मंगलवार, 9 जून 2020

बुद्धाची धम्मक्रांती : सफल कि विफल? - 8


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमीवर महायानी भिक्षु चंद्रमणी यांनी त्रिसरण आणि पंचशील दिले. हे विचार बुद्धाचे म्हणायचे कि भिक्षूंचे? ते बुद्धाचे म्हटले तर ते नंतर त्रिपिटकात का घुसडण्यात आले? जुण्या चार निकायात होते का? “त्रिशरण आणि पंचशील” म्हणजे “धम्म” का? परंतु बाबासाहेबांनी त्याच्या जोडीला नंतर “२२ प्रतिज्ञा” दिल्या. त्या प्रासंगिक होत्या. त्यात सुद्धा ‘बुद्धाला’ त्यांच्या ‘धम्माला’ शरण जाण्याच्या प्रतिज्ञा आहेत पण ‘संघाला’ शरण जाण्याची एकही प्रतिज्ञा नाही हे विशेष आहे. या “२२ प्रतिज्ञा”त हिंदू देवी-देवता व त्यांचे अवतार, उपासना व त्यांच्या रूढींना नकार म्हणजे धर्मांतर आहे तर आर्य अष्टांगिक मार्ग, समता, पारमिता आणि पंचशील यांचा स्विकार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ५ जुलै १९४१ ला सायंकाळी मुंबईतील ‘सिद्धार्थ कालेजा’तील सभेत मनोगत व्यक्त केले, “बौद्ध धम्म हा तर्कावर अधिष्ठित धम्म आहे. या उलट हिंदुधर्माला तर्काची ओळख नाही. त्यांनी उदाहरणा दाखल सत्याचे विश्लेषण केले नाही. आपल्या इंद्रियांपैकी कोणत्याही एका अथवा अधिक इंद्रियाने एखाद्या वस्तूविषयी वा भावना विषयी साक्ष दिली तरच तेथे सत्याचा आविष्कार होतो, असे गौतम बुद्धाचे म्हणणे आहे. ज्या प्रसंगी इंद्रियाची साक्ष काढता येत नसेल त्या प्रसंगी सत्याऐवजी काहीतरी गुढ असल्याचे सांगण्यात येते. निस्वार्थपणे कार्य करीत राहावे हे बुद्धाचे मत असेल तर कोणीही ते कार्य का करावे? बुद्धाचे स्वतःचे मुळचे तत्वज्ञान व बुद्धाच्या मरणानंतर त्यांच्या शिष्यांनी भरती केलेले तत्वज्ञान यातील फरक प्रथम लक्षात घेतला पाहिजे, ज्याला इंग्रजीत Acquisitiveness (जास्त आधासिपणा) म्हणतात, तो दुर्गुण माणसांमध्ये जास्त असू नये, एवढेच बुद्धाचे म्हणणे होते.” (जनता दि.- ९ जुलै १९४९)
तसेच दिनांक ८ मे १९५५ ला नरेपार्क, मुंबई येथे भारतीय बुद्धजन समितीच्या वतीने बुद्धजयंती पार पाडण्यात आली तेथे बाबासाहेब म्हणाले, “बौद्ध धम्मामध्ये दोन (हीनयान व महायान) प्रकारचे लोक आहेत. या धम्माचे संशोधन करण्याचा माझा मार्ग नाही. माझे मुख्य कार्य प्रचार करण्याचे आहे. आम्हाला लोकांना बुद्धिष्ट करून घ्यावयाचे आहे, हेच माझे कर्तव्य होय.” (धम्मचक्र प्रवर्तनाय, संकलन- प्रदीप गायकवाड, पृष्ठ- २१४) त्यामुळे संशोधन न करता जो धम्म दिल्या गेला त्यात हिंदू विचारांची भेसळ राहिली आहे. तिला नाली काढून, दूर करून शुद्ध, आसील पाणी करण्याची त्यांची ईच्छा होती पण शरीर साथ देत नसल्याची सूचना त्यांनी वेळोवेळी दिली होती. एवढेच नाही तर “हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती” या मथळ्याखाली सन १९५० मध्ये बाबासाहेबांनी आपले विचार मांडले ते बघणे अति आवश्यक आहे, “ज्या मजकुराच्या आधारावर वादविवाद करावयाचा तो मजकूर मूळचाच आणि सत्य आहे कि तो नंतरच्या भिक्षूंनी घुसडून दिलेला आहे, हे ठरविणे, हा मुद्याचा प्रश्न आहे.
“बुद्धाच्या शिकवनुकीतील प्रमुख अंगे कोणती? याचे ज्ञान ज्याला आहे, त्याला सुत्तपिटक सद्याच्या अवस्थेत आहे, ते पाहून आश्चर्य वाटेल. सुत्तपिटक सध्या कोणत्या अवस्थेत आहे? बुद्धाच्या शिकवनुकीशी असबंध वाटणाऱ्या कल्पना आणि ब्राह्मणी विचारसरणीच्या पौराणिक कथा ‘बुद्ध देवा’च्या नावाखाली त्यात घुसडल्या आहेत. ब्राह्मणी मठसंप्रदायातील राहणीची अवास्तव वर्णने त्यात घालण्यात आलेली आहेत. ती राहणीच आदर्शमय होय, ती बुद्धधम्माची आदरणीय आचारपद्धती होय, हे सर्व भाषविण्यात आलेले आहे. सुत्त पिटकाचे सध्याचे विद्रूप आणि ओंगळ रूप पाहून ‘ऱ्हीस डेविड्स’ यांना आश्चर्याचा धक्काच बसला.... सुत्त पिटकाच्या पानापानात खरा गौतम दिसत नाही.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, खंड- ६, पृष्ठ- १४८, संकलक- मा. फ. गांजरे, नागपूर) ”असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. त्या भेसळीचा परिणाम काय झाला ते आपण पाहूया.

बुद्धाची धम्मक्रांती : सफल कि विफल?













बुद्धाने संवादातून धम्म समजावला. धम्मप्रचारासाठी संवाद आवश्यक आहे. समजावण्याची दुहेरी पद्धत उचित आहे. भाषण आणि प्रवचन या आधारे धम्म विचार थोपले जातात. समजल्याची खात्री झाल्यावर लोक ते चांगले आहे, ठीक आहे, समजले, फार सुंदर अशी टिप्पणी करून जायचे. आता भिक्षु प्रवचन देतात. ते अनेकांना समजत नाही. न समजल्याची तक्रार करण्यासाठी भिक्षु
जागाच ठेवत नाही. भिक्षूला गुरु समजावे. त्यांनी काही न समजणारे विचार सांगितले तरी ते शिष्याने मुकाट्याने पाळावे, हा कसला धम्म प्रचार? यातूनच भिक्षु-भिक्षूंनी “सत्यनारायण कथा” अर्थात “परित्राणसूत्र पाठा”च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या धर्मांतराला, धम्मदीक्षेला कात्री लावत आहेत. बाबासाहेबांनी बुद्धधम्माचे बीज पेरण्यासाठी आजन्म शेती तयार केली. त्यात आता महायानी भिक्षु हिंदू धर्माचे पिक घेत आहेत. आज शेतीचे त्या शेतीचे रखवाल कोणी आहे का? आधुनिक विज्ञानावर आधारित धम्म वा धम्माला वैज्ञानिक आधारावर प्रचारित करण्याचा प्रयत्न किती भिक्षु करतात? अंगाववर चिवर पांघरून विश्वाची पुनर्रचना करण्याचा आव आणणे भिक्षूंनी सोडायला हवे, नाहीतर तसे करून तरी दाखवायला हवे.
समाजाने व्यक्तीला शरण जायचे कि विचारांना? व्यक्ती म्हणजे उद्दिष्ट नाही. व्यक्तींचे हित हे उद्दिष्ट आहे. व्यक्तींचा समाज होतो, समाज कल्याण कि व्यक्ती कल्याण? समाज कल्याण म्हणजे जाती कल्याण असा अर्थ घेवू नये. समाज जातीतीत आहे. अनेक समाजांचा देश व अनेक देशांचे विश्व मानले तर विश्वाची पुनर्रचना करण्याचे मोठे उद्दिष्ट गाठले जाईल. व्यक्ती कल्याणातून हजारो वर्षापासून जगात भिक्षु आहेत आणि आतंकवादी, नक्षलवादी, भ्रष्टाचारी जगातील मानवी सुखाचा अंत करू पाहत आहेत. यात भिक्षुंचा प्रभाव मोठा आहे कि गृहस्थांचा? बहुजन म्हणजे समाज भिक्षूंनी समाजाला योग्य, उचित, समुचित, श्रेष्ठ, आदर्श, सम्यक, ‘बहुजन-हिताय, बहुजन-सुखाय’ संदेश दिला असता तर धम्मराज्य निर्माण झाले नसते का? भिक्षु हे जर गांधीसारखे टाटा-बिर्लांच्या ताटाखालचे मांजर बनले असतील तर काय फायदा?
बुद्ध कि कार्ल मार्क्स? यावर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला धम्म हि अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहित आहे कि कार्ल मार्क्स च्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्यांचा मताप्रमाणे “धर्म” म्हणजे काहीच नाही ज्यांना धर्माचे महत्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले. निवांत झोप मिळाली कि सगळ संपल. हे त्यांच तत्वज्ञान! मी त्या मताचा नाही, माझे वडील गरीब होते; म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळाले नाही. माझ्या इतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही म्हणून माणसाचे जीवन सुख-समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते, याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळी विरुद्ध मी नाही.
“आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच. पण मी यात एक महत्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोजू वैरण लागते. मानसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे कि रेडा व बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही, असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्यात मला काहीच कारण नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरव्ही मानव जातींचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही..... बुद्धाने सांगितले, जगात ९०% व्यक्ती दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसाना मुक्त करणे हे बौद्धधम्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा वेगळे असे कार्ल मार्क्स यांनी वेगळे असे काय सांगितले?” (नागपूरच्या दीक्षाभूमीवरील भाषण, दिनांक- १५ आक्टोंबर १९५६)
धर्मांतराच्या चळवळीतून नागपूरला धम्मदीक्षा नागपूरला घडली. यात ५ लाख गरीब, उपाशी उद्या पोटभर मिळेलच या आशेने लोकांनी बाबासाहेबांकडून दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी ते भुकेले राहू नये म्हणून जे प्रयत्न केले त्यातून फक्त १० % लोकांची पोटे भरली. उर्वरित ९०% लोक उपासीच आहेत. त्यांच्या पोटाला अन्न नसेल तर त्यांना बुद्धीची हालचाल कळेल का? बुद्धाने म्हटले, प्रथम उपाशी लोकांना ज्ञान नाही तर अन्न द्यावे. त्याला नंतर धम्म सांगावा. आता आपण कितीही भुकेल्या भारताला धम्म दिला तरी समजेल का? याचा सुज्ञ बौद्धांनी विचार करून धम्म प्रचाराला लागावे. तरच धम्माचा योग्य तो प्रभाव लोकांवर पडेल. बाबासाहेबांना अभिप्रेत आर्थिक लोकशाहीला किती काळ थोपवून धम्म प्रचाराचा गाढा समोर ओढता येईल? हा महत्वाचा प्रश्न आहे.
भुकेले लोग बौद्ध धम्म सोडून दुसरीकडे का भटकत आहेत? पोटासाठी कि उपशीपोठी धम्म न समजल्यामुळे? समाजाचे सर्व प्रश्न विचारात धम्म घेत होता पण आता त्याला फक्त संस्कृतीत बहिष्कृत करून कसे चालेल? धम्माला अर्थ, शिक्षण, सत्ता, आणि संस्कृती हे चारही प्रश्न सोडवत चालावे लागेल तरच सर्वांगीण समाज परिवर्तनाची गरज पूर्ण होईल. आज फक्त भरलेल्या ढेरपोट्या लोकांसाठीच धम्म ठरत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे. आजचे आंबेडकरी बौद्ध धम्माला फक्त पोट भरलेल्या, चैन करणाऱ्या लोकांसाठी मर्यादित करीत आहेत आणि उपाशी लोकांकडून धम्म आचरणाची अपेक्षा करतात, हे कसे शक्य आहे? आधी धर्मांतर कि आर्थिक समस्या? त्यापैकी धर्मांतर झाले पण आर्थिक समस्या सुटली नाही. जातिगत आरक्षणाने सुटणारच अशी कोणीही शाश्वती पण देवू शकणार नाही. त्यामुळे धम्म घातकी उलट जातिवाद वाढेल.
buddha and karl marks -👇👇👇 
https://youtu.be/TYFqKjxIlBg