दिनांक २९ नोव्हेंबर १९४४ ला पुण्यात झालेल्या आपल्या ओजस्वी भाषणात डॉ. बाबासाहेबांनी हिंदुधर्माची पोलखोल केली, त्यात ते म्हणले, “वेद हे ईश्वरनिर्मित आहेत, अपौरुष आहेत, अशी त्याची वानगी सांगण्यात येते. पण त्याला इतिहासात कोठेच पुरावा नाही, ..... वेद प्रणीत धर्मास बुद्धाने धक्का दिला. हा बुद्धधम्म वेदप्रामाण्य कधीच मानीत नव्हता......खरे पाहिले तर वेद दोनच आहेत. एक ऋग्वेद व दुसरा अथर्ववेद. मी वेद कितीतरी वेळा वाचले आहेत. त्यांत समाजाचा, मानवाच्या उन्नतीसाठी कोणतीही नैतिक पोषक तत्वे सांगितली नाहीत.
"अथर्ववेदात बायको प्रेम करीत नसेल तर काय करावे? दुसऱ्याची बायको कशी वश करावी? द्रव्य हराम कसे करावे? हे सांगितले असून (मंत्राने) जारण-मारण कसे करावे हे सांगितले आहे. “वेदातील पुरुष शुक्तात ब्राह्मणांपासून शुद्रांपर्यंत कोणी कसे वागावे हे दिले आहे. बुद्धाचा याच बाबीवर कटाक्ष होता व त्याच दृष्टीने चातुर्वर्ण्यावर त्यांनी टीका केली आहे. क्षत्रियांनी मारणे हे त्याचे कर्तव्य आहे’ असे सांगितले आहे. एकाने दुसऱ्याला मारणे हे जरुरी असू शकेल पण कर्तव्य ठरणार नाही...
"गीतेच्या दुसऱ्या अध्यायात १८ ते ३ श्लोकात वेदांताचा आधार घेवून आत्मा अविनाशी आहे. देह जरेने किंवा अन्य कारणाने नाहीसा होणारच, असे विवरण केलेले आहे. परंतु विचार करा कि, एखाद्या खुनी खटल्यात वकिलाने जजास सांगितले कि, ‘साहेब आत्मा अविनाशी आहे. तेव्हा खुणा बाबद आरोपीस शिक्षा का करता?’ तर हे वकिलाचे म्हणणे कसे दिसेल?...... वेदांवर बुद्धानेच नव्हेतर चार्वाक आदी विद्वानानीही टीका केली आहे. बुद्धाच्या वेदांवरील हल्यामुळेच शूद्रांचा सदाधर्म जाऊन ते राज्यकर्ते झाले.”
महाबोधी सोसायटीच्या मासिकासाठी सन १९५० मध्ये मे महिण्यात लेख लिहिण्याची विनंती बाबासाहेबांना करण्यात आली त्यात बाबासाहेबांनी लिहिले, “विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. जर आधुनिक जगाला वाचवायचे असेल तर त्याला बौद्धधम्माची कास धरावी लागेल..... बुद्धाने आपला अहंकार पूर्णपणे जिंकून टाकला होता, हेच त्यांचे वैशिष्टय. ‘मी देवाचा पुत्र असून माझ्या द्वारेच जनतेला मोक्ष प्राप्त होईल’ असे येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये पदोपदी बजावून सांगितले आहे. मुहम्मद पैगंबराने तर येशूच्या पुढे एक पाऊल जाऊन ‘मी देवाचा प्रेषित आहे’ असे सांगितले आणि कृष्णाने तर विचारूच नका वरील दोन्ही संस्थापाकांवर मात करून ‘मी देवोधीदेव परमेश्वरच आहे.’ येथे विज्ञान कुठे आहे?
काशी विद्यापीठातील दिनांक २५ नोव्हेंबर १९५६ च्या आपल्या भाषणात वैज्ञानिक उपदेशात बाबासाहेब ठासून म्हणाले, “बुद्धांची चातुर्वर्ण्य विरोधाची तीव्रता ब्राम्हणांच्या मनात सतत डोचत राहिली. म्हणूनच चातुर्वर्ण्याविषयी मुक असलेल्या निरीश्वरवादी सांख्यचार्य कपिल मुनीस ब्राम्हणांनी आपले म्हटले परंतु बुद्धाशी नेहमी वैर मांडले....
"बुद्धाचा वैदिक धर्माला पाचवा विरोध देव आणि आत्मा यांच्या अस्तित्वाबाबादचा होता. बुद्धाच्या मते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, न्यायी, प्रेममय अशा देवाचे अस्तित्व ज्ञानाची साधने जी पंचेंद्रिय आणि तर्क यांच्या सहाय्याने सिद्ध करता येत नाही एका माणसाने दुसर्याशी कसे वागावे? आणि सर्व माणसे सुखी कसे होतील? हे शिकवणे बुद्धधम्माचे मुख्य कार्य आहे. म्हणून धम्माचा देवाशी संबंध येत नाही. देवाचे अस्तित्व केवळ पोकळ तर्कांवर Speculation वर आधारलेले आहे आणि या अस्तित्वाच्या श्रद्धेतून पूजा, प्रार्थना, पुरोहित इत्यादी अष्टांग मार्गातील “समाधी घटक” अशा खुळ्या समजुतीचे (Superstition) पेव फुटले.
“प्रतित्य समुत्पाद’ या त्यांच्या सिद्धांतात देवाच्या अस्तित्वावर सर्वसामान्य तार्किक स्वरूपाचे आक्षेय घेतलेले आहेत...... वेदांतील मोक्ष सिद्धांत म्हणजे आत्म्याचे ब्रह्म्यात विलीन होणे, यालाही तर्कदुष्ट ठरवून आणि मानवी जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी म्हणून बुद्धाने विरोध केला आहे. ब्रह्मविषयक बुद्धाची विचारसरणी त्याच्या वरिष्ठ व भारद्वाज या दोन ब्राह्मनांशी झालेल्या संवादात व्यक्त झाली आहे. बुद्धाचे आत्माच्या अस्तित्वावरील व्यवहारिक दृष्टीचे आक्षेप, त्याच्या देव कल्पनेवरील आक्षेयासारखे आहेत. शिवाय तो आत्माचे म्हणून समजले जाणारे व्यापार नामरूप या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट करून दाखवितो. कायेच्या उत्पत्तीबरोबरच जाणीवेचा (Consciousness) प्रारंभ होतो. इच्छा, भाव व विचार ही कार्य जानिवेचीच आहेत. तेव्हा ‘आत्मा’ हे वेगळे तत्व गृहीत धरण्याची आवश्यकताच उरत नाही.
“बुद्ध धम्माच्या ऱ्हासाचे मुख्य कारण इस्लामी आक्रमण आहे. त्यांच्या भाषेत मूर्तीला ‘बुत’ असे म्हणत बुतशिकन म्हणजे मूर्तिभंजक होते. हे त्यांच्यामध्ये गाझीपनाचे लक्षण होते. हिंदुपेक्षा बुद्धांवर चढविलेले त्यांचे हल्ले अधिक हिंस्त्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेल्या बौद्ध भिक्खुंच्या कत्तलीने ११ पासून १३ व्या शतकापर्यंतची इतिहासाची पाने रक्ताने रंगलेली आहेत. नालंदा सारख्या जगविख्यात विद्यापीठाचा त्यांनी पूर्ण नाश केला. हिंदुप्रमाणे बौद्धांमध्ये धर्मप्रचाराचे पिढीजात काम करणारा ब्राम्हणासारखा वर्ग नसल्याने भिक्खुंच्या कत्तलीनंतर बौद्ध धम्माचा झपाट्याने ऱ्हास सुरु झाला. सत्याचाही कधी कधी पराभव होतो. ह्याचे हे एक उदाहरण आहे. परंतु आज त्यानंतर ६०० वर्षांनी भारताला बुद्धाची आठवण होत आहे. आणि आज जर त्याने बुद्धाच्या शिकवणुकीचा त्याग केला नाही तर त्यांचे भवितव्य ठीक नाही.” (प्रबुद्ध भारत-२४/८/५७)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें