शनिवार, 15 जून 2013

बुद्ध, धम्म आणि त्यांचा संघ


र्य अष्टांगिक मार्गातून एकही मार्ग उना केला तरी धम्म समजता येणार नाही, एवढे ते महत्वाचे आहेत. बाबासाहेबांनी पुढे लिहिले, “सम्यक दृष्टी विकसित करणे याचा अर्थ ‘प्रतीत्य समुत्पादा’च्या “कार्यकारण भावा”ला विकसित करणे होय.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म; ४:४: सद्धधम्म, १:४)

(१) सम्यक दृस्टी- सम्यक म्हणजे उचित, श्रेष्ठ, परम आदर् आणि दृष्टी म्हणजे दृष्टीकोन, विचार, तत्वज्ञान ही सम्यक विचारांतील प्रथम पायरी आहे. त्यात “कार्यकारण सिद्धांत” म्हणजे “ह्या चे कारण हे आहे”. “ह्या मुळे हे होते”, “हे असेल तर ते होते,” पण “हे नसेल तर ते होणार नाही,” याचा बोध केला आहे. ते क्रमश: परस्परावलंबी, परस्परपूरक असून ते विचार धम्म राज्याला पूरक आहेत.
* अज्ञान * संस्कार * विज्ञान * नामरूप * षडायतन * स्पर्श * वेदना * तृष्णा * उपादान * भव * जन्म * उपायास ह्या एकूण १२ अंगाचा अर्थ अज्ञानामुळे संस्कार, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे षडायतन, षडायतणामुळे स्पर्श, स्पर्शामुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपदानामुळे भव, भवामुळे जन्म आणि जन्मामुळे उपायास अर्थात रोग, दुःख, निर्माण होते. दुःखाचे कारण केवळ एकटीच तृष्णा नसून इतर ११ अंगेही आहेत.
(२) सम्यक संकल्प- सम्यक दृष्टी प्रमाणे उचित निश्चयाचा सतत अंगीकार.
(३) सम्यक वाणी- सम्यक संकल्पा नुसार उचित संवाद सतत उपदेश.
(४) सम्यक कर्म- सम्यक वाणी प्रमाणे उचित कार्याचा सतत वर्तन.
(५) सम्यक आजीविका- सम्यक कर्मा नुसार उचित सदाचाराची सतत कामना.
(६) सम्यक व्यायाम- सम्यक उपजीविके प्रमाणे उचित प्रयत्नांची सतत सवय.
(७) सम्यक स्मृती – सम्यक व्यायामा नुसार उचित आठवणीची सतत जागृती.
(८) सम्यक समाधी- सम्यक स्मृती नुसार “उचित चित्ताची एकाग्रता”. ज्यातून धम्मराज्य म्हणजे विश्वाची पुनर्रचना होईल.

बुद्धाचा धम्म आदर्श लोकशाहीच्या निर्मितीसाठी कार्यरत प्रयत्न होता. त्यामुळे वर्णवादी लोकांचा समाजातील मान-सम्मान अपमानात बदलला. काही ब्राह्मणवादी लोक चिडले आणि बदला घेण्याच्या उद्धेशाने काहींनी संघदिक्षा घेतली. त्यातून मान-सम्मान मिळाला आणि धम्माला पोखरण्याचे कार्यही सुरु झाल्याचे समाधान मिळाले. बुद्ध धम्मात बहुसंख्य भिक्षु ब्राह्मण वर्गातील होते. म्हणूनच त्यापैकी काही अप्रामाणिक, कपटी निघाले. जे बुद्ध वचनाऐवजी आपली वचने बुद्धवचन म्हणून समाजात प्रचलित करीत होते. तशाप्रकारच्या तक्रारी बुद्धाजवळ आल्या असता त्यांनी धम्मवचनाला तर्कबुद्धीने तपासूनच अंगीकारण्याच्या सूचना केल्या.

बुद्धाच्या हयातीत काही भिक्षु बुद्धाला चमत्कारी पुरुष, गुढज्ञानी समजत होते. म्हणूनच किसा गौतमी आपल्या मेलेल्या मुलाला जीवंत करण्यासाठी बुद्धाजवळ आली होती. त्यामुळेच भिक्षु आनंदाने बुद्धाच्या अंतिम समयी "चमत्कारी" विचाराला वाचा फोडण्यासाठी सर्व भिक्षूंच्या उपस्थितीत विचारले होते कि, काही विशेष (गुप्त) संदेश असेल वा उत्तराधिकारी नियुक्तीचा त्यांचा विचार असेल तर तो त्यांनी सर्वांसमोर (भिक्षु संघासमोर) व्यक्त करावा.

त्यावर बुद्धाने सांगितले कि “जनतेच्या हिताचा कोणताही संदेश मी द्यायचा बाकी ठेवलेला नाही. जो आवश्यक होता तो वेळोवेळी सर्व दिलेला आहे. माझ्या पश्चात भिक्षूंच्या विनायासंबंधी विवाद महत्वाचा नसून धम्मासंबंधी विवाद झाला तर तो संघांने एकत्र बसून अंतिम निर्णय होत नाही तोवर चर्चा करून “बहुमताने” सोडवायला पाहिजे. यानंतर धम्मच भिक्षु संघाचा व उपासकांचा आदर्श असेल.” (तथागत बुद्धाने या महत्वपूर्ण संदेशात "विपस्सनेचा" सन्देश दिला नव्हता, पण जर कुणाला माहिती असेल की त्यात विपस्सनेचा सन्देश सुद्धा सम्मिलित होता, तर तो त्यांनी जन प्रबोधनासाठी सादर करावा.)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें