शनिवार, 29 जून 2013

शाहू महाराज आणि त्यांची बहुजन चळवळ


शाहू महाराज हे आर्य (वंशवादी), क्षत्रिय वर्नाभिमानी आणि ईश्वरवादी कसे होते हे सिद्ध करण्यासाठी खालील पुरावे पुरे आहेत. खंडेराव गणपतराव कालेकर हे आपल्या “सत्यशोधकांचा वेद” मथळ्या अंतर्गत लिहितात, “(ज्योतीराव फुलेंची) सत्यशोधक चळवळ जशी धार्मिक आहे, तशी (शाहू महाराजांची) ब्राह्मणेतर चळवळ नाही. जे लोक सत्यशोधक नाहीत, त्यांना ब्राह्मणेतर चळवळीत भाग घेता येतो. सत्यशोधक चळवळीत ब्राह्मण चालतो पण ब्राह्मणेतर चळवळीला त्यामार्गाने बंधने आहेत.... सत्यशोधक चळवळीत अहिन्दुंचा प्रवेश दुष्कर. ब्राह्मणेतर चळवळीत अहिंदू चालतात. ब्राह्मणेतर चळवळ हि राजकीय चळवळ आहे. हिंदू समाजाची वर्णव्यवस्था बदलण्याचा, सुधारण्याचा किंवा नष्ट करण्याचा तिचा उद्धेश नाही.” (राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ, पृष्ठ- ४३९, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर, प्रकाशन- जानेवारी २००१)

• १९२० मध्ये शाहू महाराज यांनी “शिवाजी क्षत्रीय वैदिक शाळा” काढली. याचा अर्थ आर्य समाजाच्या सहिष्णुतावादी विचारांचा त्यांच्यावर होता. वेदातील वर्णवाद अर्थात “क्षत्रिय” वर्ण यांच्याप्रती त्यांच्यामानात प्रेम होते. पण त्याच वेदांनी भेद निर्माण निर्माण करून पुढे जाती आणि अश्पृश्यता दिली ती अयोग्य नव्हती का? शाहू सुधारक होते पण वर्णवादी हि हे कोणताही इतिहासकार नाकारू शकणार नाही. त्यांनी महारांना सांगिलते कि भीमराव हा तुमचा उद्धारकर्ता आहे, ते सिद्ध हि झाले पण अन्य अस्पृश्य जाती सुद्धा जातीवादी मानसिकतेत गुर्फडून राहिल्या आणि त्या बाबासाहेब आंबेडकर सोबत गेल्या नाहीत, त्यांनी धर्मांतर केले नाही. याचा अर्थ हा होतो कि सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ ह्या खऱ्या क्रांतिकारी नवत्या तर त्या जातीवादी चळवळी होत्या हे सिद्ध होते. त्यांचे आंबेडकरी प्रेम हे दिखाऊ होते हे आता लपून राहीले नाही.

• शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाचा विधी हा वैदिक नसून “पुराणोक्त”च होता, त्यामुळे ते क्षत्रिय नसून शुद्रच होते. पण वर्ण व्यवस्थेच्या ते विरुद्ध नव्हते हे सिद्ध होते. शाहू महाराज म्हणतात, “मी छत्रपती आहे. अठरापगड जाती माझे प्रजाजन आहेत. माझ्या सर्व संस्थांच्या प्रजाजनांना नोकऱ्यात प्रवेश मिळाला पाहिजे. कोणतीही एकजात वरचढ होता उपयोगी नाही.” (राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ, पृष्ठ- ४२७, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर, प्रकाशन- जानेवारी २००१) यात सुद्धा ते जातींचे सामाजिक महत्व मान्य करतात पण त्यांना नष्ट केले पाहिजे, अशी भूमिका त्यांची दिसत नाही.

• रुकडी काम्पहून शाहू महाराज यांनी लंडनच्या फ्रेजर यांना दिनांक २७ मे, १९२० रोजी जे पत्र लिहिले त्यात त्यांनी ‘ईश्वरावर त्यांचा विश्वाश होता’ हे सिद्ध करण्यासाठी पुरे आहे. त्यात ते लिहितात, “मी मांडलिक राजा असलो तरी मी प्रथम माणूस आहे, मला माणसातच राहावे लागेल. विशेषतः ज्या लोकांनी मला माझ्या अडचणीच्या वेळी मदत केली त्यांना कसे टाकावे? ब्राह्मणांना मला बदनाम करून राज्य करणे अशक्य करावयाचे आहे. त्यात ते यशस्वी झाले नाही तर – They will kill me by throwing a bomb at me.’ “गरज भाषल्याशिवाय मी जाहीर भाषणे करत नाही.” निराशेच्या स्वरात शाहू महाराज लिहितात, “My God help me in retiring without my loss of reputation.” (राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ, प्रकाशन- जानेवारी २००१, पृष्ठ-५३०) 

• इतिहासाचे जातीवादी विश्लेषण होऊ नये तर वास्तववादी व्हावे, अन्यथा त्या विश्लेशनाला जातीवादी म्हणून ठपका लागेल आणि भविष्यकालीन इतिहास संशोधक उचित निश्कर्षाप्रत जाणार नाही. शाहू महारांचा उदोउदो करतांना त्यांच्या पुरांणपंथी विचारांची हि दखल घेणे, हे सुद्ध विचारवंतांचे लक्षण आहे. कोणाला किती डोक्यावर घेणे हितावह आहे, हे चुकीच्या किंवा भावनिक आधारावर मांडलेल्या विचाराने सिद्ध करता येत नाही. 

• एखादा व्यक्ती राजा होता म्हणून त्याला अवास्तव डोक्यावर घेवून नाचवायचे आणि दुसरा रंक होता म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचे, हा काही बुद्धीजीवी विचार नाही, तर तो भेदभाव आहे. राजेशाही म्हणजे लोकशाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव गौतम बुद्ध हे लोकशाहीवादी होते कि राजेशाही? बुद्ध-आंबेडकर वैदिक विचारांचे विरोधक होते पण साहू महाराज तसे होते का? 

• बाबासाहेबांचा विचार हा व्यक्तिवादी नव्हता पण शाहू महाराजांचा होता. सहानुभूती पोटी महाराजांनी बाबासाहेबांना आणि त्यांच्या कार्याला मदत केली, पण बाबासाहेबांनी त्यांच्याजवळ आपली बुद्धी गहाण ठेवली नव्हती. ते परस्परांचे मित्र होते पण मर्यादा सुद्धा कमी नव्हत्या. हिंदू विचारांच्या राजांना तथागत बुद्धासोबत एकत्र बसविणे, कितपत संयुक्तिक आहे? तसे तर संघपरिवार करीतच आहे, मग बौद्धांनी त्यांचासोबत जायचे का?

• बामसेफ/ बीएसपी केवळ राजकीय समीकरण बनवून जबरदस्तीने जातीवाद्यांना एकत्र करीत आहेत, त्यांचा वाटेने गेल्यास धम्म विचारांना भ्रमित केले जायील आणि जातीवादी सत्ता म्हणजे नीती, धम्म मानला जायील. ज्या दिवशी असे झालेले असेल, त्या दिवसापासून आंबेडकरी धम्म रसातळाला जायील.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें