समाजाचे मुख्ये अंग १.सत्ता, २.संपत्ती, ३.शिक्षण आणि ४.संकृती आहेत. भारताला इंग्रजांनी सत्तेचे हस्तांतर केले. भारताची राज्यघटना बनली. राजकीय लोकशाही आली. मात्र आर्थिक आणि सामाजिक लोकशाही आली नाही. सत्ता चालविणाऱ्यांवर ती जबाबदारी घटनेच्या उद्देश पत्रिकेत दिली आहे. मात्र उद्देश पुर्तीच्या दिशेने कार्य झाले नाही.
आज देश पुंजीवादी आणि जातीवादी तर आहेच पण अंधश्रद्धा आणि विविध विकृतीने व्याप्त आहे. जनता जगायचे आहे म्हणून जगत आहे, मात्र जगण्याचा उद्देश राहिला नाही. घटना चांगली पण तिची अंमलबजावणी शून्य आहे.
भारतात आर्थिक लोकशाही प्रस्तापित करून समान नागरी कायदा, कमाल संपत्ती धारण कायदा आणि समान वेतन आयोग इत्यादी महत्वपूर्ण बदल घडविले गेले तरच ही घटना जनतेला सुख देऊ शकेल अन्यथा केवळ घटना सांभाळून गरीबांना नागवत ठेवणेच होईल.
ही परिस्थिती लवकर बदलवली गेली नाही तर देशांतर्गत यादवी युद्ध होईल, संविधान सुद्धा जाईल त्या शिवाय देश सुद्धा गुलामीत जाईल. काळजीवाहू लोकांनी घराबाहेर निघून एकत्रित चर्चा करून सुयोग्य पद्धतीने विचार करून त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्याची वेळ जवळ आली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें