विपस्सना हा पाली भाषेतील शब्द आहे पण तो प्राचीन त्रिपिटकात नाही. तो अर्वाचीन आहे. “पस्स” म्हणजे “पहा” होते तर “पस्सना” म्हणजे “पाहणे” होते आणि विपस्सना म्हणजे “विशेष पाहणे.” हिंदुधर्म विरुद्ध ज्याप्रमाणे बुद्धधम्म मानले जाते त्याचप्रमाणे बुद्धधम्म विरुद्ध महायान सुद्धा मानले जाते. याचा अर्थ बुद्धधम्म म्हणजे हिंदुधर्म आणि महायान. हिंदुधर्माने धम्मावर बाहेरून सरळ हमला केला तर महायान पंथाच्या माध्यमातून अंतर्गत हमला करण्यात आला. दोघांच्याही विचारांचा धम्मविचारांवर मोठा हमला, आघात झाला. धम्माला महायान पंथ म्हणजे अस्तनीतले साप ठरले. सुरुवातीपासूनच बौद्धांनी हिंदू विचारांच्या विषारी सापांना दुध पाजण्याचे कार्य केले.
बौद्धांनी बाह्य शत्रूंचा विमोड केला पण अंतर्गत महायानी शत्रूंच्या विषारी चाव्याने बौद्ध जनता बेहोश झाली. त्यांची तर्कशक्ती गेली. आज त्याचाच परिणाम आहे बौद्ध लोक केवळ बुद्धाचा फोटो वा मूर्तीत धम्म शोधण्याचा मूर्खपणा करीत आहेत. हिंदुधर्माचे हे महायानी बांडगुळ जोपर्यत बौद्ध लोक पोसतील तोपर्यंत बौद्धांची दिशाभूल कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून षड्यंत्रकारी महायानी पंथाचा, त्याच्या विचारांचा अंत करणे, हे बौद्धांचे प्रथम कर्तव्य आहे. अंतर्गत शत्रूंचे लाड पुरवून बाह्य शत्रूंशी भांडत बसण्यात बुद्धिमत्ता नाही. महायानी हिंदुधर्मीय विचार आंबेडकरी बौद्ध लोकांच्या अंगात शिरत चालले आहेत. त्याचा खात्मा केलाच पाहिजे. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे.
जनतेचा “महानायक” या दैनिकात दिनांक २७ फेब्रुवारी २०१३ ला माजी न्यायाधीश अनिल नि. वैद्य यांच्या “विपश्यना म्हणजे काय? गैरसमज व शंकांचे निरसन” या पुस्तकाची समीक्षा मिलिंद फुलझेले यांनी लिहिली. त्यात आंबेडकरी जनतेवर धम्मज्ञानी नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि आचार्य सत्यनारायण गोयनका उर्फ गोयंका गुरुजी यांना बुद्ध धम्माचे महापंडित, महाउपासक व महागुरू ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या विचारांचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचे प्रयत्न किती खोटे आणि बेजबाबदारीचे आहेत हे वाचकांच्या लक्षात आणून देणे हाच या ठिकाणी उद्धेश आहे. “धम्माचे प्रात्यक्षिक : विपश्यना” या समिक्षेची ही उजळणी आहे.
प्राचीन गणराज्य पद्धतीवर सुद्धा वर्णव्यवस्थेची छाप होती. शाक्यसंघ हे गणराज्य पद्धतीप्रमाणे कार्य करायचे परंतु त्याचा सेनापती ब्राह्मणवादी “ब्राम्हण” होते. त्यांना वर्णाश्रम व्यवस्थेचा अभिमान होता. क्षत्रिय लोकांच्या संघात ब्राम्हणाचे पद काय दर्शवतो? गणराज्य पद्धती ही वर्णवादी विचारांनी बरबटलेली होती. सिद्धार्थाने कधीही वर्ण व्यवस्थेचा अभिमान केला नाही. उलट तिला तोडण्यासाठीच शाक्यसंघ सेनापतीच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे शाक्य विरुद्ध कोलिय यांच्यातील युद्ध टळले पण वर्णव्यवस्था विरोधी आंदोलन सिद्धार्थ गौतमच्या रूपाने सुरूच राहिले. त्याला संपण्याच्या विचारांचा शोध म्हणजे धम्म पुढे आला.
बुद्धाने सारनाथ येथे ई.सा.पु. ५२८ ला जो “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” उपदेश प्रथम धम्म प्रवचनात पंचवर्गीय (ब्राह्मण) भिक्षुंना केला तोच उपदेश कुशिनारा येथे ई.सा.पु. ४८३ ला अंतिम शिष्य सुभद्र यांनाही दिला. तो म्हणजे “सुभद्र! तथागताच्या धम्म व विनायात आर्य अष्टांगिक मार्ग आहे. जर धम्म व विनय सम्यक मार्गाने चालले तर जगात जागृत लोकांची कधीच कमी होणार नाही.” (डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, “द बुद्ध अंड हिज धम्म,” ७:३:२:१३) आर्य अष्टांगिक मार्गातून एकही मार्ग उना केला तरी धम्म समजता येणार नाही, एवढे ते महत्वाचे आहेत. बाबासाहेबांनी पुढे लिहिले, “सम्यक दृष्टी विकसित करणे याचा अर्थ ‘प्रतीत्य समुत्पादा’च्या “कार्यकारण भावा”ला विकसित करणे होय.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म; ४:४: सद्धधम्म, १:४)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें