अनिल नि. वैद्य (माजी न्यायाधीश) यांनी लिहिलेल्या “विपश्यना म्हणजे काय? गैरसमज व शंकांचे निरसन” या पुस्तकाची समीक्षा "जनतेचा महानायक”, मुंबई या दैनिकात दिनांक २७ फेब्रुवारी २०१३ ला मिलिंद फुलझेले, नागपूर यांनी लिहिली. त्यात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत ज्यांची उत्तरे देने अम्बेडकरी लोकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्याची हि प्रतिक्रिया)
(१०) “बीडला बुद्ध विहार, मंदिर मार्ग दिल्ली येथे भदन्त एल. आर्यवंश यांच्याकडे जावून बाबासाहेब ध्यान करीत असत, त्यानंतर स्वतः रतनसुत्ताचा पाठ भन्तेकरवी करीत असत, हे कोणत्या आंबेडकरवाद्यांना माहित आहे का?” – समीक्षक मिलिंद फुलझेले/महानायक/नागपुर
प्रतिक्रिया :- बाबासाहेबांनी धर्मांतराचा कल बुद्ध धम्माकडे दाखविताच भारतीय हिंदुधर्मातील महार पुजाऱ्यांनी बाबासाहेब यांच्याकडे बुद्धधम्मात पूजापाठ कोणत्या प्रकारच्या आहेत ते जाणून घेण्याचा तगादा लावला होता. तेव्हा श्रीलंकेतील त्यांच्या मित्राकडून त्या विधी गोळा करून “बौद्ध पूजा पाठ” बाबासाहेबांनी पुस्तिका (फेब्रुवारी १९५६ ला) काढली. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर : ऱ्हायटिंग अंड स्पीचेस, व्हालूम १६) त्यात “रतन सुत्त” ही आले आहे. ह्या पूजापाठात बाबासाहेब कधीच पडले नाही पण आपल्या अनाडी व भावनिक लोकांचा मान राखावा, त्यानांही धम्म आपलासा वाटावा म्हणून ते पुस्तक बाबासाहेबांनी छापले पण “द बुद्ध अँड हिज धम्मा”त त्याचा समावेश करण्यात आला नाही. याचा अर्थ ते पिढ्यानपिढ्या चालू द्यायचे, असा होत नाही. त्यांना ज्याप्रमाणे काही काळ जातीच्या आधारे आरक्षण हवे होते, नंतर ते बंद करायचे होते अगदी तसेच हे पूजेचे कर्मकांड ही हटवायचे होते.
बाबासाहेबांनी सुशिक्षित आणि अशिक्षित असे दोन बौद्ध उपासकांचे भाग गृहीत धरून विचार मांडले. पण ते नेहमी सुशिक्षितांच्याच मतांचे राहिले. याचा अर्थ ते अशिक्षितांच्या विरुद्ध होते असेही नाही. ते अशिक्षितांना बिगीबिगी सुधारायचे तयारीत होते. बाबासाहेब बीडला बुद्ध मंदिरातच नाही तर विदेशातील अनेक बुद्ध मंदिरात गेले व त्यांचे अवलोकन केले. बौद्धांच्या व भिक्षूंच्या हालचालीचे गहन निरीक्षण केले. त्यांना अनुसरणे हा त्यांच्यामागे उद्धेश नव्हताच. तसे असते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “ब्रह्मदेशातील बुद्धिष्ट कौन्सिल” मध्ये सन १९५४ भाषण दिले. त्यत त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला. बघा त्यात ते म्हणले, “मला हे विशेषतः दृष्टीस आणून द्यायचे आहे कि, आधुनिक बौद्ध अनुयायात अभिधम्म, समाधी, आणि ध्यान ह्यावरच फार जोर दिला जातो. भारतीयांमध्ये ह्यापद्धतीने बौद्धधम्म प्रस्तुत केल्यास ते आपल्या कार्यात हानिकारक होईल.” (साप्ताहिक भीमशक्ती, नागपूर, संपादक- एच. डी. आवळे, दिनांक- २२ आगष्ट १९६५ मध्ये) ह्यातून काय बोध घ्यायचा तो समीक्षकाने जरूर घ्यावा.
(११) “श्रीलंका, भारत आणि म्यानमारची विपश्यना पद्धती समान आहे. एस. एन. गोयंका यांनी धम्मप्रचार विपश्यनेच्या माध्यमातून केल्याबद्धल म्यानमार, लंका आणि भारतात त्यांचा सन्मान झाला. – समीक्षक मिलिंद फुलझेले / महानायक / नागपुर
प्रतिक्रिया :- भारतातून महायान प्रथम लंकेत गेला आणि नंतर तिथून पुढे सन ४५० च्या दरम्यान बुद्धघोसाच्या सहाय्याने ब्रह्मदेशात गेला. म्हणून सर्व ठिकाणी विपस्सना दिसते. ज्या देशी-विदेशी लोकांनी गोयंका गुरुजीचा सत्कार करून त्यांना उपाध्या बहाल केल्या ते बुद्ध धम्माचे संशोधक होते का? “बुद्धच विपश्यनेचे जनक आहेत” या सत्यनारायण गोयंकाच्या मतांचे समर्थन केले, असल्याचा काही पुरावा आहे का? जर तसे पुरावे त्यांना इतर ठिकाणी सादर करता येतात तर आंबेडकरी विचारवंतासमोर ते विचार-विनिमयासाठी का मांडत नाहीत? संशोधन कशाला म्हणतात? हे तरी बनिया, गुरुजीला गोयनका माहित आहे का? कोणत्याही दुसऱ्या अंध:भक्त लोकांना त्यांचे मत मान्य झाले म्हणजे ते सर्वांना मान्य झाले, असे होते का? “वासरात लंगडी गाय शहाणी” तसा तो प्रकार आहे. सत्यनारायण गोयनका महान धम्म प्रचारक आहेत तर त्यांनी आपला मोबाईल नंबर सर्वांसाठी माहित करून द्यावा वा मरणाच्या आधी त्यांनी चर्चेसाठी विचारवंत लोकात बसावे.
महामानव गौतम बुद्ध हे लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी लोकात (समाजात) जायचे, पण हे गृहस्थ मात्र लोकांना आपल्या शिबिरात (शाळेत) बोलावतात? “चरथ भिक्खवे चारीकम, बहुजन हिताय– बहुजन सुखाय” या शिबिरांनाच म्हणतात का? गोयंका गुरुजीच्या विद्यार्थ्यांनी आर्थिक लोकशाहीसाठी कोणते संघर्ष सुरु केले? गोयनका गुरुजी जनते समोर येवून ते त्यांच्या बुद्धीची परीक्षा द्यायला तयार आहेत का? खोटा प्रचार करणारे लोक घरात लपतात त्याचप्रमाणे गोयंका गुरुजी शाळेत (शिबिरात) लपतात. समाजात यायचे असेल तर भाषणाला नाही, चर्चेला या म्हणावे, मग समजेल.
(१२) “द बुद्ध अंड हिज धम्म” या ग्रंथातील ‘मेडीटेशन’ अर्थात ‘ध्यान’ ह्या शब्दाकरिता विशेष माहिती (पृष्ठ १०७ ते ११०) दिलेली आहे.” – समीक्षक मिलिंद फुलझेले /महानायक / नागपुर
“बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथात “समाधी मार्गाचा अनुभव” या शीर्षकाखाली, वैशालीतील “आलार कालाम आणि उद्दक रामपुत्त कोशलांच्या ध्यानमार्गाचे ज्ञाते म्हणून ख्यात होते परंतु गौतमाच्या असेही लक्षात होते कि मगधांच्या देशातही ध्यानमार्गाचे एवढेच ख्यात ज्ञाते आहेत. त्यांच्या प्रनालींचेही अध्ययन करावे असा त्यांनी विचार केला. त्यानुसार गौतमाने मगध देशाला प्रयाण केले. त्यांना असे आढळले कि मगध देशातील ध्यानमार्गाचे तंत्र जरी श्वासोच्छ्वासाच्या नियंत्रणावरच आधारित आहे. तरी कोशल देशात प्रचलित पद्धतीपेक्षा त्या भिन्न आहेत. ती प्रणाली श्वास घेणे, सोडणे यावर नियंत्रणाऐवजी श्वासाचा निरोध करून चित्ताची एकाग्रता साध्य करण्यावर आधारित होती.
“गौतमाने ही पद्धतीही अवगत केली. जेव्हा त्यांनी श्वासाचा निरोध करून चित्ताची एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्याच्या कर्णरंध्रातून तीव्र ध्वनी बाहेत पडत आहेत, त्यांचे मस्तक कोणीतरी तीक्ष्ण सुऱ्याने भेदत आहे असे वाटत होते. ही अत्यंत पीडादायक प्रक्रिया होती पण गौतमाने तिला हस्तगत करण्यात यश मिळविले. गौतमाने सांख्य दर्शन आणि समाधी मार्गाचे अनुभव घेवून पाहिला परंतु तपश्चर्येच्या मार्गाचे परिशीलन न करताच त्यांनी भृगु ऋषिचा आश्रम सोडला....गौतमाची कठोर तपश्चर्या आणि शरीरपीडा उग्र स्वरुपाची होती. ती कठोर व खडतर तपश्चर्या त्यांनी दीर्घकाळ म्हणजे सहा वर्षांपर्यत केली....तरीही त्यांना प्रकाशाचे दर्शन झाले नाही. जगात दुःख आहे या समस्येने त्यांचे चित्त व्यापले होते. त्या समाश्याचे समाधान त्यांना कुठेही आढळत नव्हते.
“त्यांनी स्वशोधन केले व ठरवले कि तपश्चर्या हा मार्ग तृष्णारहित, ज्ञानप्राप्तीचा किंवा मुक्तीचा नव्हे. काही लोक “सुख” प्राप्तीसाठी प्रयत्न करतात तर काही लोक “स्वर्ग” प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, ते बिचारे खोट्या आशेपायी आपले ध्येय विसरून बसतात. सुखांच्या पाठी लागलेल्या क्षुद्र जीवांच्या वाटेवर शेवटी दुःखच येते. माझ्या बाबतीतही असेच घडले नाही ना! मी प्रयत्नांना दोष देणार नाही. परंतु हे प्रयत्न आधाराशिवाय आकाशात उडण्याचे होते. मला असा प्रश्न पडतो कि, “देहाचे उत्पीडन, देहाचे क्लेश यालाच धम्म म्हणावे काय? मनाची प्रेरणा, मनाची आज्ञाच देहाला कर्म करण्यास किंवा न करण्यास प्रवृत्त करते. म्हणूनच चित्त साधना हिच सर्वात योग्य साधना आहे. विचारहीन देह हा कुत्र्यासारखाच आहे....
“जो शरीर पिडेने शक्तिहीन झाला अशा व्यक्तीचे चित्त शांत कसे होईल? ज्याचे चित्त शांत नाही तो चित्ताच्या एकाग्रतेतून साध्य करावयाच्या ध्येयाप्रती कसा पोहचू शकेल? शारीरिक गरजांची नित्यपूर्ती करूनच चित्त शांती आणि चित्त संयम योग्य प्रकारे साधता येईल. ....गौतमाने तपश्चर्येचा आणि शरीरपिडेचा मार्ग त्यागला, हे बघून त्यांच्यासंगे जे पाच परिव्राजक होते, ते रुष्ट झाले आणि निराश होऊन गौतमाला सोडून निघून गेले.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म, समता प्रकाशन, नागपूर. पृष्ठ-४७-५०) ह्यावरून गौतम हे विपस्सनेचे जनक नव्हते तर आलार कालाम होते, ध्यान, समाधी, विपश्यना आणि तपश्चर्येला शरीरपिडा देणाऱ्या पद्धती समजून त्याग केल्या म्हणजे स्वीकारल्या होते का?”
महामानव गौतम बुद्धाने म्हटले, “परीव्राजकांनो! हे समजून घ्या. दोन ध्रुवावर असलेल्या दोन जीवनप्रनालींचे अनुकरण कधीही करू नये. ज्यांचे आकर्षण कामभोगाची तृष्णा आहे, अशा वस्तूंच्या माध्यमाने तृप्ती प्राप्त करण्याचे प्रयास हे हीन प्रयास होत. ते अकुशल व हानिकारक आहेत. दुसरीकडे तपश्चर्या अथवा कायाक्लेश ही जीवनप्रणालीही पिडादायी आहे. ती अकुशल व हानिकारक आहे. (बुद्ध आणि त्यांचा धम्म. २:२:१:९) या दोन्ही जीवनाच्या मध्ये एक जीवनाचा मार्ग आहे, तो मध्यम मार्ग होय, तुम्ही हे जाणून घ्यावे कि मी या मध्यम मार्गाचाच उपदेशक आहे. (बुद्ध आणि त्यांचा धम्म, २:३:३:३) समाधीमुळे पाच बाधा टाळता येतात परंतु ती अस्थायी. परिणामी बाधांचे निलंबनही अस्थायीच असते. म्हणून चित्ताच्या स्थायी परिवर्तनाची गरज आहे. ते सम्यक समाधीमुळेच होऊ शकते. नुसती समाधी या बाधांवर अस्थायी विजय मिळविल्याचे कारण असल्याने ती एक प्रकारे निराशाजनक अवस्था होय. या अवस्थेत चित्त प्रशिक्षित होत नाही. सम्यक समाधी हिच आशादायी अवस्था होय. (बुद्ध आणि त्यांचा धम्म, २:२:४:४१-४३)
दुसऱ्या एका ठिकाणी सुद्धा त्यापेशा सोप्या शब्दांत हेच सांगितले आहे, “हे अग्गीवेस्सन! तेव्हा माझ्या मनात असा विचार आला होता कि, मी श्वासोच्छ्वास बंद करून ध्यान करावे. तेव्हा आतील श्वास माझ्या नाकातून निघण्याचा प्रयत्न करीत असें, त्यामुळे लोहाराच्या भात्यातून आवाज निघावा त्याप्रकारचा विलक्षण आवाज निघत असे. पुढे मी कानातूनही निघणारा श्वासोच्छ्वास बंद केला, तेव्हा तलवारीच्या टोकाने डोके फोडून टाकल्याप्रमाणे माझ्या डोक्यात वेदना होत असत. हे अग्गीवेस्सना! तेव्हा माझ्या मनात असा विचार आला कि श्वासोच्छवासांचा निरोध होईल असे ध्यान मला प्राप्त व्हावे. मी माझ्या मुकावाटे, नाकावाटे आणि कानावाटे निघणारे श्वासोच्छ्वास बंद ठेवीत असे. त्यामुळे माझ्या शरीराला दाह होई. एखाद्या दुर्बल माणसाला दोन बळकट माणसांनी पकडून आगीच्या कढईत तापवावे त्याप्रमाणे माझ्या अंगाचा दाह होई.”
बोधी प्राप्त झाल्यावर बुद्धाने अशा ध्यानाची देहदंडनात गणना केली आहे. कारण त्यामुळे आर्य अष्टांगिक मार्गाच्या सात अंगाचा विकास होणे शक्य नव्हते. श्वासोच्छवास दाबून देहाला पिडा देणे, हा एक अंत. आणि ज्यामुळे कामविकार उद्धीपित होतात अशा विषयाचे ध्यान करणे हा दुसरा अंत. या दोनोंच्या मधली समाधी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गातील सम्यक समाधी होय.” (बुद्धाचा मध्यम मार्ग, मा.शं. मोरे, कौसल्या प्रकाशन, औरंगाबाद, पृष्ठ- १५३)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें