रविवार, 16 जून 2013

सम्यकमार्ग म्हणजे धम्म


म्यकमार्ग म्हणजे धम्म. तथागत गौतम बुद्धाने ई.सा.पूर्व- ५२८ मध्ये “सारनाथ” येथे “प्रथम धम्मचक्र परिवर्तन” केले. त्यात त्यांनी “आर्य अष्टांगिक मार्ग” या मध्यम मार्गाचे प्रबोधन केले. ते सुखी जीवनाचे उत्तम, “आदर्श तत्वज्ञान” होते. ते समजून घेने काळाची गरज आहे. त्यातील आठही मार्ग परस्पर पूरक आहेत. त्यातून एकही उना केला तरी धम्म समजता येणार नाही, एवढे ते महत्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले, “सम्यक दृष्टी विकसित करणे याचा अर्थ ‘प्रतीत्य समुत्पादा’च्या “कार्यकारण भावा”ला विकसित करणे.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म; ४:४: सद्धधम्म, १:४) 


१. सम्यक दृस्टी- सम्यक म्हणजे उचित, श्रेष्ठ, परम आदर् आणि दृष्टी म्हणजे दृष्टीकोन, विचार, तत्वज्ञान ही सम्यक विचारांतील प्रथम पायरी आहे. त्यात “कार्यकारण सिद्धांत” म्हणजे “ह्या चे कारण हे आहे”. “ह्या मुळे हे होते”, “हे असेल तर ते होते,” पण “हे नसेल तर ते होणार नाही,” याचा बोध केला आहे. हा परस्परावलंबी, परस्परपूरक सिद्धांत बारा अंगावर अधिष्ठित आहे. ते विचार धम्म राज्याला पूरक आहेत.

१. अज्ञान- चार महाभूतरूपी मानवीय रज व विर्यातून कलल, अर्बुदरुपी असर्वज्ञ जीव म्हणजे परिणाम. 
२. संस्कार- गर्भात सप्तधातू रस, रक्त, मांस, मज्जा, मेद, अस्थी व वीर्य यांच्या मदतीने पेशींची उत्क्रांती. 
३. विज्ञान- पदार्थामुळे मेंदू, डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा या भौतिक अनात्म स्नायूंचा विकास होतो.
४. नामरूप- नाम म्हणजे चेतना, मन, चित्त, विचार व रूप म्हणजे शरीर, काया, देह यांचा अनात्म सहयोग. 
५. षडायतन- पंचेद्रियांच्या मदतीने मेंदूसारख्या सहाव्या इंद्रियाच्या तर्कज्ञानाने सत्याची परीक्षा संभव. 
६. स्पर्श- बाळाचे गर्भातून बाहेर पडून बाह्य जगाचा बाळाला स्पर्श होणे म्हणजे मानवी, अनीश्वर कृती सिद्ध. 
७. वेदना- भौतिक-अभौतिक गरजा क्षमविण्यासाठी आईच्या दुधाची व प्रेमाची दु:खदायी धडपड. 
८. तृष्णा- शारीरिक व मानसिक ईच्छेची अभौतिक वेदना दूर करण्याचा सतत संघर्ष. 
९. उपादान- भौतिक, अन्न, पाणी, हवा उष्णता व अभौतिक दया, प्रेम या तृष्णेच्या पूर्तीसाठी आशावादी प्रयत्न. 
१०. भव- शारीरिक दैनंदिन गरजा आणि मानसिक पद, पैसा, प्रतिष्ठा, किर्तीचा आहारी जाने. 
११. जन्म- ईच्छापूर्तीसाठी अप्रमादी, जागृत, विज्ञानी बनून दु:खाचा उदय रोखणे . 
१२. उपायास- शरीर म्हणजे क्षणभंगुर, अनित्य, परिवर्तनीय असल्याने रोग, म्हातारपण, मृत्यु, शोक, दु:ख ही अटळ प्रक्रिया आहे. म्हणून शरीराच्या षडायतनचा (इंद्रियांचा) अवास्तव लाड नको, त्यातून महाभयंकर दु:ख निर्माण होते. 

नैसर्गिक वैज्ञानिक ज्ञानाच्या अभावामुळे अज्ञान, अज्ञानामुळे संस्कार, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे षडायतन, षडायतणामुळे स्पर्श, स्पर्शामुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपदानामुळे भव, भवामुळे जन्म आणि जन्मामुळे दुख, हा प्रतिलोम, अधोगतीला दर्शवणारा मार्ग आहे तर अनुलोम, पुरोगामी मार्ग ज्ञानापासून सुरु होऊन सुखापर्यंत पुढे-पुढे सरकत असतो. ह्याचे प्रतिलोम-अनुलोम अंग म्हणजे एकूण २४ भाग आहेत. जर कार्यकारण सिद्धांताची ‘सम्यक दृष्टी’ समजली तर ‘आर्य अष्टांगिक मार्ग’ अर्थात धम्म समजणे सहज सोपे आहे.

२. सम्यक संकल्प- सम्यक दृष्टी प्रमाणे सम्यक, श्रेष्ठ, परम, आदर्श, उचित निश्चयाचा सतत अंगीकार.
३. सम्यक वाणी- सम्यक संकल्पा नुसार सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श संवाद व प्रवचनाचा सतत उद्घोष.
४. सम्यक कर्म- सम्यक वाणीप्रमाणे सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श कर्तव्य, कार्याच्चा सतत आविष्कार.
५. सम्यक आजीविका- सम्यक कर्मानुसार सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श सदाचाराची सतत कामना.
६. सम्यक व्यायाम- सम्यक उपजीविके प्रमाणे सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श प्रयत्नांची सतत सवय.
७. सम्यक स्मृती – सम्यक व्यायामा नुसार सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श स्मरण, आठवणीची सतत जागृती.
८. सम्यक समाधी- सम्यक स्मृती नुसार सम्यक, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श चित्ताची एकाग्रता ठेवून ‘बहुजन हित आणि सुख’ जोपासण्याची सतत अपेक्षा, ज्यातून धम्मराज्य म्हणजे विश्वाची पुनर्रचना साकार करता येईल.

बहुजन म्हणजे बहु + जन, अनेक + लोक, अनंत + जनता, सर्व + लोक. विशिष्ठ संख्येत सामावलेले, केवळ दुःखीच नव्हे तर सुखी लोक सुद्धा. बहुजन म्हणजे दुःखी, कष्टी लोक असा त्याचा संकुचित अर्थ नाही बहुजन म्हणजे एक नव्हे, तर सर्वच समजावे. बहुजन शब्दात व्यक्तिगत नव्हे तर सामाजिक अर्थ आहे. हाच अर्थ बुद्धाच्या प्रत्यक्ष कृतीतून साकार झाला आहे. प्राचीन गणराज्य पद्धतीवर सुद्धा वर्णव्यवस्थेची छाप होती. शक्य संघ हे गणराज्य पद्धतीप्रमाणे कार्य करायचे परंतु त्याचा सेनापती “ब्राम्हण” होता. क्षत्रिय वर्गाच्या संघात ब्राम्हणाचे कार्य काय दर्शवतो? गणराज्य पद्धती हि वर्णवादी विचारांनी बरबटलेली होती. सिद्धार्थाने वर्ण व्यवस्थेचा अभिमान केला नाही. उलट तिला तोडण्यासाठीच ब्राम्हण शाक्य संघ सेनापतीच्या आदेशाचे पालन न केल्याने शाक्य विरुद्ध कोलिय यांच्यातील युद्ध टाळले. 

शाक्य संघाचे सभासद सिद्धार्थचे चुलत भाऊ “आनंद” सुद्धा होते. ते भिक्षु संघात दाखल होताना ‘उपाली’ नावाच्या नाव्यास घेवून आले. बुद्धाच्या भिक्षु संघात वर्ण व्यवस्थेला स्थान नाही हे सिद्ध करण्यासाठी आनंदाच्या आधी उपालीला दीक्षा दिली व संघात त्यांचे स्थान आनंदाच्या “क्षत्रिय” वर्णापेक्षा महान ठरविले. भिक्षु संघात जो प्रथम दीक्षा घेतो त्याला नंतर दीक्षा घेणारा नेहमी मान देत असतो. ही गुणांची दीक्षा असते, जन्माची नाही. जन्मावर आधारलेल्या वर्ण व्यवस्थेचा विरोध हा बुद्धाच्या भिक्षु संघातील नियामांवरून दिसून येते. जाती, धर्मावर आधारित बहुजनांची कल्पना बुद्धाची नव्हतीच हे या ठिकाणी बौद्ध जनतेनी समजून घ्यावे. तर आणि तरच बुद्धाचे धम्मराज्य विश्वात प्रस्थापित होऊन ते सतत नांदू शकेल. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “बुद्ध आणि त्यांचा धम्म”च्या प्रस्तावनेत उल्लेख केला, “मी हे नमूद करू इच्छितो कि बुद्धीझमचा अभ्यास करावयास आवश्यक तीन पुस्तकाच्या संचातील हे (बुद्ध आणि त्यांचा धम्म) एक पुस्तक होय. अन्य दोन पुस्तके म्हणजे १. बुद्ध आणि कार्ल मार्क्स व २. प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती आहेत, ते लवकरात लवकर प्रसिद्ध होतील, अशी मी आशा करतो.” धम्म म्हणजे हिंदुधर्म नाही आणि साम्यवाद सुद्धा नाही. धम्म म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. धम्म म्हणजे “आदर्श लोकशाही.” आदर्श लोकशाहीच्या निर्मितीसाठीच गौतम ने “आर्य अष्टांगिक मार्ग” म्हणजे “परम सुखाचा मार्ग” सांगितला आहे. 

आर्य अष्टांगिक मार्गातील प्रथम दोन मार्ग म्हणजे ‘सम्यक दृष्टी’ व ‘सम्यक संकल्प’ हे आदर्श दृष्टीकोन, विचार, प्रज्ञा, बुद्धिमत्ता, तत्वज्ञान व आदर्श निश्चय दर्शक आहेत, त्यातून आदर्श “न्याय” बुद्धी प्राप्त होते. तीन व चार क्रमांकाच्या सम्यक मार्गातून वाचा व कर्माचा बोध होतो त्यातून आदर्श संवाद, संभाषण, भाषण व त्यावर आधारित कार्य, कर्तव्य, काम म्हणजे “बोले तैसा चाले” या न्यायनिष्ठ आदर्श “स्वातंत्र्य” विचारांचा बोध होतो. पाच व सहा या क्रमांकाच्या सम्यक आजीविका व सम्यक व्यायाम या आदर्श सदाचारी आचारातून उचित प्रयत्न, सवयीने न्याय-स्वातंत्र्यनिष्ठ आदर्श “समता” मूलक विचारांचा बोध होतो. तसेच सातव्या व आठव्या मी सम्यक स्मृती व सम्यक समाधी मार्गातून आदर्श आठवणीची, स्मरणीय मनाची एकाग्रता म्हणजे आदर्श “बंधुभाव” जाणवतो. 

न्याय, स्वतंत्रता व समतेशिवाय ‘बंधुत्वाला’ अर्थ नाही. ते सुद्धा न्याय, स्वातंत्र्य आणि समतेवर अधिष्टीत हवे. ज्या प्रमाणे अष्टांगिक मार्ग परस्परांना पूरक आहेत त्याच-प्रमाणे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव हे नैतिक आहेत सुद्धा परस्पर पूरक आहेत. त्याशिवाय लोकशाहीची व्याख्या अपूर्ण आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें