शनिवार, 15 जून 2013

बुद्ध, धम्म आणि विज्ञान

थागत बुद्धाने मात्र सुखासाठी प्रेमाचा आधार घेतला. पैशासाठी वा उत्पादनांच्या साधनांसाठी भांडू नका. कामवासना करा पण त्याच्या आहारी, अधीन जाऊ नका. त्याशिवाय सुद्धा जीवनात इतर सुखे आहेत. परस्पर सहयोगातून जगाची पुनर्रचना करण्यासाठी जीवन खर्च करा, असा होता. कार्ल मार्क्स रक्तरंजित क्रांतीचे समर्थक होते पण बुद्ध तसे नव्हते. रक्त सांडवून हुकुमशाहीची निर्मिती होईल पण लोकशाहीची नाही. हुकुमशाही ही जनतेवर थोपवली जाते पण लोकशाही ही स्वयं स्फूर्तीने अंगिकारली जाते. बाबासाहेबांना पीडितांची सुद्धा हुकुमशाही मान्य नव्हती हे त्यांच्या “बुद्ध कि कार्ल मार्क्स?” या भाषणातून विषद होते. व्यक्ती भुकेला असेल तरी चालेल पण तो गुलाम नको, या विचारांचे बाबासाहेब होते म्हणून त्यांनी “राज्य-समाजवादाचा” सिद्धांत त्यांनी भारतापुढे मांडला पण थोपला नाही.

शरीरात आत्मा कुठे आहे? आत्माचे, स्वर्गाचे विचार वैज्ञानिक आहेत का? सूर्यापासून पृथ्वी बनली असा शोध लागला. सूर्याचा आकार ६,३६०,८० किमी एवढा प्रचंड आहे. तो गरम व लाल रंगाचा द्रव पदार्थ आहे. त्यातील प्रत्येक अनु, रेणू, हे प्रोटान, इलेकट्रान, न्युट्रान अशा या चुंबकीय शक्तींनी बनलेले आहेत. ही शक्ती त्याला गतीशिलतेच्या गुणधर्मापासून मिळाली आहे. त्यापासून सूर्य १५ प्रकारची विविध किरणे, तरंग बाहेर सोडतो. त्यापैकी पृथ्वीवर ८ रंगाची किरणे दिसत नाही पण सात रंगाची दिसतात. ती ८ मिनटात पृथ्वीवर ६५ लाख किलोमीटर अंतर कापून येतात, पृथ्वी ४.६ कोटी वर्षाआधी सूर्यापासून वेगळी झाली. तेव्हा ती सुद्धा गरम होती.

पृथ्वी सतत फिरत आहे अर्थात गतिशील आहे. हा गुणधर्म सुर्यानीच पृथ्वीला दिला. गतीशिलतेमुळे गुरुत्वाकर्षण शक्ती माहित झाली दिवस-रात्र होते. दिवस म्हणजे सूर्याच्या प्रकाशात जाणे व रात्र म्हणजे सूर्यप्रकाशापासून वंचित होती, अंधारात जाणे. पृथ्वी म्हणजे पाणी आणि खनीजानांचे मिश्रण आहे. पृथ्वीवरील खनीजांचे अतिसूक्ष्म कन म्हणजे हवा, वायू होय. ती पृथ्वीपासून सुमारे १००० किलोमीटर दूर पर्यंत उडते. पृथ्वी पासून सुमारे १५-४० किमी अंतरावर ओझोन (वायू)चा स्थर असतो. तो सूर्याची घातक किरणे रोखतो. त्याला सध्या छिद्रे पडली म्हणून ती किरणे पृथ्वीवरील सजीवांवर विपरीत परिणाम करतात, त्यानेही प्राणी आजारी, रोगी होतात. तो “ईश्वरी कोप” नाही. आत्मा शरीरतातून आकाशात जातो म्हणजे कुठे, किती दूर असतो?

पृथ्वीवर १००० किलो मीटरच्या आत रसायन शास्त्राच्या भाषेत Xe, N2o, H2, CH4, He, Ne, CO2, Ar, O2, N2 ईत्यादी प्रमुख वायू असतात. पृथ्वीपासून १०-१२ किमी अंतरावर बाष्प असतो. तेवढ्याच अंतरावरून पृथ्वीवर पाउस येतो. पण तो देव पाठवतो म्हणून येतो असे नाही. ती एक भौतिक व भौगोलिक क्रिया आहे. देवाने सूर्य निर्माण केला नाही, चंद्रही बनवला नाही. त्यांना बनवतांना कोणी पाहिलेही नाही. पृथ्वीवर पाणी, जंगल, पहाडे ईश्वरांनी बनवले नाही.

पृथ्वीच्या गतिशील गुणधर्मांच्या परिणामाचा एक भाग आहेत. वायू म्हणजे अनेक भौतिक पदार्थाचे रूप तर पाणी म्हणजे दोन वायुंचे मिलन होय. प्राणवायु व हायड्रोजन वायुंचे मिश्रण म्हणजे पाणी होय. ते देवांनी बनवले नाही. देवाचे राज्य स्वर्गात आहे, ते आकाशात आहे म्हणजे पृथ्वीपासून दूर अंतरावर आहे? असा प्रचार चालू आहे. स्वर्गात देव हवा-पाणी वापरतात कि नाही? देव हवा घेतात; पाणी पितात कि नाही? देव हवा घेत असतील म्हणून त्यांना नाक आहे. पृथ्वी पासून दूरवर अर्थात हवेत स्वर्ग आहे म्हणजे किती किलोमीटर दूर आहे? हे स्वर्ग प्रेमी, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम लोकांनी व महायानी भिक्षुंनीही सिद्ध करून केले का?

देव स्वर्गात आहेत तर “ओझोन” वायूचे गड्डे बुझवण्याचे कार्य ते का करीत नाही? ओझोन म्हणजे ‘ओ३’, प्राणवायूचे ३ संयुगे. सूर्यकिरण व प्राणवायूच्या संयोगातून, मिलनातून ओझोन वायूची निर्मिती होते. सूर्य किरण सूर्य देतोच, पण वृक्षतोडीतून प्राणवायू बनविणे बंद होत आहे. झाडे पृथ्वीवर लावल्याशिवाय प्राणवायू बनणार नाही म्हणजे घातक सूर्य किरणांना रोखणारा ओझोन वायू निर्मितीस पृथ्वीवरील मानव प्रयत्न करू शकतो. स्वर्गात कोणत्याही काल्पनिक, अवैज्ञानिक देव नाही व स्वर्ग ही नाही माणूस मरतो व आत्मा देवाच्या राज्यात, स्वर्गात जातो. त्याला नेण्यासाठी “यमदूत” (देवाचा दूत) येतो. ही हिंदू धर्मातील कल्पना महायानी भिक्षूंनी त्रिपिटकात उतरवली. त्याला सम्राट अशोक राजा सुद्धा बळी पडले. स्वर्गीय सुखासाठी त्यांनी “सर्वधर्मसमभावी” धोरण लागू केले होते. कारण त्यांना मेल्यानंतरही सुख हवे होते.

मानवांना जन्म देव नाही तर आई-वडील घालतात. म्हणून आर्य-वडिलांना देव माना असा काहींचा समज बनला, पण तो चुकीचा आहे, कारण तो देव पूजेला खतपाणी घालतो, भक्तीभाव निर्माण करतो. भक्तीभावात अंध:श्रद्धा असते, विज्ञान नसते. प्रेम हवे पण भक्ती नको. झाडे जमिनीतून क्षार, प्रथिने, जीवनसत्व व पाणी शोषून स्वत:चे अन्न तयार करतात. प्राणीही ते खातात व जगतात. शेवटी मरतात. त्यावर सूक्ष्मजीव वाढतात. त्यांच्यापासून जीवाणू निर्माण होतात. ते जमिनीत मुरतात. झाडे त्यांना मुळाद्वारे शोषुण घेतात. म्हणजे “क्षार” (मिनरल) हे विविध जीवात-निर्जीवात बदलत असतात. क्षारांअभावी जीवन रोगी होते, निरोगी जीवनासाठी व्यक्तीला पुरेसे क्षार, जीवनसत्व, पाणी, उष्णता व शुद्ध हवा म्हणजे मुबलक प्राणवायू हवा कि, ईश्वरी आशीर्वाद?. मानवी जीवनासाठी सूर्याची फार इन्फ्रारेड नावाची किरणे हवीत (४ ते १६ मायक्राण) हवीत, ते सुद्धा जर खंडित, अपूर्ण वा अशुद्ध स्वरुपात मिळाली तर विविध आजार होतात. हा ईश्वरी कोप म्हणायचा का?

मानवी शरीराला दैनंदिन जीवनात जवळपास ८३ प्रकारचे क्षार (मिनरल) जरुरीचे आहेत. क्षाराशिवाय प्रथिने, प्रोटीन व जीवनसत्व कोणतेही कार्य करू शकत नाही. शरीर एकदाचे जीवनसत्व बनवू शकेल पण क्षार नाहीत. म्हणून भरपूर जीवनसत्व आहारात घेवूनही काही आजार ऐकत नाही. त्याचे कारण ईश्वरी कोप नव्हे वा ईश्वरी आशीर्वादाचा अभाव नसून पर्याप्त “क्षार” वा योग्य त्या पदार्थाचा तुटवडा होय. जे आजार जीवनसत्वाने जात नाही शुद्ध हवा, पाणी व सूर्य किरण घेवूनही जात नाहीत ते “योग्य” त्या क्षारांच्या पुरवठ्याने जातात हे विज्ञानाने आता सिद्ध करून दाखविले आहे. असे असतांना महायानी “बौद्ध पूजापाठ” व त्यातून भिक्षुंचा आशीर्वाद कशाला हवा? आशीर्वादानेच जगाची पुनर्रचना करण्याचे कार्य बुद्धाने का केले नाही? बुद्ध विहारात थांबले ते वर्षावासाठी, पुजापाठासाठी नाही. आजचे बुद्धविहारे म्हणजे परित्राणसूत्र पाठाचे, पूजांचे देवस्थान बनले आहेत. तिथे विज्ञान वा वैज्ञानिक दृष्टी आहे का?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें