डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमीवर "महायानी" भिक्षु चंद्रमणी यांनी "त्रिसरण आणि पंचशील" दिले. हे विचार बुद्धाचे म्हणायचे कि भिक्षूंचे? ते बुद्धाचे म्हटले तर ते नंतर त्रिपिटकात का घुसडण्यात आले? जुण्या चार निकायात होते का? “त्रिशरण आणि पंचशील” म्हणजे “धम्म” का? परंतु बाबासाहेबांनी त्याच्या जोडीला नंतर “२२ प्रतिज्ञा” दिल्या. त्या प्रासंगिक होत्या. त्यात सुद्धा ‘बुद्धाला’ त्यांच्या ‘धम्माला’ शरण जाण्याच्या प्रतिज्ञा आहेत पण ‘संघाला’ शरण जाण्याची एकही प्रतिज्ञा नाही हे विशेष आहे. या “२२ प्रतिज्ञा”त हिंदू देवी-देवता व त्यांचे अवतार, उपासना व त्यांच्या रूढींना नकार म्हणजे धर्मांतर आहे तर आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता आणि पंचशील यांचा स्विकार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ५ जुलै १९४१ ला सायंकाळी मुंबईतील ‘सिद्धार्थ कालेजा’तील सभेत मनोगत व्यक्त केले, “बौद्ध धम्म हा तर्कावर अधिष्ठित आहे. या उलट हिंदुधर्माला तर्काची ओळख नाही. त्यांनी उदाहरणा दाखल सत्याचे विश्लेषण केले नाही. आपल्या इंद्रियांपैकी कोणत्याही एका अथवा अधिक इंद्रियाने एखाद्या वस्तूविषयी वा भावना विषयी साक्ष दिली तरच तेथे सत्याचा आविष्कार होतो, असे गौतम बुद्धाचे म्हणणे आहे. ज्या प्रसंगी इंद्रियाची साक्ष काढता येत नसेल त्या प्रसंगी सत्याऐवजी काहीतरी गुढ असल्याचे सांगण्यात येते. निस्वार्थपणे कार्य करीत राहावे हे बुद्धाचे मत असेल तर कोणीही ते कार्य का करावे? बुद्धाचे स्वतःचे मुळचे तत्वज्ञान व बुद्धाच्या मरणानंतर त्यांच्या शिष्यांनी भरती केलेले तत्वज्ञान यातील फरक प्रथम लक्षात घेतला पाहिजे, ज्याला इंग्रजीत Acquisitiveness (जास्त आधासिपणा) म्हणतात, तो दुर्गुण माणसांमध्ये जास्त असू नये, एवढेच बुद्धाचे म्हणणे होते.” (जनता दि.- ९ जुलै १९४९)
तसेच दिनांक ८ मे १९५५ ला नरेपार्क, मुंबई येथे भारतीय बुद्धजन समितीच्या वतीने बुद्धजयंती पार पाडण्यात आली तेथे बाबासाहेब म्हणाले, “बौद्ध धम्मामध्ये दोन (हीनयान व महायान) प्रकारचे लोक आहेत. या धम्माचे संशोधन करण्याचा माझा मार्ग नाही. माझे मुख्य कार्य प्रचार करण्याचे आहे. आम्हाला लोकांना बुद्धिष्ट करून घ्यावयाचे आहे, हेच माझे कर्तव्य होय.” (धम्मचक्र प्रवर्तनाय, संकलन- प्रदीप गायकवाड, पृष्ठ- २१४) त्यामुळे संशोधन न करता जो धम्म दिल्या गेला, त्यात हिंदू विचारांची भेसळ राहिली आहे. तिला नाली काढून, दूर करून शुद्ध, आसील पाणी करण्याची त्यांची ईच्छा होती पण शरीर साथ देत नसल्याची सूचना त्यांनी वेळोवेळी दिली होती. एवढेच नाही तर “हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती” या मथळ्याखाली सन १९५० मध्ये बाबासाहेबांनी आपले विचार मांडले ते बघणे अति आवश्यक आहे, “ज्या मजकुराच्या आधारावर वादविवाद करावयाचा तो मजकूर मूळचाच आणि सत्य आहे कि तो नंतरच्या भिक्षूंनी घुसडून दिलेला आहे, हे ठरविणे, हा मुद्याचा प्रश्न आहे.
“बुद्धाच्या शिकवनुकीतील प्रमुख अंगे कोणती? सुत्तपिटक सध्या कोणत्या अवस्थेत आहे? बुद्धाच्या शिकवनुकीशी असबंध वाटणाऱ्या कल्पना आणि ब्राह्मणी विचारसरणीच्या पौराणिक कथा ‘बुद्ध देवा’च्या नावाखाली त्यात घुसडल्या आहेत. ब्राह्मणी मठसंप्रदायातील राहणीची अवास्तव वर्णने त्यात घालण्यात आलेली आहेत. ती राहणीच आदर्शमय होय, ती बुद्धधम्माची आदरणीय आचारपद्धती होय, हे सर्व भाषविण्यात आलेले आहे. सुत्त पिटकाचे सध्याचे विद्रूप आणि ओंगळ रूप पाहून ‘ऱ्हीस डेविड्स’ यांना आश्चर्याचा धक्काच बसला.... सुत्त पिटकाच्या पानापानात खरा गौतम दिसत नाही.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, खंड- ६, पृष्ठ- १४८, संकलक- मा. फ. गांजरे, नागपूर) ”असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. त्या भेसळीचा परिणाम काय झाला ते आपण पाहूया.
महायानी साहित्य विश्वास कर्णयायोग्य नाही, ज़री ते त्रिपिटक या ग्रंथ भंडरात असले तरी त्याची मीमांसा करने आवश्यक आहें, ते न करता बुडिज़म चा प्रचार केल्यास *बहुजन हित-सुख* करता येनार नाही, माझ्या अभ्यासत फ़क्त आर्य अष्टांगिक मार्गा शिवाय दूसरे कोणते ही विचार धम्म उद्धेश पूर्ति करण्यास मदत करु शकत नाही_ पांच शील, १० पारमिता, विपस्सना, ध्यान - समाधि, पूजा-पाठ, बोधिसत्व कल्पना, पूर्वजन्म-पुनर्जन्म ही विषय बुडिज़म पासुन भटकनती करण्या साठी निर्माण करन्यात आले आहेत, त्या पासुन सावध राहने / दूर राहने जनतेच्या फ़ायद्याचे आहें।
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें