोठेच पुरावा नाही, ..... वेद प्रणीत धर्मास बुद्धाने धक्का दिला. हा बुद्धधम्म वेदप्रामाण्य कधीच मानीत नव्हता......खरे पाहिले तर वेद दोनच आहेत. एक ऋग्वेद व दुसरा अथर्ववेद. मी वेद कितीतरी वेळा वाचले आहेत. त्यांत समाजाचा, मानवाच्या उन्नतीसाठी कोणतीही नैतिक पोषक तत्वे सांगितली नाहीत.

"अथर्ववेदात बायको प्रेम करीत नसेल तर काय करावे? दुसऱ्याची बायको कशी वश करावी? द्रव्य हराम कसे करावे? हे सांगितले असून (मंत्राने) जारण-मारण कसे करावे हे सांगितले आहे. “वेदातील पुरुष शुक्तात ब्राह्मणांपासून शुद्रांपर्यंत कोणी कसे वागावे हे दिले आहे. बुद्धाचा याच बाबीवर कटाक्ष होता व त्याच दृष्टीने चातुर्वर्ण्यावर त्यांनी टीका केली आहे. क्षत्रियांनी मारणे हे त्याचे कर्तव्य आहे’ असे सांगितले आहे. एकाने दुसऱ्याला मारणे हे जरुरी असू शकेल पण कर्तव्य ठरणार नाही...
"गीतेच्या दुसऱ्या अध्यायात १८ ते ३ श्लोकात वेदांताचा आधार घेवून आत्मा अविनाशी आहे. देह जरेने किंवा अन्य कारणाने नाहीसा होणारच, असे विवरण केलेले आहे. परंतु विचार करा कि, एखाद्या खुनी खटल्यात वकिलाने जजास सांगितले कि, ‘साहेब आत्मा अविनाशी आहे. तेव्हा खुणा बाबद आरोपीस शिक्षा का करता?’ तर हे वकिलाचे म्हणणे कसे दिसेल?...... वेदांवर बुद्धानेच नव्हेतर चार्वाक आदी विद्वानानीही टीका केली आहे. बुद्धाच्या वेदांवरील हल्यामुळेच शूद्रांचा सदाधर्म जाऊन ते राज्यकर्ते झाले.”

महाबोधी सोसायटीच्या मासिकासाठी सन १९५० मध्ये मे महिण्यात लेख लिहिण्याची विनंती बाबासाहेबांना करण्यात आली त्यात बाबासाहेबांनी लिहिले, “विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. जर आधुनिक जगाला वाचवायचे असेल तर त्याला बौद्धधम्माची कास धरावी लागेल..... बुद्धाने आपला अहंकार पूर्णपणे जिंकून टाकला होता, हेच त्यांचे वैशिष्टय. ‘मी देवाचा पुत्र असून माझ्या द्वारेच जनतेला मोक्ष प्राप्त होईल’ असे येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये पदोपदी बजावून सांगितले आहे. मुहम्मद पैगंबराने तर येशूच्या पुढे एक पाऊल जाऊन ‘मी देवाचा प्रेषित आहे’ असे सांगितले आणि कृष्णाने तर विचारूच नका वरील दोन्ही संस्थापाकांवर मात करून ‘मी देवोधीदेव परमेश्वरच आहे.’ येथे विज्ञान कुठे आहे?

काशी विद्यापीठातील दिनांक २५ नोव्हेंबर १९५६ च्या आपल्या भाषणात वैज्ञानिक उपदेशात बाबासाहेब ठासून म्हणाले, “बुद्धांची चातुर्वर्ण्य विरोधाची तीव्रता ब्राम्हणांच्या मनात सतत डोचत राहिली. म्हणूनच चातुर्वर्ण्याविषयी मुक असलेल्या निरीश्वरवादी सांख्यचार्य कपिल मुनीस ब्राम्हणांनी आपले म्हटले परंतु बुद्धाशी नेहमी वैर मांडले....

"बुद्धाचा वैदिक धर्माला पाचवा विरोध देव आणि आत्मा यांच्या अस्तित्वाबाबादचा होता. बुद्धाच्या मते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, न्यायी, प्रेममय अशा देवाचे अस्तित्व ज्ञानाची साधने जी पंचेंद्रिय आणि तर्क यांच्या सहाय्याने सिद्ध करता येत नाही एका माणसाने दुसर्याशी कसे वागावे? आणि सर्व माणसे सुखी कसे होतील? हे शिकवणे बुद्धधम्माचे मुख्य कार्य आहे. म्हणून धम्माचा देवाशी संबंध येत नाही. देवाचे अस्तित्व केवळ पोकळ तर्कांवर Speculation वर आधारलेले आहे आणि या अस्तित्वाच्या श्रद्धेतून पूजा, प्रार्थना, पुरोहित इत्यादी अष्टांग मार्गातील “समाधी घटक” अशा खुळ्या समजुतीचे (Superstition) पेव फुटले.

“प्रतित्य समुत्पाद’ या त्यांच्या सिद्धांतात देवाच्या अस्तित्वावर सर्वसामान्य तार्किक स्वरूपाचे आक्षेय घेतलेले आहेत...... वेदांतील मोक्ष सिद्धांत म्हणजे आत्म्याचे ब्रह्म्यात विलीन होणे, यालाही तर्कदुष्ट ठरवून आणि मानवी जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी म्हणून बुद्धाने विरोध केला आहे. ब्रह्मविषयक बुद्धाची विचारसरणी त्याच्या वरिष्ठ व भारद्वाज या दोन ब्राह्मनांशी झालेल्या संवादात व्यक्त झाली आहे. बुद्धाचे आत्माच्या अस्तित्वावरील व्यवहारिक दृष्टीचे आक्षेप, त्याच्या देव कल्पनेवरील आक्षेयासारखे आहेत. शिवाय तो आत्माचे म्हणून समजले जाणारे व्यापार नामरूप या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट करून दाखवितो. कायेच्या उत्पत्तीबरोबरच जाणीवेचा (Consciousness) प्रारंभ होतो. इच्छा, भाव व विचार ही कार्य जानिवेचीच आहेत. तेव्हा ‘आत्मा’ हे वेगळे तत्व गृहीत धरण्याची आवश्यकताच उरत नाही.

“बुद्ध धम्माच्या ऱ्हासाचे मुख्य कारण इस्लामी आक्रमण आहे. त्यांच्या भाषेत मूर्तीला ‘बुत’ असे म्हणत बुतशिकन म्हणजे मूर्तिभंजक होते. हे त्यांच्यामध्ये गाझीपनाचे लक्षण होते. हिंदुपेक्षा बुद्धांवर चढविलेले त्यांचे हल्ले अधिक हिंस्त्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेल्या बौद्ध भिक्खुंच्या कत्तलीने ११ पासून १३ व्या शतकापर्यंतची इतिहासाची पाने रक्ताने रंगलेली आहेत. नालंदा सारख्या जगविख्यात विद्यापीठाचा त्यांनी पूर्ण नाश केला. हिंदुप्रमाणे बौद्धांमध्ये धर्मप्रचाराचे पिढीजात काम करणारा ब्राम्हणासारखा वर्ग नसल्याने भिक्खुंच्या कत्तलीनंतर बौद्ध धम्माचा झपाट्याने ऱ्हास सुरु झाला. सत्याचाही कधी कधी पराभव होतो. ह्याचे हे एक उदाहरण आहे. परंतु आज त्यानंतर ६०० वर्षांनी भारताला बुद्धाची आठवण होत आहे. आणि आज जर त्याने बुद्धाच्या शिकवणुकीचा त्याग केला नाही तर त्यांचे भवितव्य ठीक नाही.” (प्रबुद्ध भारत-२४/८/५७)