सत्यनारायण गोयनका हे हिंदू आहेत आणि त्यांनी जो धम्मावर मार्गदर्शन करण्याचा सपाटा चालविला आहे तो किती प्रमाणात विश्वासपूर्ण आहे? या गोष्टींचा आंबेडकरी जनतेने गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. ते बुद्ध विचारात भ्रम निर्माण करणारे भाष्य करीत आहेत. त्यांचे खंडण करण्याची जबाबदारी उच्च शिक्षित आंबेडकरी जनतेची आहे मात्र ती पार पाडण्याऐवजी त्यांचे हस्तक बनून कार्य करीत आहेत. ही फार चिंतेची बाब आहे.
“शाम तागडे” (“I am an IAS officer of 1991 batch. I graduated in Mechanical Engineering in 1986 from VNIT Nagpur. Since 1999 I am actively involved in the practice and propagation of Buddha Dhamma. My book BUDDHA DHAMMA MISSION OF BODHISATTA AMBEDKAR was published in 2004. It has since been translated in Marathi and Telugu languages. My Marathi book BODHISATTVA AMBEDKARANCHI DHAMMASANKALPANA: VIPARYASA ANI VASTAVA was published in 2007. I am inspiring people for the practice of eight precepts and eightfold path as taught by the Buddha.”- Shyam Tagde).
हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने मोठे झाले आणि सत्यनारायण गोयनका सारख्या यांच्या कट्टर हिंदू सोबत एकनिष्ठ होवून कार्य करण्यासाठी लेखणी झिजवित आहेत. ही बाब म्हणजे आंबेडकरी आंदोलनाला बोथड करण्याचे कार्य असून ते कुठेतरी थांबायला हवे. ब्रह्म देशातील बौद्धधर्म म्हणजे “महायानी” अर्थात हिंदुधर्मच आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला “नवयान” बुद्धधम्म यात खूप फरक आहे. हे मला नव्याने समजावून सांगण्याची गरज नाही.
बघा, “एप्रिल १९९९ मध्ये श्री सत्यनारायण गोयनका यांनी लिहिलेल्या लेखाचा भाग : मी सयागी उ.बा.खिन यांना पहिल्यांदा भेटलो बुद्धाच्या शिकवणी विषयी माझ्या मनात असलेले पूर्वग्रह आणि स्वत:च्या धर्माविषयी मोठी आसक्ती ठेऊन मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी स्थानिक भारतीय हिंदू समाजाचा नेता आहे. हे सायागींना माहित होते....त्यांना मी हिंदू असल्याची कोणतीही अडचण नव्हती.” (संदर्भ- बोधिसत्व आंबेडकरांची धम्म संकल्पना : विपर्यास आणि वास्तव – शाम तागडे; पृष्ठ– ४०)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें