डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या " शुद्र पूर्वी कोण ?" या ग्रंथात “आर्य” हे विदेशी नसून देशी आहेत असे लिहिले असतांना त्यांच्या विचारांवर मात देण्यासाठी "मूलनिवासी" मोहिम हाती घेतली. जनता "जयभीम" म्हणत असतांना त्यांना "जय मूलनिवासी" म्हणायला शिकवीणे हे आम्बेडकर प्रेमी असण्याचे धोतक नाही. हे माथेफिरू लोक बाबासाहेब आम्बेडकर यांच्या द्वितीय विवाहाला वादाच्या भोवऱ्यात अडकवून ते माईसाहेब ह्या चरित्याहीन होत्या असे समजावून देवू पाहत आहेत.
डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांचे विचार चुकीचे होते हे सिद्ध करण्यासाठी "ब्राह्मण कन्या ह्या विष कन्या असतात, त्यांच्याशी विवाह करणारे मुर्ख आहेत” या विचारांचा प्रचार वामन मेश्राम नावाच्या माथेफिरुने सुरु केला आहे. आंतरजातीय विवाहाने आमच्या चळवळीचे फार मोठे नुकसान झाले असा खोटा आरोप यांनी चालविला आहे. स्त्रियांना दोषी समजण्याचा हा प्रकार आहे. सर्व स्त्रियांनी या विचारांचा धिक्कार करायला पाहिजे. ही मनुवादी विचारसरणी आहे. जातीच्या आधारे स्त्रिया वाईट ठरविणे चुकीचे आहे. या आधी पुणे करारावर सही करणारे गुन्हेगार सांगुन बाबासाहेब यांचा "धिक्कार" करणारी मोहिम चालविली होती.
बाबासाहेब यांनी माईसाहेब यांच्याशी केलेला विवाह हा बाबासाहेब यांच्यावर लादलेला विवाह होता असा खोटा प्रचार चालू केला आहे. बाबासाहेब हे ब्राह्मनांच्या फाश्यात अडकले होते म्हणजे ते ब्राह्मण लोकांपेक्षा किती निर्बुद्ध होते? असे सिद्ध करण्याचा हा यत्न आहे. बाबासाहेब यांनी त्यात कायदेशीर आंतरजातीय विवाहाला स्वतः पासून सुरुवात केली आणि मुख्य म्हणजे बाबासाहेब हे मधुमेह नावाच्या जर्जर आजारांनी ग्रस्त होते, त्यामुळे डाक्टर लोकांनी त्यांना मिनमिनत्या पंथिची उपमा दिली होती. बाबासाहेब यांनी स्वतः आपल्या डॉ. राव नावाच्या मित्राच्या मदतीने सविताला स्वताच्या प्रेमात पाडून घेतले होते. डॉ. सविता यांनी बाबासाहेब यांच्यासी जो विवाह केला तो म्हणजे बाबासाहेब यांच्यावर वैद्यकीय मदतीसाठी केलेला उपकाराच ठरला. हा विवाह जातीयवादी नव्हता तर तो जाती मोड्न्याचा होता. यात बाबासाहेब यांनी एकाच निर्णयात कितीतरी उद्धिष्ट गाठले होते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
बाबासाहेब आम्बेडकर "द बुद्ध एंड हिज धम्म" या ग्रंथाच्या "प्रस्तावना" या ठिकाणी लिहितात की डॉ. मालवंकर आणि डॉ. सविता कबीर यांची वैद्यकीय मदत झाली नसती तर त्यांना धम्म ग्रन्थ लिहिता आला नसता म्हणून त्यांच्या सेवेबद्दल बाबासाहेब यांनी आभार मानले, हे लक्षात घेण्यासारखे आहे. अड़. प्रकाश आम्बेडकर (बाबासाहेब यांच्या नातवाने) ब्राह्मण मुलीशी विवाह केला हा फार मोठा गुन्हा केला हे सिद्ध करण्याचा जातीयवादी प्रयत्न लावून धरलेला आहे. त्याऐवजी माझे स्वताचे नेतृत्व किती अफाट आहे असे दाखवून प्रौढी मारण्याचा हा प्रयत्न आहे.
हुकुमशहा वामन मेश्राम हा एक माथेफिरू आहे. बामसेफ संघटनेचा अध्यक्ष असल्याचा खोटा प्रचार करीत आहे. हे सर्व गैर प्रयत्न का करतोय? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे डोळेझाक तानाशाह कांशीराम यांच्या विचारांचे समर्थन होय. जातीयवादी "बहुजन" नावाच्या निर्माण झालेल्या लाटेचा फायदा घेण्याचा आटोकाट प्रयत्न आहे. हे सर्व काही कार्य स्वनिर्मित "भारत मुक्ति मोर्चा" नावाच्या राजकीय पार्टीच्या विजयासाठी आहे. बीएसपी आणि आरपीआय या दोन्ही पक्षांवर मात करण्यासाठी "कु" धडपड चालू झालेली आहे. जनता सर्व ओळखून आहे की कोण खरे बोलत आहे आणि कोण खोटे? आता वामन मेश्राम जनतेला खोटेनाटे पुरावे दाखवित आहे की बाबासाहेब यांच्या मारेकऱ्यानना शिक्षा देण्यासाठी, भावनिक शोषण करण्याचा हा वामन मेश्राम नावाच्या राजकीय हुकुमशाहाचा डाव आहे. सुजान जनतेने यांच्या 'मुलनिवासी" विचार सरणी पासून सावध रहावे.
वामन मेश्राम को बामसेफ का मुखिया किसने किया? और वह कितने साल तक रहेगा? बामसेफ जनतंत्र को मानती है क्या? उसे जातियों का जनतंत्र पसंद है या समाज का? बामसेफ के कुल कितने अध्यक्ष है? और उनके नाम क्या है?
कुणाचे विचार खोडुन काढता आले नाही की त्यांना दलाल, भडवे संबोधने योग्य आहे का? हा बुद्धीमानी प्रकार आहे का? वामन मेश्राम बुद्धिमान असेल तर त्यांनी वरील माझ्या विचारांचे खंडण करून दाखवावे. तो जोपर्यंत तसे करणार नाही तोपर्यंत तरी निर्बुद्ध आहे, असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें