टिव्ही आणि वर्तमानपत्र हे हिन्दू-मुस्लिम पूंजीवादी लोकांचे आहेत ते मुद्धाम अंधश्रद्धा फैलावुन लोकांना नको त्या कामत व्यस्त ठेवतात, त्याच प्रमाने अम्बेडकरी वाहिन्या सुद्धा बुद्धाच्या नावावर जाग्रति करण्या ऐवजी अंधश्रद्धा पस्रवित आहेत. भिक्षु = पुरोहित झाले आहेत.... आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे बघायचे वाकून, ही अवस्था जोवर बलागली जाईल तोपर्यंत, देशातील पुरोहित, भिक्षु, मुल्ल्हा जनतेच्या डोळ्यात हिरोती टाकुन अंध करुण लूटत राहतील, हे लोक स्वार्थ करण्यासाठी धर्म, धम्माचा आश्रय घेतात.
भिक्षु नावाच्या पुरोहितान्नी बुद्धाला "बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा " करुण सोडले, "बुद्ध भगवान" केले, सत्यनारायण कथा / परित्राण सूत्र पाठ सारखे कर्मकांड सुरु केले... हिन्दुधर्म आणि बौद्धांचा धम्म यात कोणता फरक राहिला आहे? मूर्ति पूजा हिंदुधर्मात आहे त्याची प्रतिकृति बौद्ध करीत आहेत, तो "राम" देव गेला आणि "भीम" देव आला, भीमाला जर अंध होवून पूजत राहिले तर कोंनता फ़ायदा होइल? बुद्ध-अम्बेडकर यांच्या पूजा-अर्चा करण्या पलिकडे अम्बेडकरी लोकांनी/ संस्था/ पक्षांनी कोणते विशेष कार्य केले? हिन्दू सारखे इथे बुद्ध मंदिर/विहार, तिथे बुद्ध मंदिर/विहार करुण काय फायदा?
जिवंत बौद्ध उपाशी आणि त्यांचे मृत नेते/महापुरुष तुपाशी, हा कोणता पुरोगामी विचार आहे? हा कोणता बुद्धिज़्म आहे? हा कोणता अम्बेडकरवाद आहे? बाबासाहेब अम्बेडकर हे अर्थ शास्त्राचे गाढे अभ्यासक होते पण त्यांच्याकडून कोणते प्रगतीचे अर्थशास्त्र अम्बेडकरी जनता शिकली? पूंजीवादी अर्थ शास्त्राला आपलेसे म्हणावे म्हणायला पाहिजे का? अम्बेडकरी लोक आर्थिक समतेच्या बाजूला उभे नाहीत, त्याचा परिणाम ते स्वार्थी आहेत, तर त्यांच्या कड़े "बुद्धं शरणम गच्छामि" च्या पलिकड़ील कोणता नविन विचार आहे? उठले की सुटले चालले डोळे लावायला, तर अशाने सर्वंगीण प्रगतीचा धम्म गवसेल का?
भारतीय बौद्धाना धम्म माहित नसल्यामुळे ते दुसर्यांना योग्य पद्धतीने धम्म समजावू सकत नाही. त्यांचा अम्बेडकर सुद्धा पक्का नाही, त्याचा परिणाम ते फ़क्त बुद्ध अम्बेडकर यांच्या मुर्त्या/फोटोलाच धम्म समजत आहेत. तर्क विरहित अम्बेडकरी प्रचार म्हणजे मुजोरी आहे, जे इतरांना बोचत आहे, लोक दुक्खी होवून अम्बेडकर साहेबांना/त्यांच्या मुर्त्यांना अपमानित करीत आहेत. मुर्त्या/विहारे उभारण्या ऐवजी धम्म वर्ग घेवुन शिक्षण दिल्या शिवाय शाला/कालेज च्या शिक्षनाला विशेष महत्त्व नाही.
कोणी बाबासाहेब अम्बेडकर यांच्या मुर्त्यांना काले फासले तर त्यावर इलाज म्हणजे पोलिसात रिपोर्ट देने हा एक कायदेशीर मार्ग अम्बेडकरी जनतेला नेहमी दिसत आला आहे, जो मार्ग उचित, समुचित नाही. तसे करुण काय विपरीत प्रयोग थांबले का? कोणती ही हलचल ही विचारांनी प्रेरित असते, जे अशी कृत्य करतात ते अज्ञानी म्हणजे बाबासाहेब यांच्या मोठेपणाला जानत नाहीत. त्यांना ते कृत्ये करायाला जर कोणी उचकवले असेल तर त्यांना असे कृत्य करने अनुचित आहे, हे समजव्नारे डोके समोर आले का? जर त्या डोक्यांनि आपले काम सतत केले असते तर असे प्रकार घडले असते का? अम्बेडकरी जनतेच्या विरोधातील धग कमी करण्यासाठी अम्बेडकरी जनतेनी कोणते ठोस कार्य केले आहे? कधी कधी याला वोट दया, त्याला वोट दया, असे म्हणत राहिले.
भावनिक आक्रोश म्हणजे अम्बेडकरवाद नाही. पोलिसी दड़प शाहिच्या आधारे अम्बेडकरी मुर्त्यांची/चित्रांची/नावाची विटंबना थाम्बवता येइल, अशी जर बौद्धांची संजुत असेल तर ती त्यांनी लवकरात लवकर मनातून काढून टाकावी, अशी माझी अम्बेडकरी जनतेला विनंती आहे. गरीबी हटाओ, अमीरी हटाओ ...!