शनिवार, 15 जून 2013

घटना : ईश्वरीय कृति कि कार्यकारण सिद्धांत?


बौद्ध, धम्मधारी लोक नेहमीच, सततच गरिबीत राहिले तर ते केव्हाही मार्क्सच्या साम्यवादाचे सैनिक बनून, बुद्ध धम्माला “अफू” समजून संपुष्टात आणतील. तसे प्रयत्न नक्षलवादी लोकांकडून चालू आहेत. 'नक्षलवाद' भारतात का आला? तर त्याची कारणे धम्म समजावून सांगण्यास बौद्ध लोक मागे पडलेत, हि आहेत. ‘’चैन” आणि “गरिबी” बुद्धाला व बाबासाहेबांना नको होती पण बौद्ध त्याला बळी पडले. बौद्धांच्या आचरणातूनच धम्म दिसायला पाहिजे पण तो दिसतो का? जर हजारो वर्षापासून चालत आलेली भिक्षूंच्या “महायानी” हिंदू, अवैज्ञानिक विचानाची भेसळ नष्ट झाली नाही तर नक्षलवादी लोकांना कोणता शुद्ध धम्म विचार द्यायला हवा? बाबासाहेब सामान्य लोकांना नियम आणि असामान्य लोकांना तत्वज्ञान सांगू ईच्छित होते. म्हणून त्यांनी विहारासोबत वाचनालय असावे असा विचार मांडला पण किती विहारात तो वास्तवात उतरला? विहारे बनलीत पण त्यात वाचनालये नाहीत पुजापाठेचा धम्म नव्हे तर धर्म फोफावला.


बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या बाजू ने उभे दिसतात. त्यांच्या मते बुद्धाचा धम्म मार्क्सच्या हमल्या पासून दूर आहे. मार्क्सच्या हमला वैश्य रुपी व्यापाऱ्यांवर आणि ब्राम्हणी पुरोहीतशाहीच्या धर्मावर आहे. व्यापारातील साधने ही सार्वजनिक असावित पण भारतात तसे नाही आणि धर्म हा अवैज्ञानिक विचारांवर आधारित आहे. बुद्धाचा धम्म हा धर्म नाही कारण त्यात आत्मा, ईश्वर, यांना स्थान नाही. तरी पुनर्जन्म आणि बौद्ध पुजापाठ यांचे समर्थन बाबासाहेबांनी केले कि नाही? विज्ञान म्हणतो कि वस्तू बदलतात पण जन्म घेत नाहीत व मृत्यूही पावत नाही पण "पुनर्जन्म" म्हणजे, पुन्हा-पुन्हा जन्म घेणे वा होणे. पेटत्या ज्योतीचा आधार घेवून दुसरी ज्योत पेटविणे, आंब्याच्या कोई पासून झाड बनणे, आई-वडिलांपासून पुत्र होणे म्हणजे पहिल्याचा दुसरा पुनर्जन्म होय, अशी मानण्याची प्रथा आहे. पण पहिला हा दुसऱ्या सारखा (जसाचा तसा) कधीच राहिला नाही. एवढेच कशाला मुळ पहिला सुद्धा क्षणोक्षणी बदलत राहिला आहे. तेव्हा कोणत्या बदलाचे दुसरे हे नवीन रूप म्हणजे पुनर्जन्म मानायचे? भौतिक पदार्थाचे अर्थात चार महाभूतांचे रूप, बदलत असते. त्याला पुनर्जन्म या संज्ञेत बांधता येईल का? 

व्यक्ती जिवंत असतांना काल सारखाच आज नाही, आज सारखाच उद्या राहणार नाही. अर्थात कालचा आज नाही व आजचा उद्या नसणार तर तो मेल्यावर, त्याला गाडल्यावर वा जाळल्यावर तो पूर्वीच्या जिवंत व्यक्तींचा वा त्याच अवशेषांचा दुसरा जन्म कसा मानता येईल? पुनर्जन्म ही संकल्पना भारतात बुद्धाच्या आधीपासून हिंदू धर्मात ब्राम्हणांनी पोसली. शरीर मरते पण आत्मा मरत नाही. महायानी काय म्हणतात? चार महाभूत मरत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू हे मरत नाही तरी त्यांचा पुनर्जन्म होतो. पूर्वीच्याच जीवाचा वा चार महाभूतांचाच दुसरा जीव, जन्म होतो का? 

आत्म्याचा पुनर्जन्म होत नाही पण भौतिक पदार्थांचा होतो ही दोन्ही मते अवैज्ञानिक, अज्ञानी नाहीत का? पहिल्याच्या लयानंतर होतो जन्म म्हणजे निर्मिती, यातील लय व उदय हे अवैज्ञानिक असत्य आहे. वे त्यांच्या अनित्य विचारला हे, विचार विज्ञानाला आणि बुद्धाला मान्य नाही. बुद्धाने “अनित्य” मानले, कार्यकारण परंपरा मानली. चार महाभूतांचा पुनर्जन्म होतो हे विचार अवैज्ञानिक असून ते महायानी भिक्षूंचे आहेत, ते बुद्धाचे नाहीत. बौद्धांना भ्रमित करण्यासाठी महायानी हिंदुनी ते धम्मविचार म्हणून घुसडले. त्यांना कवटाळून कोणाचाही फायदा नाही. पण त्याचा फार मोठा बाहु करून मृत भौतिक मानवी अवशेषांवर “चैत्य” उभारण्याला त्यांनी धम्म समजले. बुद्धाच्या दातावर, केसावर, नखावर, अस्थीवर विहारे उभारण्याची व त्यांची पूजा करण्याची रीत पुढे आली. भौतिक अवशेषांची पूजापाठ करणे म्हणजे बुद्धाचा “मध्यम मार्ग” आहे का? ह्या स्तुप, चैत्य पूजेच्या महाअंध:श्रद्धेतून जगाची पुनर्रचना लोकशाहीच्या नैतिक मुल्यांवर करता येईल का? हा मोठा प्रश्न आहे.

बुद्धाने “कार्यकारण सिद्धांत” सांगितला त्याला “प्रतीत्यसमुत्पाद” हे शीर्षक भिक्षूंनी दिले, बुद्धाने नाही. ह्या कारणाने ते होते. ते असल्याने हे होते, हे नसेल तर ते होत नाही, हे बुद्धाचे मत होते. जुन्याचे नवीन रूप आहे, असे बुद्धाने सांगितले नाही. बुद्ध धम्मानुसार कोणतीच वस्तू जन्म घेत नाही व मृत, नष्ट होत नाही. सर्व वस्तू “अनित्य” आहेत. सर्व वस्तू परिवर्तनशील आहेत. परिवर्तनातून नवीन वस्तूला जन्म, निर्मिती म्हणणे हे भिक्षूंनी ठरविले. बुद्धाने त्यालाही अनित्य मानले. स्थिर वस्तूला नावात बांधता येते पण अस्थिर गतीशिलतेला जन्म, पुनर्जन्म या नावात बांधता येत नाही. म्हणून बुद्धाच्या “ह्या मुळे हे होते” या विचारला उत्पत्ती व लय (विनाश) च्या विचारातून सिद्ध करता येत नाही.

“कार्य-कारण सिद्धांता”ला प्रदुषित करण्यासाठी महायानी भिक्षूंनी त्याला प्रतीत्यसमुत्पाद हे नाव दिले. प्रतीत्य म्हणजे प्रत्येय, कारण, हेतू. सम्मु म्हणजे समूह. प्रतीत्य सम्मु म्हणजे प्रत्येय, हेतू, कारणांचा समूह. तर त्पाद म्हणजे उत्पाद, निर्मिती, जन्म. कारणांच्या सामुहिक प्रयत्नातून कार्य यातून बुद्धाला नवीन निर्मिती वा उदय हा अर्थ अभिप्रेत नव्हता तर अनित्य, परिवर्तनीय घटना, कार्य असे अभिप्रेत होते. पूर्वीचा जन्म आज नाही, आजचा जन्म उद्या नाही म्हणजे “सर्व अनित्य”, अस्थिर, बदलत, परिवर्तीत होत आहे. महायानी भिक्षूंनी बुद्धाच्या विचारणातून नव्हे तर हिंदू मानसिकतेतून “महायानी” भिक्षूंनी “पुनर्जन्म” मानला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें