सोमवार, 1 जुलाई 2013

शाहू महाराज म्हणतात, "आर्य विदेशी नाहीत"... !


(कानपूर, उत्तर प्रदेश, येथील शाहू महाराज यांचा ऐतिहासिक भाषणातील काही भाग, दिनांक १९ एप्रिल, १९१९; पृष्ट- ८३४, ८३५ व ८३६)

"ज्या देशात आपण राहतो त्या देशाचे नाव “आर्यावर्त” असे आहे. याला आर्यावर्त म्हणायचे कारण असे कि येथे प्रथम “आर्य” लोकांनी वसाहत केली. या देशाच्या रहिवास्यांना “आर्य” म्हणत असत. आर्याचे मूलस्थान “तिबेट” (त्रिष्टीत, तिब्बात). आर्य प्रथम दोन वर्णाचे होते. एक आर्यवर्ण आणि दुसरा दस्यूवर्ण. हे सर्व एकाच आईबापापासून जन्मलेले होते.

आर्यांच्या गुंकर्माचा स्वीकार करून दस्यू लोकांना आर्य होता येत असे. आर्य लोक दस्यूंचे गुणधर्म स्वीकारून “दस्यू” बनत असत. आर्यांची सामाजिक कार्य जसजसी वाढू लागली तसतशी ती करण्याकरिता चार वर्णाची स्थापना झाली. ‘निरुक्त’ मध्ये वर्ण शब्दाचा अर्थ “वर्णो वृनोति” अर्थात धर्मचरणाने खालचा वर्ण वरच्या वर्णात जावू शकतो. तसेच वरचा वर्ण अधर्म्चारणाने खालच्या वर्नाप्रत जातो. वैदिक काळापासून ते महाभारताच्या काळापर्यंत हि मर्यादा राहिली आहे.

वेदांचा सांगोपांग व समजून उमजून अभ्यास करणे, दुसर्यास शिकविणे, दुसरे यज्ञ आदिकरून कर्म स्वत: करणे व दुसऱ्याकडून लार्वोमे, तिसरी गोष्ट, दान घेणे आणि देने हे ब्राह्मकर्म.

शांती, मनोनिग्र, ताप, आतून व बाहेरून स्वच्छता, क्षमा, सरळपणा, ज्ञान, विज्ञान (ईश्वर, जीव, प्रकृती यांचे ज्ञान) यांचे आस्तिक्यभाव हि ब्राह्मणांची कर्मे होत.

प्रजेचे रक्षण करणे, प्रजेच्या कल्याणाकरिता दान देणे, होम करणे, वेदांचे पठण करणे, युद्ध करणे, निर्भयपणे राहणे, धर्यवान होणे, युद्धात चार्तुर्य, विषयात न रमणे, न फासणे, युद्धातून परत न फिरन, प्रजेच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणे, ईश्वरावर दृढ विश्वास ठेवणे हे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्तव्य होय. 

जनावरे पाळणे व त्यांची वाढ करणे, दान देणे, यज्ञादी कर्म करणे, वेदाचे सांगोपांग अध्ययन करणे, देशाबाहेर जावून व्पायार करणे, सावकारी करणे, शेतकी करणे, हे वैश्याचे कर्तव्य आहे.

शिल्पकलेचे ज्ञान मिळविणे व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या कामात मदत करणे हे शूद्रांचे कर्तव्य होय.

वैदिक काळात अशाप्रकारची स्वतंत्रता होती कि जो कोणी एखाद्या वर्णाचे कर्तव्य करी त्याला त्या वर्णात सामील करून घेतले जाई. वेद काळात शास्त्रांचा अभ्यास करण्यास प्रत्येक स्त्री-पुरुषास अधिकार होता. वैदिक काळात सर्व वर्गाचे लोक वृशी झालेले आहेत. जोपर्यंत स्त्रिया मंत्र जाननाऱ्या होत्या तोपर्यंत आर्यावर्त स्वर्गाप्रमाणे होता. स्त्रियांनी व शूद्रांनी वेद वाचू नयेत.

कल्पित श्रुतीचा आवाज आकाशातून सुद्धा काढू देत नसत. त्यावेळी वर्ण व्यवस्था वंशपरंपरा रजिस्टर झाली तेव्हा एका वर्णाच्या मनुष्यांनी दुसऱ्या वर्णाचे काम करणे कठीण होऊ लागले आणि लोक आपल्या वर्णातील कर्तव्यापासून हळूहळू मुकु लागले. समाजाची घडी बिघडू लागली. शेवटी जी वर्णव्यवस्था ‘गुणकर्मावर’ आधारित होती ती ‘जन्मावर’ येवून बसली.

याप्रकारचे नियम करून त्याविरुद्ध कोणाची ‘ब्र’ काढण्याची छाती होवू नये, म्हणून ते ‘स्मृती’मध्ये घुसडून दिले.

वर्ण व्यवस्था जन्मावर आहे म्हणावे, दुसऱ्या कोणालाही ब्राह्मण म्हणता काम नये. तसेच ज्यांचे आईबाप क्षत्रिय तोच क्षत्रिय, मग त्यांच्यात गुण असोत कि नसोत. ज्यांचे आई-बाप वैश्य तोच वैश्य. ज्यांचे आई-बाप शुद्र तो शुद्र, मग त्यांच्यात कितीही प्रतीचे गुण असोत. जे जुने ब्राहमण, क्षत्रिय, वैश्य गुणकर्मावरून श्रेष्ठ होवून जन्माचा अभिमान जसजसे धरू लागले तसतसे नव्या मनुष्याला ब्राहमण, क्षत्रिय, वैश्य होतानसे झाले. या पद्धतीच्या योगाने हिंदूंची जी अधोगती झाली ती इतिहास वाचकाला पूर्ण अवगत आहे. 

याच समयी चार वर्णाच्या पाच हजार जाती झाल्या. यामुळे हिंदूंचे सामाजिक बळ र्हास पाऊ लागले. प्रत्येक जात दुसऱ्या जातींशी खाणे-पिणे करीत नसून लग्न संबंध हि करीत नाही. एका जातीवर अन्याय झाला तर दुसरी जात डोळे उघडे ठेवून पाहत राहते. त्याबद्धल तिला थोडीही दया येत नाही. खरोखर मानवी प्राण्यांची एकच जात आहे. जातींचे लक्षण हे शास्त्र्कारांंनी लिहून ठेवले आहे."

बाबासाहेब आंबेडकर यांच्या "हु वेअर दी शुद्राज?" मधील आर्य विएशी नाहीत आणि शाहू महाराज यांच्या विचारात साम्य आहे. पण बामसेफ म्हणते की ते विदेशी आहेत, तर त्यांनी आपली भुकिका स्पष्ट करतांना अम्बेडकर व् शाहू यांच्या विचारांना प्रथम खोडून काढण्याचे धारिष्ट करावे, अन्येथा ते बाळ गंगाधर तिलक यांचे भक्त आहेत, हे सिद्धि होइल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें