शनिवार, 15 जून 2013

धम्मदीक्षा : एक क्रांतिकारी पावुल


मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन धर्मात हिंदू धर्मासारखे देवी-देवता, नशीब, स्वर्ग-नरक, पाप-पुण्य नाहीत का? याचा शोध घेतला असता तिथेही हे प्रकार आहेत. म्हणून हिंदुधार्मापासून अंतर म्हणजे चातुर्वर्ण्य, जाती, अश्पृस्यता यांच्या पासून अंतर तर आहेच तद्वतच जैन, मुस्लीम, ख्रिश्चन या धर्मांपासून ही अंतर घेणे होय. कारण त्यात विज्ञान नाही. भेदभावाचे व अंध:श्रद्धांचे प्रकार ज्या-ज्या धर्मात आहेत ते ते धर्म बाबासाहेबांनी नाकारले. कारण धर्म म्हणजे देवाची, स्वर्गाची आश आहे, ती नुसती काल्पनिक आहे आणि अज्ञान आहे. तर्काच्या वा विज्ञानाचा आधारे ती सिद्ध करता येत नाही.

देव, आत्मा, देऊळ, पूजा, स्वर्ग हे लोकांच्या, भक्तांच्या शोषणाची साधने आहेत. भक्तांनी त्याचा मोह सोडला तर ते तर्कवादी होतील व देव, धर्माच्या पुरोहिती जाळ्यात ते सापडणार नाहीत. ते स्वार्थी लोकांच्या शोषणापासून स्वतःचे रक्षण करतील, अशी समज बाबासाहेबांची होती. हिच समज बुद्धाचीही होती. म्हणून बुद्ध-आंबेडकर या दोघांच्या विचारात फारच साम्य असल्यामुळे ते एकजीव, एकत्रित झालेत. बुद्धाच्या मार्गाला बाबासाहेबांनी धर्म वा रिलीजन मानले नाही. कारण बुद्ध विचारात धर्मातील ईश्वर, आत्मा, पूजापाठ, स्वर्ग-नरक, नसीब यापैकी काहीही नाही. बौद्ध साहित्याचा अभ्यास केल्यावर हिंदू धर्मापासून बुद्ध विचार भिन्न, वैज्ञानिक, क्रांतिकारी व कल्याणकारी लोकशाहीवादी असल्यामुळे बाबासाहेब बुद्धाला शरण गेले, बुद्धाच्या जवळ गेले. बुद्धाच्या विज्ञानवादी विचारांमुळे त्यांनी धम्माचा मार्ग लोकांना सांगितला.

नागपूरला पत्रकारांशी चर्चा करतांना “मी आता बौद्ध झालो असल्यामुळे जातीवर आधारित कोणत्याही संघटनेचा सभासद म्हणून कार्य करणार नाही, कारण बौद्ध धम्मात जाती नाहीत.” असा संदेश दिला होता पण १९५६ नंतर उदयास आलेल्या आंबेडकरी आंदोलनाचे नाव घेत जातीवादी नाव धारण करून “जाती तोडण्याऐवजी जोडण्याच्या” कार्याला लागल्या. केवळ राजकीय फायद्यासाठी धम्म तत्वाची होळी करायची का? धम्मापेक्षा राजकारण मोठे का? जाती जोडण्यातून धम्म विचारांशी विसंगत विविध जातीवादी लोकांना बुद्धाच्या पंगतीत बसविण्यात आले, ते आंबेडकरी जनतेने कसे मुग गिळून सहन केले हेच आता समजत नाही. हे त्यांच्या जागृतपणाचे लक्षण आहे का? हा भारतीय बौद्धांपुढे फार मोठा प्रश्न आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर करवी “धम्मदीक्षा” घेवून आज ५6 वर्षे पूर्ण उलटली पण भारत देशाला धम्ममय का करू शकलो नाही? हा एक फार चिंतेचा प्रश्न आहे. बुद्धाची धम्मक्रांती विफल का झाली? व तिला सफल बनविण्यासाठी काय केले पाहिजे? ते लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. धम्म म्हणजे निश्चित कोणते विचार? ते स्पष्ट नसणे.
२. भिक्षुंकडून भेसळयुक्त विचारांचा सतत प्रसार होने.
३. प्रतिगामी महायानी विचारांचा महास्थविर संघरक्षित, ओशो राजनिश, सत्यनारायण गोएनका यांचा वाढता प्रभाव.
४. परंपरागत धम्म विचारांनी युक्त परदेशी जापानी भन्ते सुरई ससाई, संघरत्न माणकेचे अवास्तव अनुकरण करणे.
५. आदर्श लोकशाही म्हणजे धम्म कसा? जातिगत आरक्षणालाच प्रगतीकारक धम्म समजू लागले.
६. क्षुल्लक आर्थिक जातिगत आरक्षणाला धरून जाती व्यवस्थेने जतन करण्यात आंबेडकरी जनता मग्न झाली.
७. केवळ १०% लोकांनाच फायदेशीर असणाऱ्या जातिगत आरक्षणाला टिकविण्यासाठी अवास्तव महत्व देणे.
८. कार्यकर्त्यांना पोटार्थी समजून त्यांचा अपमान, भ्रमित विचारांचा प्रसार करणाऱ्या भिक्षुंना सन्मान देण्यात देणे.
९. धम्माला वैज्ञानिक आदर्श लोकशाहीला पूरक अशा विचारांवर नवीन मांडणी केल्या गेली नाही.
१०. धम्माला सोपी, वैज्ञानिक व व्यवहारिक करण्याची गरज लक्षात घेतल्या गेली नाही.
११. भिक्षूंचा धम्म म्हणजे बुद्धाचा धम्म नाही तरीही त्याचा पाठलाग करण्यात आला.
१२. या कारणांमुळे भारतच कशाला, केवळ नागपुरातील लोकांना सुद्धा धम्ममय करता आले नाही.

धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक १५ आक्टोंबर १९५६ ला दिक्षभूमी, नागपूर येथील भाषणात बाबासाहेबांनी कळकळीची सूचना केली. ती प्रबुद्ध भारत या ठिकाणी ठळक अक्षरात दि. २७ आक्टोंबर १९५६ ला प्रकाशित झाली. त्याकडे खऱ्या अर्थाने दुर्लक्ष झाल्यामुळे धम्म प्रचाराचा रथ थांबला. त्याला जर प्रामाणिकपणे गतिमान करायचे असेल तर बाबासाहेबांची ती सूचना सतत स्मरणात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे हि, “तुमच्या बद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे..... नाहीतर महार लोकांनी धम्म निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये. म्हणून आपण निश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, ईतकेच नव्हेतर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही. “आपापल्या प्राप्तीचा २० वा हिस्सा या कामी देईन असा, निश्चय करावा........ समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे, असे मी जाहीर करतो.” जे समाजकार्य करीत नाही त्यांना बाबासाहेबांनी “शेणातील किडे” म्हटले आहे. ते म्हणतात, “समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात....बाकीचे सार्वजन शेणातील किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात.” (बामसेफच्या आंबेडकरद्रोही भूमिकेची छाननी, एस. डी. भवार, पृष्ठ-२०२) अशा माणसांना ‘तू शेणातल्या किड्याप्रमाणे जीवन जगतोस’ याची जाणीव करून देणे, हे प्रत्येक सुशिक्षितांचे कर्तव्य आहे.

सिद्धार्थ गौतम बुद्धाचा धम्म हा वर्ण विरोधी, अंधश्रद्धेच्या विरुद्ध, मानवात न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुभावाची लोकशाही मुल्ये शिकविणारा आहे. जगात वैज्ञानिक लोकशाही विचारांवर अधिष्ठित राज्य चालावे. ते लोकांनी, लोकांच्या स्पर्धेतून नव्हे करता तर “लोक सहयोगातून वैचारिक परिवर्तन” घडवून आणावे, अशी बुद्धाची इच्छा होती. संपत्तीची अमर्याद मालकी त्यांना नको होती तसेच संमतीच्या साधनांचा त्यांना हव्यासही नको होता.

मानवी सुखापुढे संपत्ती गौण, शून्य आहेत. म्हणूनच संपत्तीचा अवास्तव, असीमित मोह त्यांनी टाळला. बुद्धाचा सुखी जीवनाचा मार्ग म्हणजे “सम्यक मार्ग” होय, तो वैज्ञानिक, आदर्श लोकशाही युक्त, धर्मनिरपेक्ष आणि परस्परात सौख्य निर्माण करणारा आहे. त्यामुळेच विश्वातील सर्व जनता सुखी होती. धम्मदीक्षितांनी “वैज्ञानिक धम्म” सतत पाळून व त्याचा प्रचार-प्रसार करून विश्वात धम्म राज्य निर्माण करावे तरच बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेला खरा अर्थ प्राप्त होईल. महामानव गौतम बुद्धाच्या धम्माला “सम्यक दृष्टी” म्हणजे “वैज्ञानिक दृष्टी” समजून “जगाची पुनर्रचना” करण्याची कधी नव्हती एवढी आज नितांत गरज आहे.

जाती जोड़ो अभियान और तानाशाही माया

भारत में केवल १% बौद्ध है.... तो बामसेफ और बीएसपी के सरकारी कर्मचारियों ने बुद्ध के धम्म क्रांति में कितना सहयोग दिया है? अम्बेडकरवाद का महत्वपूर्ण अंग बुद्धिज़्म है, जिसे भारत में फ़ैलाने का कार्य बाबासाहब अम्बेडकर ने अपने आंगपर लिया था परन्तु उनका जयघोष करनेवाले बामसेफ, बीएसपी के सरकारी कर्मचारी बेईमान निकले.


देश में बुद्धिज़्म को बढ़ावा देने के बजाए जातिभेदभाव बढाने के लिए कार्य कर रहे है. उसी का नतीजा है आज सबसे ज्यादा जातिवादी हिंसाचार बीएसपी का बोलबाला होते हुए भी हो रहे है. तो प्रश्न यह उठता है की बीएसपी सिर्फ जातिवादी सत्ता चाहती है या जातिभेदभाव को ख़त्म भी करना चाहती है.?

पिछड़े सरकारी कर्मचारियों के दम पर बनी बीएसपी पार्टी जातियों को बरक़रार रखते हुए केवल सत्ता चाहती है, यह भी एक जातिवादी राजनीती है, उसे बौद्ध धम्म प्रचार के अंग से जोड़ना बेवकूफी के आलावा और कुछ भी नहीं है. जातिगत पिछड़े वर्ग के सरकारी या निजी कर्मचारियों ने यह साबित करना चाहिए की उन्होंने बाबासाहब अम्बेडकर के धम्म प्रचार में सहयोग दिया है, अगर दिया है तो कोनसा है?

केवल अपना परिवार चंगा करना और जाती के नामपर लोगों को भड़काकर वोट मांगने के शिवाय किया ही क्या है? यह धम्म प्रचार का महत्वपूर्ण हिस्सा नहीं हो सकता, क्या बुद्ध-अम्बेडकर साहब की मुर्तिया रास्तों पर खडी करना ही धम्म प्रचार है? लोगों को अम्बेडकर या बुद्ध की तस्वीर या मुर्तिया दिखाकर जातिवाद के विषमतावादी कीड़े को कतम कर सकते है?

स्पष्ट है बामसेफ, बीएसपी अम्बेडकरवादी पार्टी नही है तथा वह बौद्ध लोगों की हिमायती भी नही है, वह केवल जातियों के दमपर दुसरे जातियों से खुद को ऊँचा साबित करना चाहती है, जातिवाद के आधारपर कोई भी व्यक्ति ऊँचा नहीं हो सकता, चाहे वह ब्राह्मण हो या चमार, जातियों को अगर विदेश में जाकर बेचो तो नगण्य मूल्य मिलेगा, क्या राजनीती के आधारपर धम्म प्रचार करना संभव है?

अगर ऐसा ही होता तो हिन्दू धर्म को माननेवाले कांग्रेस के पास कहीं बरसों से सत्ता है पर वे भारत को बौद्ध, जैन, मुस्लिम और इसाई मुक्त कर सके? सत्ता के डर से न धम्म का प्रचार संभव है और न कोई भी धर्म प्रचार, इसलिए सत्ता आनेपर हम सबकुछ करेंगे का नारा बेबुनियाद के विचारों पर खड़ा है.

उत्तर प्रदेश में ९ साल तक बीएसपी की सत्ता रही फिर भी वहां के जातिवाद को वह ख़त्म नही कर सकी तो उनके हाथ में देश की सत्ता देनेपर वह कैसे कर पायेगी ? इसका प्रारूप उन्होंने जनता को समझाना चाहिए, न की जोर जबरन या हिंदूइस्म के डर को बताकर राजनीती नही करनी चाहिए. अगर बीएसपी बौद्ध विचारों की पार्टी होती तो उन्होंने अपने मंत्रियों को धम्म शिक्षा दी होती जिससे वे भ्रस्टाचार के शिकार नहीं होते.

बीएसपी के करीब ९०% मंत्री भ्रष्ट्राचार में लिप्त होनें का आरोप यही बात सिद्ध करता है, की बीएसपी बुद्धिज़्म का नही तो हिंदूइस्म का प्रचार करती है. मायावती के मूर्तियों का जब विरोध किया जाता है तब बीएसपी के नुमैन्दे यह तर्क देते है की जब कांग्रेस-बीजेपी करती है तो उनका विरोध क्यों नही किया जाता?

दूसरी पार्टी अगर गलत करती है तो उसका विरोध करना चाहिए या उनका अनुकरण? बीएसपी दुसरे पार्टियों के दुर्गुणों का अनुकरण करके सही, उचित, योग्य साबित नही हो सकती. चाहे कोई भी पार्टी रहे अगर दुर्गुणों का समर्थन और अनुकरण करती है तो वह जनतंत्र के लिए खतरा पैदा करती है. उसमे बीएसपी भी दूध की धूलि नही है, जो भारतीय बौद्ध है, जो अम्बेडकरी प्रेरणा से बौद्ध विचारों को अपनाने का दावा करते है, उनका क्या फर्ज है?

क्या राजनीती पाने के लिए धम्म विचारों की क़ुरबानी देना चाहिए? अगर राजनीती जीवन का एक अभिन्न अंग है तो क्या उस अंग में बुद्धिज़्म के विचार होना अनुचित है? राजनिति में धम्म विचार क्या जनतंत्र के लिए खतरा है? अगर वह जनतंत्र को फायदेमंद है तो उसे जनतांत्रिक लोगों ने दूर रखने की कौनसी जरुरत है?

जनतंत्र ही धम्म है और धम्म ही जनतंत्र है. जो धम्मधारी लोग या राजनीती में धम्म विचारों का विरोध करते है वे धम्म विरोधक है, उनके जरिए सत्ता भी आए तो वह धम्म प्रचार करेंगे इसकी कोई भी शास्वती नही है. मायावती के अंग अंग में हिन्दुधर्म का जातिवाद कुटकुट कर भरा है, जो बुद्धिज़्म का हिस्सा नही है, उनके जरिए धम्म प्रचार का सपना देखना मुर्खता के अलावा और क्या हो सकता?

विपस्सना : एक महायानी (हिन्दू) षड्यंत्र



विपस्सना हा पाली भाषेतील शब्द आहे पण तो प्राचीन त्रिपिटकात नाही. तो अर्वाचीन आहे. “पस्स” म्हणजे “पहा” होते तर “पस्सना” म्हणजे “पाहणे” होते आणि विपस्सना म्हणजे “विशेष पाहणे.” हिंदुधर्म विरुद्ध ज्याप्रमाणे बुद्धधम्म मानले जाते त्याचप्रमाणे बुद्धधम्म विरुद्ध महायान सुद्धा मानले जाते. याचा अर्थ बुद्धधम्म म्हणजे हिंदुधर्म आणि महायान. हिंदुधर्माने धम्मावर बाहेरून सरळ हमला केला तर महायान पंथाच्या माध्यमातून अंतर्गत हमला करण्यात आला. दोघांच्याही विचारांचा धम्मविचारांवर मोठा हमला, आघात झाला. धम्माला महायान पंथ म्हणजे अस्तनीतले साप ठरले. सुरुवातीपासूनच बौद्धांनी हिंदू विचारांच्या विषारी सापांना दुध पाजण्याचे कार्य केले. 

बौद्धांनी बाह्य शत्रूंचा विमोड केला पण अंतर्गत महायानी शत्रूंच्या विषारी चाव्याने बौद्ध जनता बेहोश झाली. त्यांची तर्कशक्ती गेली. आज त्याचाच परिणाम आहे बौद्ध लोक केवळ बुद्धाचा फोटो वा मूर्तीत धम्म शोधण्याचा मूर्खपणा करीत आहेत. हिंदुधर्माचे हे महायानी बांडगुळ जोपर्यत बौद्ध लोक पोसतील तोपर्यंत बौद्धांची दिशाभूल कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून षड्यंत्रकारी महायानी पंथाचा, त्याच्या विचारांचा अंत करणे, हे बौद्धांचे प्रथम कर्तव्य आहे. अंतर्गत शत्रूंचे लाड पुरवून बाह्य शत्रूंशी भांडत बसण्यात बुद्धिमत्ता नाही. महायानी हिंदुधर्मीय विचार आंबेडकरी बौद्ध लोकांच्या अंगात शिरत चालले आहेत. त्याचा खात्मा केलाच पाहिजे. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. 

जनतेचा “महानायक” या दैनिकात दिनांक २७ फेब्रुवारी २०१३ ला माजी न्यायाधीश अनिल नि. वैद्य यांच्या “विपश्यना म्हणजे काय? गैरसमज व शंकांचे निरसन” या पुस्तकाची समीक्षा मिलिंद फुलझेले यांनी लिहिली. त्यात आंबेडकरी जनतेवर धम्मज्ञानी नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि आचार्य सत्यनारायण गोयनका उर्फ गोयंका गुरुजी यांना बुद्ध धम्माचे महापंडित, महाउपासक व महागुरू ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या विचारांचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचे प्रयत्न किती खोटे आणि बेजबाबदारीचे आहेत हे वाचकांच्या लक्षात आणून देणे हाच या ठिकाणी उद्धेश आहे. “धम्माचे प्रात्यक्षिक : विपश्यना” या समिक्षेची ही उजळणी आहे. 

प्राचीन गणराज्य पद्धतीवर सुद्धा वर्णव्यवस्थेची छाप होती. शाक्यसंघ हे गणराज्य पद्धतीप्रमाणे कार्य करायचे परंतु त्याचा सेनापती ब्राह्मणवादी “ब्राम्हण” होते. त्यांना वर्णाश्रम व्यवस्थेचा अभिमान होता. क्षत्रिय लोकांच्या संघात ब्राम्हणाचे पद काय दर्शवतो? गणराज्य पद्धती ही वर्णवादी विचारांनी बरबटलेली होती. सिद्धार्थाने कधीही वर्ण व्यवस्थेचा अभिमान केला नाही. उलट तिला तोडण्यासाठीच शाक्यसंघ सेनापतीच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे शाक्य विरुद्ध कोलिय यांच्यातील युद्ध टळले पण वर्णव्यवस्था विरोधी आंदोलन सिद्धार्थ गौतमच्या रूपाने सुरूच राहिले. त्याला संपण्याच्या विचारांचा शोध म्हणजे धम्म पुढे आला.

बुद्धाने सारनाथ येथे ई.सा.पु. ५२८ ला जो “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” उपदेश प्रथम धम्म प्रवचनात पंचवर्गीय (ब्राह्मण) भिक्षुंना केला तोच उपदेश कुशिनारा येथे ई.सा.पु. ४८३ ला अंतिम शिष्य सुभद्र यांनाही दिला. तो म्हणजे “सुभद्र! तथागताच्या धम्म व विनायात आर्य अष्टांगिक मार्ग आहे. जर धम्म व विनय सम्यक मार्गाने चालले तर जगात जागृत लोकांची कधीच कमी होणार नाही.” (डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, “द बुद्ध अंड हिज धम्म,” ७:३:२:१३) आर्य अष्टांगिक मार्गातून एकही मार्ग उना केला तरी धम्म समजता येणार नाही, एवढे ते महत्वाचे आहेत. बाबासाहेबांनी पुढे लिहिले, “सम्यक दृष्टी विकसित करणे याचा अर्थ ‘प्रतीत्य समुत्पादा’च्या “कार्यकारण भावा”ला विकसित करणे होय.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म; ४:४: सद्धधम्म, १:४)