गुरुवार, 18 जुलाई 2013

आनंद तेलतुम्बले आणी कांशीराम भक्त

दिनांक १४ मार्च २०१३ ला “जातीप्रश्न आणि मार्क्सवाद” या विषयावर डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे चंडीगड, पंजाब येथे भाषण झाले. त्याची बातमी दिनांक १८ मार्च २०१३ ला दैनिक “जनतेचा महानायक” मध्ये अगदी मुखपृष्टावर वाचून आश्चर्य झाले. कारण त्या बातमीचे ठळक शीर्षक होते, “डॉ. आनंद तेलतुंबडेकडून बाबासाहेबांचा अवमान”. ह्या बातमीला वाचून आणखी एका वाचकाने प्रतिक्रिया लिहिली. ती सुद्धा जहाल होती. मग दिनांक २९ व ३० मार्च २०१३ चा दैनिक “जनतेचा महानायक” मध्ये पुन्हा डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे हिंदीतील भाषण वाचायला मिळाले व दिनक ३१ मार्च २०१३ ला “आंबेडकरवाद नाकारणारी गुरुमाउली : डॉ. तेलतुंबडे” या शीर्षकांतर्गत वाचकांना आवाहन करण्यात आले कि त्यांनी प्रतिक्रिया पाठवाव्यात म्हणून सदर प्रतिक्रिया बुद्धीजीवी वाचकांसाठी देत आहे.

    बाबासाहेबांचे दलित मुक्तीचे प्रयोग अत्यंत अयशस्वी ठरले, असे म्हटले म्हणजे अवमान झाला असे दैनिक जनतेचा महानायक” च्या (कांशीरामवादी) संपादकाला वाटले आणि दुसऱ्या बातमीत ‘डॉ. तेलतुंबडे यांनी आंबेडकरवाद कसा नाकारला?’ तेही विषद केले नाही, आरोप करणे सोपी जाते पण त्याचे विश्लेषण कठीण जाते. आरोप जर भावनेवर आधारित असतील तर ते सिद्ध करणे आणखीनच कठीण जाते. परंतु वैचारिक वाद वाढतच गेला. संपादकाची भूमिका मानसिकता अभ्यासू नसून भावनिकच होती हे निदर्शनास आले. भावनिक मुद्याला हात घातला कि आंदोलन करण्याला मुद्ये मिळतात. ते मिळविण्यासाठी डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी केलेल्या भाषणाला वादग्रस्त केले तर पेपरला श्रेय, पर्यायाने खप आणि स्वारीप पक्षाला चांगले मुद्धे हाताळणारा पक्ष म्हणून वाहवा होईल. अशा उद्धेशाने “जातीचा प्रश्न” चर्चेला आला.
   
        बाबासाहेबांना कोणी इतरांनी नापास झाले म्हटलेले चालत नाही, तसे म्हटले तर तो त्यांचा अपमान होतो आणि त्यांच्या आज्ञेला न जुमानता कार्य केल्यास मान होतो? पण दैनिक “जनतेचा महानायक”चे संपादक तसेच समजतात हे फार दुखाची बाब आहे. असे म्हणून ते समाजाला जोडू पाहतात कि तोडू पाहतात? हेच मला समजत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी “आग्रा” येथील “रामलीला मैदानात” दिनांक १८ मार्च १९५६ ला आपल्या जाहीर 'भाषणात काय म्हणाले होते? “द एज्युकेटेट पिपल ह्याव िडसिव्ह मी” अर्थात “मला शिकल्या सवरलेल्या लोकांनी धोका दिला” ह्या विषयावर फार मोठे विस्तारित भाषण केले होते. तसेच बाबासाहेबांचे गंभीर, मनाला हेलावून सोडणारे “स्वकथन” लक्षात घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचे सहकारी “नानक चंद रत्तु” यांच्याजवळ ओक्षाबोक्षी रडत-रडत काय म्हणाले? ते ध्यानात घेतले तर त्यांनीच स्वता:चा पराभव स्वीकारला होता कि नाही? हे प्रकर्षाने लक्षात येयील. नानकचंद रत्तू त्यांच्या “रेमिनिसंसेस अंड रिमेम्बरंसेस ऑफ डॉ. बी. आर. आंबेडकर” यात काय लिहितात?
   
        “मंगळवारी, दिनांक ३१ जुलै १९५६ रोजी संध्याकाळी पाच-पन्नासला मी (बाबासास्हेब आंबेडकर) “२६, अलीपूर रोड,”ला पोचलो आणि रोजच्या प्रमाणे दिवसभरात आलेले टपाल घेऊन त्यांच्याकडे गेलो. माझ्या खोलीच्या समोर ओसरीत बसून आणि स्टूलावरच्या उशीवर पाय ठेवून त्यांनी मला डीक्टेशन द्यायला सुरुवात केली पण मध्येच त्यांनी डोळे मिटले, डोके खुर्चीच्या पाठीवर टेकवले आणि त्यांना झोप लागली. मी त्यांच्या क्लांत चेहऱ्याकडे एकटक बघत शांत बसलो. थोड्या वेळाने त्यांना जाग आली आणि मी वाचून दाखवलेल्या काही पत्रांची उत्तरे त्यांनी भराभर डीक्टेट केली. मग माझ्या खांद्यावर हात ठेवून ते झोपायच्या खोलीत गेले आणि अंथरुणावर त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या दुसऱ्या हातातले पुस्तक खाली पडले.

        (नानाक्चंद रात्तू पुढे लिहितात) काही वेळ ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळे मी घाबरलो मी त्यांच्या डोक्याला, पायांना मसाज केले. त्यामुळे ते थोडे शांत झालेले दिसले. हि संधी मला योग्य वाटली तरी थोडा संकोच वाटतच होता. मी पुढे होऊन त्यांच्या बिछान्याजवळच्या स्टुलावर एकदम त्यांच्या आमने-सामने बसलो आणि माझे मन दीर्घकाळापासून कुरतडणारा तो प्रश्न यावेळी अगदी निर्धार करून, धाडस एकवटून त्यांना मी विचारलाच, “सर, अलीकडे आपण एवढे दुःखी आणि खिन्न का दिसता? अधून-मधून डोळ्यांतून पाणी का गाळता? मी तुम्हाला हे विचारल्याबद्दल सर, आपण मला क्षमा करा. पण मला आज ह्या प्रश्नाचे उत्तर द्याच.” माझी उत्कटता त्यांना जाणवली असावी. काही क्षण एकदम शांततेत गेले, काहीही प्रतिसाद मिळाला नाही. थोड्या वेळानंतर ते काहीसे उत्तेजित आणि सैरभैर झालेले दिसले. त्यांचा गळा भावनेने भरून आला. मस्तकाच्या किंचित वर आपला हाताचा तळवा ठेवून त्यांनी मौन सोडले...

        “मला (बाबासाहेब म्हणाले) कशाचा त्रास होत आहे आणि कशाने दु:ख होत आहे हे तुम्हा लोकांना माहित नाही. माझी पहिली खंत हि आहे कि ‘मी माझे जीवनकार्य पूर्ण करू शकलेलो नाही’. माझे लोक इतर समाजांशी बरोबरीपुर्वक राजकीय सत्येचे वाटेकरी होऊन सत्ताधारक बर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती. मी आता जवळपास अपंग झालो असून आजारपणामुळे आडवा पडलो आहे. जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला आहे. पण त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि दलित, शोषित लोकांबद्धलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागते. ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत. ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यांसाठीच जगतात. त्यांच्यापैकी एकही जन सामाजिक कार्य करायला तयार नसतो. मला आता माझे लक्ष खेड्यातील हजारो-लाखो लोकांकडे वळवायचे होते. ते अजूनही हाल-अपेष्टा भोगत आहेत. त्यांची आर्थिक स्थिती मुळीच बदललेली नाही पण आता आयुष्य फार थोडे शिल्लक राहिले आहे...

    “मला असेही वाटले होते कि माझी सगळी पुस्तके माझ्या हयातीतच प्रकाशित व्हावीत. “द बुद्ध अंड हिज धम्म”,  “बुद्ध आर कार्ल मार्क्स,” “रिव्होल्युशन अंड कॉऊंटर रिव्होल्युशन इन एंिशयंट इंडिया”, आणि ‘रिडल्स आफ हिन्दुइझम’ हि माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ आणि असहाय ठरत आहे हि नुसती कल्पनासुद्द्ध मला भयंकर क्लेशकारक होते. कारण मी मेल्यावर दुसरे कोणीच हि पुस्तके प्रकाशित करणार नाही.”..... कोणीतरी पददलित वर्गातून माझ्या हयातीतच पुढे येईल आणि माझ्या पश्चात हि चळवळ पुढे चालविण्याची अवजड जबाबदारी पत्करील अशीही माझी अपेक्षा होती पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यांपुढे येत नाही. माझे काही सहकारी हि चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरवसा होता ते आज नेतृवासाठी आणि स्वार्थासाठी एकमेकात भांडत आहेत. त्यांच्याशिरावर येवू घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही असल्याचे दिसत नाही.... हा देश आणि येथील लोक ह्यांची आणखी काही काळ सेवा करण्याची संधीही मला हवी होती. ज्या देशातील लोक एवढे जातिग्रस्त आणि पुर्वग्रहपिडीत आहेत तेथे जन्माला येणे हे पातक आहे. विध्यमान चौकटीत या देशाच्या कारभारात आपला रस टिकवून ठेवणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. कारण प्रधान मंत्र्याच्या मतांशी न जुळणारे दुसरे कोणतेच मत ऐकूनही घेण्याची येथील लोकांची तयारी नाही. किती खाईत चाललाय हा देश!

    “नानक चंद! तू माझ्या लोकांना सांग कि मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देवू शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळविले आहे. ते करतांना मन पिळवटून टाकणाऱ्या संकटाचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला. सगळीकडून विशेषतः हिंदुवृत्तपत्र सृष्टीकडून माझ्यावर शिव्या-शापांचा वर्षाव सतत होत राहिला. जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला. माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले, त्यांच्याशीही मी दोन-दोन हात केले. मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत या देशाची आणि पददलितांची सेवा करीत राहीन. हा काफला आता येथे दिसतो त्याला आणता-आणता मला खूप त्रास सहन करावे लागले. हा काफला आणि असाच पुढे, आणखी पुढे चालत ठेवावा. वाटेत अनेक अडथळे येथील, अकल्पित संकटे कोसळतील पण वाटचाल सुरूच ठेवावी. त्यांना जर सन्मानाने आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन जगायची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी सतत पेलले पाहिजे.

    “जर माझे लोक, माझे सहकारी माझा काफला पुढे नेण्यास असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जिथे आहे तिथेच तरी त्यांनी तो राहू द्यावा. पण कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफिल्यास परत मागे फिरू देवू नये. हा माझा संदेश आहे. बहुदा शेवटचा संदेश आहे. मी तो अत्यंत गंभीरतेने देत आहे. आणि या गांभिर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी मला खात्री वाटते. जा आणि सांग त्यांना! जा आणि सांग त्यांना!! जा आणि सांग त्यांना!!!” असे तिनदा पुनरुच्चार करून ते थांबले, त्यांना हुंदके फुटले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढळाढळा ओघळू लागले. निराशेच्या गर्तेत ते बुडाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर असह्य वेदना आणि तीक्ष्ण यातना स्पष्ट दिसत होत्या..१..

    डॉ. बाबासाहेबांनी सन १९३६ला “जाती व्यवस्थेचे उच्चाटन” (Annihilation of Caste) ह्या नावाचा संशोधनपर ग्रंथ लिहिला. त्याचा उद्धेश एवढाच होता कि जाती ह्या समाजात उच्च-नीच भावना वाढवतात. लोकं भेदभाव करून माणसाला माणूस दूर लोटतो. शत्रू होतो. असे झाले तर समाजातील प्रेमाचे आरोग्य बिघडेल. व्यक्ती व समाज सुखापासून दूर जाईल अर्थात दुखी होईल. भारतीय जनतेला दु:खातून काढण्याच्या उद्धेशाने त्यांनी हा ग्रंथ लिहिला. जातींच्या विनाशासासाठी अनेक लहान-मोठ्यांनी आवाज उचलला पण त्याला कृतीची योग्य जोड मिळाली नाही आणि जाती होत्या तश्याच कायम राहिल्या असे नसून व्यक्तींच्या विकासासोबतच त्या विस्तारत गेल्या. त्यांनी बुद्धीमानाला आणि निर्बुद्धाला, गरिबांना आणि श्रीमंतांना, भिकारी आणि धनाढ्यांना, भक्तांना आणि देवांना सुद्धा ग्रासून सोडले. जाती दिसत नसल्या तरी त्यांची मानसिक भीती कायम राहते, जाती म्हणजे बंदीगृहच आहे.

    भारतीय लोकात जन्मापासून तर मृत्युपर्यंत, मानसिक गुलामीतूनच शारीरिक गुलामीचा प्रवास आहे. या प्रवासात साधनशून्य बहुसंख्य जातीतील लोक आपला प्रवास किती कष्टदायी करीत असतील ह्याची पळभर तरी कोणी कल्पना करतो का? आणि केवळ कल्पनेने काय होणार? उचित कृतीतरी करतो काय? एकट्याच्या कृतीने काय होणार? सामुहिक कृती होते काय? कधी-कधी केलेली कृती कोणत्या कामाची? ती सतत होते का? वर्गवाद संपेल तरी जातिवाद कायम राहील आणि तो हळूहळू पुनःपुन्हा पवित्र-अपवित्रतेची झालर लावून आर्थिक समता वा साम्यवाद संपवेल. म्हणून जाती संपवण्याची चांगली औषधी बुद्धाजवळच आहे, मार्क्स जवळ नाही, असे बाबासाहेबांना वाटले म्हणून त्यांनी कार्ल मार्क्स ऐवजी बुद्धाकडून कान टोचवून घेतले. जर भारतात अस्पृश्यता नावाची अमानवीय, अपमान करणारी प्रथा सुद्धा जातीतुनच उदयास आली. जोपर्यंत जात जात नाही तोपर्यंत अस्पृश्यता राहील या भीतीतून बाबासाहेबांनी प्रथम “जातीचे उच्चाटन” करण्याच्या कार्याला प्रारंभ केला.

    जातीप्रथा घालविण्यासाठी बामसेफने प्रयत्न (?) सुरु केले आणि जातीला घालवणे महाकठीण नाही तर अशक्य आहे, असे समजून कांशीराम माघारी फिरले. बाबासाहेबांच्या “जाती तोडो” आंदोलनाला “जाती जोडो” (जाती जिवंत ठेवा, अशा) आंदोलनात बदलविण्यात आले. जाती जोडण्याचे कार्य भूषणावह म्हणायचे का? ह्या कार्याला आंबेडकरी उद्धेशाला पूरक म्हणावे का? जाती तोडण्याच्या उद्धेशाने ज्यांनी बामसेफ संघटन बनविले त्यांना जातींचे मानसशास्त्र न कळल्याने त्याचा परिणाम उलट झाला. जातींनीच त्यांच्या संघटनेला तडा दिला. जवळचे लोक दूर गेले. “खापर्डे विरुध्द कांशीराम” असे समीकरण पुढे आले. जातींचे संघटन जातींच्या गुणामुळे जोडण्याचे कार्य करण्याऐवजी तोडण्याचे कार्य करते हे सिद्ध झाले. जे लोक विचारांच्या आधारावर एकत्र येतात ते विचारांसाठी टिकतात पण जातींच्या आधारे एकत्र येणारे तुटतात. हे अनुभवून सुद्धा जाती जोडण्याचा प्रयत्न करतात त्यांना काय म्हणावे?

    डॉ. आनंद तेलतुंबडे म्हणतात राजकीय आरक्षण बाबासाहेबांनी मागीलते पण त्या सोबतच शिक्षणासाठी व नोकऱ्यासाठी मिळाले. ते लोकसंख्येच्या प्रमाणात असल्याने अन्यायी ठरले. एकूण मागासवर्गाला फक्त १०% सुविधा म्हणजे योग्य न्याय आहे का? राजकीय क्षेत्रात ते ठीक आहे पण शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात ते अन्यायी आहे, असे त्यांचे मत त्यांनी मांडले. ते मांडतांना त्यांनी बाबासाहेबांना घाण शिव्या दिल्या असत्या तर त्यांनी बाबासाहेबांचा अवमान केला, असे म्हणायला जागा होती, पण तसे झाले नाही. तरीही त्यांच्यावर अवमान केल्याचा आरोप का? असे आरोप होत राहिले तर चिकित्सा, समीक्षा वा विचार स्वातंत्र्य जोपासले जाते, असे म्हणायचे का? कठ्ठरवाद मुस्लिमात आहे पण बौद्धात तो आला असेल तर धम्म बुद्धिवादी, बुद्धीप्रामान्यवादी कसला? त्याआधारे समाजातून भक्कम पैसा उभा केला आणि कोणत्या कामाला लावला? तर तो जातींना जोडण्यासाठी, जाती जोपासण्यासाठी, जातींना खतपाणी घालण्यासाठी, जाती जुडण्याऐवजी तुटल्या का?. महार जातींपासून नेत्यांनी चमार जातींना वेगळे केले. महाराष्ट्रापासून उत्तरप्रदेश विभक्त केला. जातींच्या नेतृत्वाबाबाद झगडे झाले. ते झाकण्यासाठी कांशीराम विरुद्ध झल्ली अशा दोन विभागात चळवळ भटकली.

    श्रीकुष्ण उबाळे साहेबांना बसपातून बाहेत फेकल्या गेले. त्यांनी आपले राजकीय कारस्थान सुरु केले. दाउदराम रत्नाकर निघाले. बि. डी नानवटे बीएसपी ला सोडून आले आणि नंतर म्हातारपणी मनोहर आटेलाही निघून घरी यावे लागले. उत्तरप्रदेशपासून महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश बाहेर झाला. कालांतराने पंजाब सुद्धा युपीपासून तुटला, आंध्रप्रदेश तुटला. या राजकीय तुटीशिवाय झल्लीच्या संघटनेचे दोन तुकडे झाले, एक झल्लीवाला आणि गंगावणे/ खापर्डेवाला. एवढेच कशाला पुढे नेतृत्वासाठी वामन मेश्राम हुकुमशाहीने प्रेरित होऊन खापर्डेपासून दूर पळाला. कोर्ट-कचेऱ्या सुरु झाल्या. सामाजिक परिवर्तनाशिवाय राजकीय परिवर्तन शक्य नाही असे म्हणणारे लोक राजकीय सत्येचे एवढे आदी झाले कि त्यांनी विभक्त आर.पी.आय. च्या पाहुलांवर पाहुल ठेवून श्रीकृष्ण उबाळे, माजी जिल्लाधिकारी किशोर गजभिये,

       तानाशाह वामन मेश्राम, एम्बसकार विजय मानकर आणि सुनील खोबरागडे हे सर्व बहुजन-मुळनिवाशीवादी बीएसपीच्या सुप्रीमो मायावती विरुद्ध उभे झाले अर्थात हा बाबासाहेबांचा व त्यांच्या विचारांचा विरोधच नव्हे का? असे का झाले? कारण बाबासाहेबांची बाजू कांशीरामला सहवासातून समजून घेता आली नाही आणि नाही त्यांनी बाबासाहेबांची पुस्तके वाचण्याचा प्रयत्न केला. पुस्तिका “अनिहीलेशन आफ कॉष्ट” सुद्धा वाचून तिच्या विरुद्धच  चळवळीला गती दिली. असे असता कांशीरामने बाबासाहेबांचा अवमान केला कि डॉ. तेलतुंबडे यांनी केला? हे समजून घेण्यासाठी कांशीरामचे काही विचार या ठिकाणी देणे उचित आहे अन्यथा कांशीरामभक्त सुनील खोबरागडे यांच्या आरोपाला तथ्ये आहे कि नाही? हे कळणार नाही. जातीवादी कांशीराम हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रती काय म्हणाले होते?

१)    “अनिहीलेशन ऑफ काष्ट अर्थात जाती का विनाश, १९६२-६३ में जब मुझे इस पुस्तक को पढने का मौका मिला तो मुझे भी ऐसा महसूस हुआ की शायद “जाती” का विनाश संभव है, लेकिन बाद में जब मैंने “जाती”, “जाती व्यवस्था”, और “जाती आचरण” का गहराई से अध्ययन किया तो मेरे सोच में परिवर्तन आने लगा. मैंने जातियों का अध्ययन महज किताबों से नहीं, तो असल जिंदगी से किया है.....इसलिए मैंने “जाती के विनाश” के दिशा में सोचना बंद कर दिया.....जाती ऐसी कोई चीज नही है जिसे मात्र आपके चाहने से नष्ट किया जा सकता है. जाती को नष्ट करना लगभग असंभव है.” (२/पृ१२६)

२)    “मै राम सम्बन्धी आम्बेडकर के विचारोंसे सहमत नहीं हूँ....मै तबतक अपने लोगों को बुद्धिस्ट नहीं बनने दूंगा, जबतक वे आरक्षण देनेलायक नही बन जाते”. (‘बुद्धधम्म हिन्दुधर्म की ही एक शाखा है.’ - मायावती) (२/पृ१३७-८)

३)    “महार जाती जबतक अम्बेडकर को घसीटती रहेगी तबतक अपना विकास नही कर सकती. महार जाती तबतक हमसे नही जुड़ सकती जबतक अम्बेडकर का पीछा नही छोडती.” (२/पृ१३९)

४)    “महाराष्ट्र में महात्मा फुले फेल कराए जा चुके है, शाहू महाराज फेल कराए जा चुके है, बाबासाहब फेल कराए जा चुके है, इसलिए हमें दिक्कत होती है. वह (आरपीआय) तो गाँधी-नेहरू का कार्य कर रही है. बाबासाहब का कार्य नही कर रही है. महार इसलिए करता हूँ की यह अपने (पुरखों) संघर्ष को भूले नही है.....ब्राह्मणवादी ताकतों के साथ बुद्धिस्टोंने नही संघर्ष किया था, महारों ने किया था.....इसलिए उन्हें बुद्धिस्ट नही कहता.” (२/पृ१३९)

५)    “महाराष्ट्र में धंदा करनेवाले लोग ज्यादाही होसियारी दिखाते है. निकम्मे लोग बहुतही होसियारी दिखाते है. वे नागपुर में बाबासाहब को अगरबत्ती, मोमबत्ती चढाते है और उसीसे बह इतने बढे अम्बेडकरवादी हो गए है.” (२/पृ१४०)

६)    “कल ही मै ताजमहल होटल मै एक मीटिंग को सुन रहा था. एक आदमी मुझसे मिलने आया. शक्ल से भी लगता था की यह महार है. उनकी अक्ल से भी लगता था की यह महार है. महार है यह तो शक्ल से भी अक्ल से भी लगता था. लेकिन यह रिपब्लिकन पार्टी का नेता है यह तो उनके बोलने से पता चला. तो उसने मुझसे कहाँ की “भाई! आप महार क्यों कहते हो?” मै बोला काश यह सत्य होता, कितना अच्छा होता तुम बौध्द होते?” (२/पृ१४०)

७)    “जो पढालिखा आदमी है महाराष्ट्र में, वह बौद्ध नही है. पढा-लिखा कर्मचारी बौद्ध नही है. वो सर्टिफिकेट लेकर घूमता है, हिन्दू हरिजन है. जो कालेज में पढता है, स्कुल में पढ़ता है वो बौद्ध नही है. महाराष्ट्र में आजतक एक करोड़ से भी ज्यादा बौद्ध क्यों नही है? क्योंकी जो बुद्धू है वो बौद्ध है. जब वो होसियार लोग बौद्ध नही है तो बुद्धू लोग इतने भी बुद्धू नही है की वह बौद्ध बन जाए.” (२/पृ१४०)

८)    “जबतक (हम) जातिविहीन समाज की स्थापना करने में सफल नही हो जाते, तबतक जाती का उपयोग करना होगा.” (२/पृ१४३)

९)    “बौद्धधर्म को अगर आगे बढ़ाना है तो राजसत्ता हाथ में लेकर इसका प्रचार-प्रसार लम्बे समयतक किया जा सकता है. धर्म के कार्य में जो भी लोग कार्यरत है उन्हें समझाना होगा की धर्म को राजाश्रय होना बहुत आवश्यक है. उसके बिना धर्मप्रचार होना लगभग असंभव सी बात है.” (२/पृ१४४)

१०)    “राजनितिक सत्ता की मास्टर चाबी के जरिए ही बौद्ध धर्म का प्रचार-प्रसार किया जा सकता है. इसलिए संसदपर बसपा का कब्ज़ा नही होता तबतक बौद्धधर्म स्वीकारने का फैससा फ़िलहाल टाला गया है.” (२/पृ१४३)
   
         कांशीरामच्या भक्तांनी उघड्या डोळ्यांनी कांशीरामला अनाफ-सनाफ़ बोलतांना बघितले पण सत्येच्या लालसेपोठी ते मुका मार सहन करीत राहिले. स्वताला बुद्धिजीवी म्हनवणारे लोक हीरो-वर्शिपमुळे एवढे आंधळे झाले कि त्यांना लोकशाही आणि हुकुमशाही यातील फरक सुद्धा कळेनासा झाला. ते स्वतः कांशीराम, मायावतीच्या कार्याची चिकित्सा करायला जाणार्यांना “हाती चले अपनी चाल, कुत्ते भोंके हजार बार” म्हणून चिकित्सा टाळत राहिले. अखेर परिणाम काय झाला? सुनील खोबरागडे कांशीरामवादी स्वतःला म्हणतात पण मार्क्सवादाप्रमाणेच कांशीरामच्या जातीयवादाला सुद्धा अपमानजनक का म्हणत नाही?
   
          बाबासाहेबांना जसा मार्क्स नको होता तसाच हिंदुधर्म पण नको होता. मार्क्सवादात जाती नसल्या तरी लोकशाही नाही. हिंदुधर्मात जातींचीच हुकुमशाही आहे. जो जातीवादी तो जातींची हुकुमशाही निर्माण करू पाहतो. बुद्धाची लोकशाही कांशीरामच्या विचारात आणि आचारात होती का? त्यांच्या चळवळीत आणि पक्षात होती आणि आहे का? दुसऱ्या जातीवर सोडा पण आपल्याच जातींच्या लोकांवर सुद्धा हुकुमशाही जिथे चालते त्यांना बुद्धाचा धम्म समजला होता, असा कोणता तिर्हाईत विद्वान म्हणेल? धम्माच्या निव्वळ गोष्टी करणे आणि तो समजून गोष्टी करणे, ह्यात बहुत अंतर आहे.
   
            जर बाबासाहेबांची चळवळ योग्य प्रकारे समजून तिला चालविल्या गेले असते तर आज “बाबासाहेब फेल झाले,” असे म्हण्याची कोनात तरी हिम्मत असती का? जे काम बाबासाहेबांनी अपूर्ण ठेवले ते पुरे करण्यासाठी लोकवर्गणी ज्यांनी काढली आणि तिला मनमानेल त्याप्रकारे खर्च केला नसता तर अशी ओरड कोणी केली असती का? शाळेत ३५% मार्क (गुण) भेटले तर फेल समजण्याची पद्धत आहे ना? एका त्रयस्त प्राध्यापकाने जातिगत आरक्षणातून केवळ १०% च मार्क बाबासाहेबांच्या उत्तर पत्रिकेत दिलेत. तर त्यात नाराज होण्याची कोणती गरज आहे?
      
             पुन्हा अभ्यास करा आणि बाबासाहेबांची अपूर्ण सोडवलेली उत्तरपत्रिका पुन्हा सोडवून तपासायला द्या. पण तसे कोणतेही ठोस कार्य न करता जाती व्यवस्थेने झोडपलेल्या ९०% भारतीय मागासवर्गीय लोकांना जातिवाद आणि मार्क्सवाद विसरून वर काढा, अशी कल्याणकारी भूमिका ठेवून लेखन केले तर डॉ. तेलतुंबडे या प्राध्यापकाचे कुठे चुकले? जरूर चुकले कारण त्यांनी सवर्णांच्या जातीयवादी आरक्षण नीतीला आंबेडकरी कृती, कार्य, प्रयोग, एस्पेरीमेंट समजून बसले. आणि शत्रुंवरील खंत, राग निरपराधी बाबासाहेबांना लक्ष बनवून थोपत राहिले. पण काय करता? त्यांच्या आधीच्या कांशीराम कम्पुनेही आरक्षण धोरणाला आंबेडकरी समजूनच प्रचार केला त्याला डॉ. आनंद तेलतुंबडे बळी पडले. त्यांचा पेशाच आहे भेदभाव न करता प्रचलित सिलाबस समोर ठेवून पेपर तपासण्याचा आणि मार्क (गुण) देण्याचा, त्याचा हा परिणाम आहे.
   
         कांशीरामभक्त बाबासाहेबांच्या विचारांची चिकित्सा करू देण्यास तयार आहेत पण कांशीरामच्या विचारांची, कार्याची चिकित्सा करायला तयार आहेत का? कांशीरामभक्त स्वतःला सुपर बुद्धिवादी (!) म्हणतात तर आता “डॉ. आनंद तेलतुंबडे” या प्राध्यापकाने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यापासून दूर का जात आहेत? केवळ भावनेने सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात का? ‘आमची भावना दुखावली! धावा!! धावा!!!’ अशी ओरड करून कल्याण होईल का? त्याला खरे व बुद्धिपुरस्सर उत्तर म्हणावे का? आता विज्ञानाचे युग सुरु झाले, जातीवादी अज्ञानाचे संपत चालले आहे, ह्याचे भान तरी आहे का? “राजा बोले आणि दाडी हाले, तसे राज्य चाले” असा कांशीरामचा जमाना संपला आहे.
   
        देशात ६००० जाती आहेत का जावई शोध कोणत्या संशोधकाने लावला ते माहित नाही. मात्र कांशीराम त्या सर्व जातींना जोडण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करीत राहिले पण त्यांनी स्वतःच्या चमार जातीच्या काही सरकारी कर्मचार्यांना सोडून अन्य कोणत्याही दुसऱ्या जातींना जोडले नाही. हा किती मोठा त्यांच्या कार्याचा पराभव आहे? एवढेच कशाला! ते कार्य करतांना जे धम्म स्वीकाराचे आश्वासन दिले, ते केवळ लोकांची दिशाभूल करणारे ठरले. कांशीराम हे हिंदू धर्मात जन्मले आणि मेले पण, पण त्यांना “बुद्धं शरणं गच्छामि” सुद्धा म्हणायला वेळ भेटली नाही. ह्यात त्यांनी स्वतःला काहीच दोष दिला नाही वा खेद हि व्यक्त केला नाही, परंतु बाबासाहेबांची जातीअंताची चळवळ त्यांनी निदान ५० वर्षे तरी मागे जरूर नेली. हे करतांना त्यांनी आंबेडकरी समाजाचा अमाफ पैसा वापरला, बुद्धी वापरली आणि शक्तीसुद्धा, पण एकाही शब्दाने त्यांचे उपकार मानले नाही. भारतात बाबासाहेबांशी एवढी बेईमानी मोठी मार्क्सवादी लोकांनी तरी केली का? हा काय लहान-सहान अपमान म्हणायचा का?
   
       कार्ल मार्क्स हुकुमशाही विचारांचे होते, कांशीराम पण हुकुमशाहीचे समर्थक होते. तसेच कांशीराम भक्त अंधभक्त आहेत. हुकुमशाहीचे समर्थक बौद्ध असू शकतात का? जे बौद्ध नाहीत ते आंबेडकरी असू शकतात का? लोकशाहीवादी बाबासाहेबांना हुकुमशाहीचे पुरस्कर्ते म्हणून सिद्ध करू पाहणारे लोक कांशीरामच्या हुकुमशाही धोरणाला मूक समर्थन देत राहिले. ते डोळे असलेल्या बाबासाहेबांना आंधळे समजत गेले. त्यांच्या विद्वतेचा, विवेकाचा, तर्काचा, पुस्तकांचा तिटकारा करीत राहिले, वाचक-लेखक बेकार असतात, त्यांना वास्तवता माहित नसते, जे फिरत राहतात, ते अनुभवी असतात. ‘बाबासाहेब केवळ पुस्तकी किडा होते. त्यांना अनुभव नव्हता.’ अशी कुत्षित भावना मनी वसवून कांशीरामने समाजात बुद्धी ऐवजी कृती मोठी, मग तिला योग्य दिशा असो वा नसो, रूढ केली. आर.पी.आय. वाले सर्व दारुडे-अज्ञानी-नालायक आहेत आणि आम्ही बामसेफ, बीएसपी, एम्बस, बहुजन मुक्ती मोर्चा व स्वारीपवाले ईमानदार आहोत’! हे कोणत्या कसोटीवरून ठरवायचे? बुद्धाची, कबीराची, फुलेची आणि बाबासाहेबांची चळवळ, धडपड केवळ राजकीयच नाही, हे अनेक आधारावरून सिद्ध करता येते. पण स्वार्थापोठी काही लोक चुकीचा समज करून जाणीवपूर्वक आंधळे होत असतील तर त्याला पर्याय काय? त्याला उपाय बुद्धाचा बौद्धिक परिवर्तनाचा मार्ग आहे कि हिंसक, रक्तपाती युद्धाचा?
   
         दिनांक ६ जुलै २००७ ला दैनिक “सकाळ” मध्ये डॉ. आनंद तेलतुंबडेनी लिहिले होते, “आपला मित्र कोण व शत्रू कोण? यांच्या व्याख्येशिवाय शोषितांची चळवळ कशी शक्य आहे? सर्वजण, समरसता अशा गुळगुळीत संज्ञा शासक वर्गाला शोभतात. कारण आपल्या जातीय/वर्गीय हितांच्या स्वरक्षणासाठी तो अशा फसव्या गोष्टींचा आधार घेत असतो. पण शोषितांच्या पक्षाला त्या न शोभणाऱ्या असतात. बसप एक तर शासक वर्गीय पक्ष झाला आहे किंवा संपूर्णता भ्रष्ट पक्ष झाला आहे, हाच एक अर्थ यातून शक्य आहे....मायावतींचा ‘मसीहा’ वापरून मागच्या दाराने सत्ता परत काबीज करायची हि एक सुवर्ण संधीच आहे. या अदभूत युतीमध्ये या ब्राह्मण रणनीतीची बिलकुल भूमिका नाही असे कोणालाही म्हणता येणार नाही. हे जर संभव असेल तर या घटनेने इतिहासाचे चाक उलटे फिरविले आहे. बहुजनांचा मुखवटा धारण करून हि ब्राह्मणांची प्रतिक्रांती आहे, असा त्यांचा अर्थ होणार नाही काय?” (२/पृ२८५)
   
आता “डॉ. आनंद तेलतुंबडे” यांच्या “चंडीगड”च्या भाषणांचा समाचार घेवूया...
-----------------------------------------------------------------------
१)    “मेरी सारी मान्यताए मार्क्सिस्ट माण्याताए है लेकीन मै अपने आपको मार्क्सिस्ट नही मानता, इसलिए की जो मार्क्सिस्ट के अर्थ है वो सारे बदल गए है. मार्क्सिस्ट को एक “डॉग्मा” बना कर रख दिया है.” याचा अर्थ आता डॉ. तेलतुंबडे स्वतःला मार्क्सिस्ट मानत नाहीत, तरी त्यांना बळजबरीने “मार्क्सिस्ट” म्हणणे गैर आहे.

२)    “आंबेडकरवाद नाम कि कोई चीज नही बनती और आंबेडकर के एक्नालॉजीकल के पिछे रुलिंग क्लासेस के क्या हाथ है? यह जानना जरुरी है....लास्टिंग कायिंड ऑफ “इझम” आर लास्टिंग कायिंड ऑफ ग्रन्ड थेअरी जैसे कि मार्क्स कि है, वो आंबेडकर में मिलेगी नहीं! इस अर्थ से मै बोलुंगा की अम्बेडकरीइझम जैसी कोई चीज अस्तित्व में नही है.” रुलिंग राजकीय पार्ट्यांनी आंबेडकरवाद नावाची संकल्पना मार्क्सवादा विरुद्ध वापरण्यासाठी केली, असा त्यांचा समज झाला आहे. म्हणून ते आंबेडकरी विचारांना “वाद” हे नाव देण्यास तयार नाहीत. ज्याप्रकारे मार्क्सचे “साम्यवादी” विचारांचे स्वतंत्र मत आहे, तसे बाबासाहेबांचे नाही कारण बाबासाहेबांनी बुद्धाचाच “सम्यक मार्ग” अंगिकारला. त्यामुळे त्यांनी आंबेडकरवाद नावाची कोणतीही वस्तू नाही, असे म्हटले तर विशेष कोणते नुकसान झाले? पण बसप सारख्या जातीवादी पार्ट्यांना त्यामुळे अडचण होते. कारण आर्थिक परिवर्तनाचे कार्य ते काहीच करीत नाही म्हणून त्यांचे गरीब लोक मार्क्सवादी बनत आहेत. जे जातीवादी आहेत, ते बुद्धिष्ट नाहीत. म्हणूनच जनता कांशीरामला बौद्ध मानायला तयार नाही.

      जर कांशीराम हिंदू होते तर त्यांचे भक्त, ‘बौद्ध’ कसे काय सिद्ध होऊ शकतात? जे बुद्धिष्ट नाहीत ते हिंदू (शीख, मुस्लीम वैगेरे) आहेत. जातीवादी पार्टी चालवणारे लोक बौध्द कसे असू शकतात? “आंबेडकरी विचार – धम्म = शून्य” या समीकरणानुसार जातीयवादी लोक दिखावू आंबेडकरी वा दिखावू आंबेडकरवादी आहेत, त्यांच्या जातीयवादी भ्रमजाळातून मागासवर्गीय जातींनी वेगळे होऊन आपल्या हक्कासाठी लढावे, असा तो संदेश त्यातून असेल तर वाईट काय? बुद्धधम्मात राहून जातीवादी राजकीय पार्टी चालवणे म्हणजे धम्म बाटवणे होय, हे ध्यानी ठेवून दिनांक १३ आक्टोंबर १९५६ ला नागपूरच्या पत्रकारांना सांगितले कि मी बौद्ध झाल्यावर जातीवादी नावाच्या “शेकाप”चे कार्य करण्यास साधा मेंबरसुद्धा राहणार नाही. तरीही जे लोक “जयभीम! जयभीम!!” म्हणत “बसप” या जातीयवादी पार्टीचे गठन करतात, ते बाबासाहेबांचा सन्मान म्हणून कि “अपमान” म्हणून? बाबासाहेबांचा कोणताही वाद बुद्धाविचारां शिवाय नाही, म्हणूनच जे लोक बुद्धधम्म न अंगीकारता केवळ जातिगत आरक्षण घेवू पाहतात, ते सर्व जातीवादी, हिंदू, धम्मद्रोही, आंबेडकरद्रोही आहेत.

३)    “फुले-आंबेडकर अंड अँटीकॉष्ट स्ट्रगल के पायोनियर्स थे. उनका जो कॉन्त्रीब्युशन है, ह्याज बिन म्याकझीमम दयान आल द कम्युनिस्ट इन टुडे इन इंडिया.” अर्थात फुले-आंबेडकर हे जातीविरोधी चळवळीचे मुलभूत कार्यकर्ते होते. यात त्यांचे जे योगदान आहे ते कोणीही नाकारू शकणार नाही. ते जे कार्य आहे, सध्याच्या परिस्थितीत ते सर्व भारतीय मार्क्सिस्टांच्या कार्याच्या तुलनेत अफाट आहे. असे म्हणतांना ते आंबेडकरी कार्याला नगग्य मानतात, असे होते का? यात तर ते मार्क्सवादी लोकांपेशाही जास्त मार्क्स देतात. यात सुद्धा बाबासाहेबांचा अवमान, अपमान दिसतो का?

४)    “आंबेडकर के सोच का स्त्रोत प्रोफेसर जॉन ड्युई है.” (जे फेबेनियन अर्थात मार्क्ससे भिन्न विचारधारी) डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी हे जे मत मांडले, ते चुकीचे आहे. कारण बाबासाहेबांनी स्वतःच्या मतांचे स्त्रोत जसे फ्रेंच राज्यक्रांतीला दिले नाही, तसे ते फेबियन विचारधारेला सुद्धा दिले नाही. त्यावर विचार करणे आणि तिला कार्यान्वित करणे यात फरक आहे. बाबासाहेबांची वैचारिकता धम्ममय अर्थात भारतीयच राहिली आहे. बाबासाहेब जसे गांधीवादी नव्हते तसेच ते मार्क्सवादी, हिटलरवादी, फेबेनियन, ड्युईवादी वा जातीवादी  सुद्धा नव्हते. त्यांचा पिंड जातीविरोधक, आदर्श लोकशाहीचा होता. म्हणून सन १९५२ मध्ये “एल.एल.डी”. ची डिग्री घेतांना आपल्या गुरुप्रती आदर दाखवितांना जे विचार मांडले, ते त्यांनी प्रेरक समजून, कधीही कोणाला सांगितले नाही आणि व्यवहारात पण वापरले नाही. तसे असते तर १४ आक्टोंबर १९५६ ला त्यांनी धम्म स्वीकार केलाच नसता.

५)    “जाती के सवाल पे कम्युनिस्ट लिटरेचर में आपको उसका एक उल्लेख भी मिलनेवाला नही, यह भी एक सही बात है.” या त्यांच्या चिकित्सकीय विचारातून ते साम्यवादी कम्पुंना जाती विरोधक तर मानत नाहीच तर उलट त्यांना जातींचे मूक समर्थक समजून ‘संघर्ष शून्य’ समजतात. या विचारातून डॉ. तेलतुंबडे हे मार्क्सवादी सिद्ध होतात का? जे लोक मार्क्सवादी धारणा धारण करीत नाहीत, ते कसले मार्क्सिस्ट? होऊ शकते, त्यांच्या विचारांची पद्धत मार्क्सवादी, पण त्यांचे आचार तर सर्व बुद्धिवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आहेत. मग ते मार्क्सवादी कसले? ते धम्मवादीच आहेत.

६)    “आंबेडकर एक्सपेरिमेंट करते गए, करते गए और ऐसा हुआ की उनके सारे एक्सपेरिमेंट फेल्युअर में तब्दील हुए.” बाबासाहेबांचे कार्य म्हणजे विज्ञानाच्या प्राद्यापकाच्या दृष्टीने एक्स्पेरीमेंट होते. बाबासाहेबांना असे वाटत गेले कि यामुळे जाती तुटतील, जनतेचे भले होईल पण त्यांच्या सगळ्या योजना निर्जीव साधनांवर निर्भर नव्हत्या. जीवंत जातीयवादी, अंध:श्रद्धी कांग्रेसच्या नेत्यांवर आणि साधनहीन अस्पृश्य लोकांवर अवलंबून होत्या. निर्जीवांवर प्रयोग करणे सोफी आहे, पण सजीव नेहमी विचलित होत असतात, ते कधी जातीवादी तर कधी लोकशाहीवादी, तर कधी झोटिंगशाहीचे रूप घेतात. जर साधने करवटे घेतील तर साध्य पण विचलीत होणारच. तरीही सजीवांवर जातीयवादी १२५ करोड लोकांच्या मेंदूंत मनुस्मृतीविरुद्ध आदर्श लोकशाहीचे बीज पेरले.
       
           बाबासाहेबांनी ‘साईमन कमिशन’ पुढे मागील ६० वर्षापासून “एक व्यक्ती, एक मत” ही मागणी रेटून राजकीय लोकशाही आणून बसवली आणि हजारो वर्षाची वर्णवादी व्यवस्था कायद्याच्या चाबकाने संपवणे सुरु केले, तो प्रयोग काय फेल्युअर आहे? बाबासाहेबांनी बरोबर वेळप्रसंग बधून, आपली बाजू ताणून ठेवली पण ती तुटू नये, या भीतीने, ते पूर्ण यशस्वी झाले नाहीत. त्याला कारण बाबासाहेब नाहीत तर हरिजन, जातीवादी कांग्रेस आणि मनुवादी हिंदू मानसिकता आहे. बाबासाहेबांच्या जातीअंताच्या प्रयोगात कांग्रेस नेहमी आश्वासने देत गेली आणि बदलत सुद्धा गेली. यात बाबासाहेबांचा कोणता दोष दिसतो? ‘पुणे करार’ हा अस्पृश्यताअंत आणि जातीअंताचा करार होता. अवर्ण बाबासाहेब आंबेडकरांशी तो करार सवर्णांनी केला. भारतातील जाती संपवून सामाजिक समता अर्थात १. शैक्षणिक, २. सांस्कृतिक, ३. आर्थिक आणि ४. राजकिय समता प्रस्थापित करण्याची हमी सवर्ण हिंदूंनी त्यात इंग्रजांना दिली. पण .....पण ते नंतर बेईमान झाले. जाती ह्या जिवंत व्यक्तींशी निघडीत आहेत. व्यक्तीची मानसिकता बदलली कि त्यांच्यावर होणारा प्रयोग शतप्रतिशत ‘योग्य’, केव्हाही सफल होऊ सकत नाही.
      
        बाबासाहेबांनी आपले ध्येय “एक व्यक्ती, एक मूल्य” ठेवले होते, हे “गोलमेज परिषदे”तील त्यांच्या भाषणावरून लक्षात येते. त्यासाठीच त्यांनी पुढे ‘स्वतंत्र भारताची राज्यघटना’ कशी असावी? यासाठी एक “प्रारूप” तयार केले आणि ते “शेकाप”च्या वतीने, सन १९४६ ला, पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्या दृष्टीस आणले पण ....पण त्यांनी त्याला नकार दिला. या प्रारुपात केवळ अस्पृश्य वर्गांचे कल्याण हे त्यांचे लक्ष नव्हते तर सर्व भारतीय जनतेच्या मनातील जातीअंताची भूमिका होती. ती वास्तवात उतरवण्यासाठी त्यांनी संविधान निर्मिती प्रक्रियेत भाग घेतला, तन, मन आणि संपूर्ण बुद्धी एकवटून प्रयत्न केला. तरीही सामन्यांच्या हितासाठी सरकारने आपल्याजवळ उपजाऊ संपत्ती ठेवली नाही.
      
        भिकार लोक अफाट गरीब व शोषित लोकांचे कल्याण कसे करेल? त्याच विवंचनेत ते होते. जर शोषितांचे कल्याण झाले नाही तर ते या राजकीय लोकशाहीच्या डोलाऱ्याला संपवतील. तो दिवस भारताच्या इतिहासात फार दु:खाचा दिवस असेल, असेच ते बोलले नाही तर “मीच हि घटना जाळून खाक करीन” असेही त्यांनी का म्हटले? त्यांनी केलेल्या कार्याला उचित यश मिळाले नाही म्हणूनच हा राग होता. त्याचेच प्रतिबिंब डॉ. तेलतुंबडे यांच्या भाषणात पण वैज्ञानिक पद्धतीने आले, परंतु ते कांशीरामभक्तांना समजले नाही, त्याला जबाबदार कोण आहे? बाबासाहेब “एक व्यक्ती, एक मूल्य” या आर्थिक लोकशाहीच्या म्हणजे आदर्श लोकशाहीच्या उद्धीष्टांना गाटू शकले का? जर ह्याचे उत्तर नाही असेल तर त्यात ते फेल झाले म्हटले तर काय वागवे?
    
        फेल शब्द फक्त इंग्रजीतला आहे एवढेच काय ते वेगळे आहे. जर बाबासाहेब आपल्या पूर्ण कार्यात, प्रयोगात पास झाले असते तर त्यांना त्यांचे सहकारी “नानक चंद रत्तू” यांचे पाशी ओक्षाबोक्षी, हुंदके देण्याची गरज भासली का? बाबासाहेबांचे ध्येय पूर्ण झाले असते तर “बाबा तेरा मिशन अधुरा, बीएसपी करेगा पुरा” असे नारे (दिखावू का असेना पण बसपने) तरी दिले असते का? “आपलं असेल तर मुल आणि दुसऱ्याच असल्यास कारटं” हा भेदभावी दृष्टिकोन धम्ममय आहे कि धर्ममय?

७)    “कार्ल मार्क्सने बहुतसारी बाते ऐसे फर्राटेबाज हैण्ड में लिखी है, जिसका कोई डेफिनेसन तक नहीं है. क्लास ऑफ़ बेसिक यूनिट, फिर भी उसे अझुम किया है.” हे डॉ. तेलतुंबडे यांच्या भाषणातील वाक्य काय मार्क्सवादी प्रचारक वाटतात? हे विचार सुद्धा ‘मार्क्सवादी भ्रम’ सिद्ध करतात. ह्यावरून तरी ते मार्क्सवादी आणि आंबेडकर विरोधी वाटतात का?

८)    “जाती व्यवस्था महज श्रम का नही बल्की श्रमिको का भी विभाजन है और यह भारत कि विशिष्टता है....अत: यह आंबेडकर कि मौलिक खोज नही है.” बाबासाहेब आंबेडकर यांनी तसा कुठे दावा केला आहे कि हा माझा मूल्यवान शोध/खोज आहे म्हणून? इतर लोक तसा दावा करीत असतील तर त्यांनी तो सिद्ध करावा. यात सुद्धा डॉ. तेलतुंबडे सरांनी काहीच गैर सांगितले नाही.


९)    “एन्हिलेषण ऑफ काष्ट” और आंबेडकर का आगे चालकर जो भी काष्ट अनालिसिस रहा है, वह पुरा का पुरा गलत रहा है....वह डीस्टार्जन कीस वजह से होता है? यह जाणणे कि बहुत जरुरत है.” डॉ. तेलतुंबडे सरांना जाती अंतासाठीच विश्लेषण हवे ना! तर जाती अंताची जी रोटी-बेठी व्यवहार व बुद्धधम्म स्वीकार करण्याची जी कारणे बाबासाहेबांनी सांगितली आहेत, ती पुरे आहेत. जाती अंतासाठीच बाबासाहेबांनी आदर्श लोकशाहीचा आग्रह धरला. आदर्श लोकशाहीच्या एकाच दगडात बाबासाहेबांनी हुकुमशाहीचा समर्थक ‘साम्यवाद’, जातीवादाचा समर्थक ‘ब्राह्मणवाद’ आणि ब्राह्मणवादी ‘पुंजीवाद’ सुद्धा मारला. बुद्धाची लोकशाही म्हणजे जातीअंताची जालीम औषधीच, ते समजत.
     
      आदर्श लोकशाहीचे प्रखर समर्थन सुद्धा जाती अंताच्या अनालिसिसचा व जाती अंताचा एक भाग समजायला हरकत नाही. लोकशाही जेवढ्या प्रमाणात यशस्वी होईल तेवढ्याच प्रमाणात जातीअंत झाला आहे, अर्थात जातीअंताची औषधी म्हणजे धम्म स्वीकार, असे समजायला हरकत काहीच नाही. त्याव्यतिरिक्त जर काही उपाय असतील तर डॉ. तेलतुंबडे यांनी मांडायला हवे होते. ते त्यांनी मांडले नाहीत म्हणून त्यांच्या या विचाराला विचारात घेता येणार नाही. सध्यातरी बाबासाहेबांचे ‘काष्ट अनालिसिस’ सगळेच चुकीचे होते, हे मान्य करता येणार नाही.

१०)    “लगातार घटते नोकरियो के दौर मे आरक्षण एक भंवरजाल है.....आय हेल्ड आंबेडकर रिस्पांसिबल द्याट ही कुड नाट फार्मुलेट रिझर्वेशन पॉलिसी प्रापरली एंड कुड नाट कन्विंश इट प्रापरली....जो पापुलेशन का प्रपोर्शन ही माना है.” खरे पाहता नोकऱ्यात म्हणजे आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात जातिगत आरक्षण मागण्यात बाबासाहेबांना रसच नव्हता. एकदा राजकीय आरक्षणाच्या जोरावर सत्ता हातात आली कि मग हवा तो राज्य-समाजवादी बदल करू आणि केवळ मागासच जातींच्या लोकांचे हित नाही तर सर्वच उपेक्षितांचे हित घडवून आणण्यासाठी हवा तो बदल करू, असा त्यांना विश्वास होता. पण राजकीय क्षेत्रात सुद्धा बहुमत प्राप्त करता आले नाही आणि सवर्ण हिंदुनी दिलेल्या राजकीय आरक्षालाच त्यांनी इतर शैक्षणिक आणि प्रशासकीय नोकऱ्यात राहू दिले.
    
        दिनांक २४/९/१९३२ मध्ये कोणता व कसा ठराव झाला? ते त्यांना माहित होते. आरक्षण हे घटना लागू झाल्यावर जास्तीत जास्त १० च वर्षासाठी राहणार आहे. त्यामुळे त्यांनी जातिगत आरक्षणाकडे दुर्लक्ष केले. त्याऐवजी प्रत्येक बेरोजगाराच्या हाताला सततच, योग्य ते काम मिळावे, म्हणून मजबुरीने “सेवायोजन कार्यालया”ची शिफारस केली. मात्र मनुवादी कांग्रेसने शासकीय सेवा बंद करण्यासाठी “खाजगीकरणाची योजना” राबवली, आता कम्पुटरीकृत सेवा सुरु केली. त्यामुळे गरिबी घालविण्याचे सर्व उपाय बंद होत गेले. जड काम करणाऱ्या देशातील ८०% हातांना सुद्धा रोज रुपये २०/- घेवून, महागाईत उदरभरण करावे लागत आहे.
      
          मागासवर्गीय सरकारी कर्मचारी म्हणतात कि जातिगत आरक्षण व त्यांतर्गत प्रमोशन सुरूच राहिले पाहिजे पण त्याचा फायदा जर एकूण मागासवर्गीय लोकांपैकी फक्त १०% लोकांना होत असेल व ९०% लोक त्यापासून वंचित राहत असतील तर त्याला भंवर्जाल का म्हणू नये? जे विचार बाबासाहेबांनी मागितले नाही आणि सवर्ण हिंदुंनी (कान्ग्रेसने) फक्त वोट मिळविण्यासाठी जिवंत ठेवले असेल तर त्यात कांग्रेस सारख्या राजकीय लोकांचा फायदा आहे. पण मतदान करणाऱ्या बहुसंख्य जनतेचा नाही. ते बिचारे ६० वर्षात किमान ३० वेळा मतदाते झाले, प्रत्येक वेळी आश्वासने मिळालीत पण विकाश कुठे हरवला? त्याचा शोध कोणतेच राजकीय विचारवंत व पुढारी का लावत नाही?

       सधन मागास वर्ग आणि निर्धन मागास वर्ग हे दोघेही सरकारी नोकऱ्यांच्या शर्यतीत धावायला लागले तर कोण जिंकेल? ४५० वर्षापासून ते धावतच राहिले तरी या “पवित्र,” “महान” देशाने त्यांना काय दिले? गरिबी, लाचारी, उपासमारी, कुपोषण, चोरी आणि या सर्व अपयशी निराशेतून बाहेर निघणारी दारूची सवय. ती सुद्धा धर्मासारखीच नव्हे तर त्याहून ज्यास्त खर्चिक आणि संघर्षापासून दूर करणारी दवाई ठरली. म्हणूनच सवर्ण श्रीमंत नेते तिच्यावर बंदी आणत नाही. पिडीतांना नशाधीन ठेवायचे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांवर डल्ला मारायचा. हे प्रकार योग्य आहेत का? आता ते लवकरच संपतील. कारण शोषित-पिडीत मजूरांना कमी मजुरीत हा जुलमी अन्याय दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईच्या काळात कसा सहन होईल?

       कोणतीही राजकीय पार्टी येईल तरी जागतिक महागाईच्या काळात देशातील महागाई कशी कमी करेल? विदेशी पेट्रोल, डीझेल दर वाढले तर आम्ही काय करणार? हे उलट उत्तर प्रत्येक राजकीय पार्टीजवळ असेल. देशातील एकूण लोकसंख्येचा १५% नोकऱ्या धरल्या तर त्या ८०% भारतीय गरीब लोकांना पुरतील का? त्यापासून वंचित लोक केव्हापर्यंत उपास भोगणार? उद्या पोटासाठी चोऱ्या, डकैत्या वाढल्या तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशे पुलिसदल उपलब्द राहील का? त्याची विल्लेवाट लावण्यासाठी उचित न्यायालये असतील का?
    
      जे लोक भारतीय राजकीय लोकशाहीचे शिकार झालेत तेच मजबुरीने घरदार, नाते-रिस्ते सोडून झाडांचा आसरा घेवून जगत आहेत. त्यांनी कुटुंब व्यवस्थेचा अंत केला आणि कम्युन स्वीकारला. प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे, पण त्यांना का नाही? मरता क्या नही करता? म्हणून काहींची भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरुद्ध लढाई सुरु आहे. जर पुरेशा सुविधांची हमी देणारे खरे ईमानदार “राज्य समाजवादी” सांसदीय सरकार असते तर आणि तरच शोषित-पिडीत जनता सुखी झाली असती. कांग्रेसवादी भारतीय संविधानाच्या “कलम ३१ आणि २४”ने त्यांचा वाटा हिसकारला. जर आर्थिक पिडीत लोक संघर्षाला उठले तर या १०% जातीय आरक्षण भोगी लोकांच्या नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्था तरी साबित राहतील का?

      शोषितांच्या नावावर खायचे आणि त्यांनाच उंगली दावायचे, हे प्रकार कोठवर चालणार? आरक्षण हे हमेशासाठी राहणार नाही, ते संपणार आहे, असे जर संकेत बाबासाहेबांनी देवून ठेवले आहेत तरी त्याकडे दुर्लक्ष का केल्या जाते? पर्याय शोधावाच लागेल. जाति विरोधी व्यक्ती जातिगत आरक्षण धोरण वापरून जाती कशाला जोपासणार? ते फक्त १५% लोकांच्या हितांचेच रक्षण करणाऱ्या जातिगत आरक्षण धोरणाकडे मुद्धामच दुर्लक्ष करतील. तेव्हा बाबासाहेबांनी जातिगत आरक्षण नीती, बरोबर हाताळली नाही, हा दोष त्यांच्यावर देणे गैर आहे.

११)    “साउथबरो कमिशन के आगे जो बात कही गई थी, वह पोलिटिकल रिझर्वेशन कि बाते थी और उसमे यही कहा गया था कि इंडिपेंड रिप्रेझेंटेशन हो. लेकीन इसके बारे जो जाब या एज्युकेशन सिस्टीम मे जो रिझर्वेशन है, उसके बारे मे कोई रायटिंग में नही दिया.” हे विचार असत्य आहेत. कारण साउथबरो कमिशन समोर बाबासाहेबांनी प्रौढ मताधिकार सोबतच संयुक्त मतदार संघाची मागणी केली. जर प्रौढ मतदानाचा अधिकार नाकारला गेला तरच आम्ही “स्वतंत्र मतदार संघा”ची मागणी करू असी त्यांनी मुख्य भूमिका घेतली होती. “बहिष्कृत हितकारिणी सभे”च्या वतीने सायमन कमिशनला एक “स्मरण पत्र” दिल्या गेले होते, त्यात “अछूतों को राजनितिक शिक्षा की बहुत आवश्यकता है क्योंकी मंत्रित्व एक बहुतही महत्वपूर्ण विशेषता है, इसलिए मंत्रिमंडल में स्थान मिलना चाहिए. इन मांगो के अतिरिक्त सभाने यह मांग भी पेश की भारत के आगामी विधानसभा में दलित लोगों के लिए शिक्षा प्राप्ति के लिए सुविधाए उपलब्ध कीए जाए और अछुतों को सेना, जल सेना और पुलिस में भरती किए जाने की खुली स्वतंत्रता हो.” (३/पृ१६-१७) यावरून हे सिद्ध होते कि डॉ. तेलतुंबडे यांच्या अभ्यासात जरूर काही चुका राहून गेल्या असतील तर त्या त्यांनी दुरुस्त कराव्यात.

१२)    “अन्टच्यबिलिटी इझ नाट काष्ट.” (अस्पृश्यता म्हणजे जाती नाहीत.) परंतु अस्पृश्य जाती सुद्धा आहेत. कारण अस्पृश्यता जातींचीच, जन्माचीच देन आहे, जी अस्पृश्य कुटुंबाकडून मिळते. अस्पृश्यता सुद्धा जन्मावरून मिळते म्हणून ती जाती पण आहे. आणि वर्णाचे पण गुण त्यात आहेत. कारण बंधने प्रत्येक जातींसाठी वेगवेगळे नाहीत. ढोबळपणे वर्णांना जे लावण्यात आले आहेत तेच जाती आणि अस्पृश्यतेला पण चिकटवण्यात आली आहेत. वर्ण जरी जाती नाहीत पण वर्णाचे बंदिस्तचे गुण आले आहेत, त्याच प्रमाणे वर वर पाहता अस्पृस्यता सुद्धा जाती नाहीत पण जातींचे गुण, बंधिस्तपणा त्यात आला आहे. जे गुण जन्माने वर्णाला दिलेत तेच गुण जाती आणि अस्पृश्यतेत सुद्धा आले आहेत. जे बंधने वर्णांना आहेत तेच जाती आणि अस्पृश्य लोकांना पण आहेत.

       जी साधने वर्णांनी शुद्र लोकांना दिलीत त्यापैकी एकही साधन अस्पृश्यांच्या जीवनात नाहीत पण जाती आणि वर्णांचे सर्व बंधने, बेड्या त्यांच्या भोवती आवरून घट्ट बांधण्यात आलेत. म्हणून अस्पृश्यता म्हणजे जाती नाहीत, असे म्हणताच येणार नाही. जाती सहित अस्पृश्यता गेली म्हणजे जात गेली आहे असे नाहीच. जे बंधने जातींनी लादली ती सर्व तोडत गेल्यास जाती सुद्धा जातील. वर्ण, जाती ह्या ईश्वरीय कृती आहेत म्हणून त्या पवित्र आहेत. यातील ईश्वर अज्ञानी विचार आहेत व त्यावर आधारित पवित्रता सुद्धा अज्ञान आहे हे जर बुद्धाच्या “कार्यकारण सिद्धांता”च्या मदतीने समजावून दिल्या गेले तर जातींचे भूत निश्चितच जाते. त्यासाठी धम्म घेवून चालत नाही तर धम्माला समजावेच लागेल.
   
      सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रिय कीर्तीचे बौद्ध विचारवंत, डॉ. सुरेन्द्र अज्ञात (पंजाब) हे “जातीप्रथे” विषयी का्य लिहितात? “अब जबकि जातिवाद हिन्दू समाज के सामाजिक स्वास्थ्य के लिए ही नही, बल्कि शारीरिक स्वास्थ्य के लिए भी एक गंभीर व घटक चुनौती बन चूका है और वैज्ञानिको ने खतरे की घंटी बजा दी है; सभी सम्बंधित और प्रभावित होनेवाले पक्षों को कुम्भकर्णी निद्रा से जाग उठाना और जातिवाद की उन बेडियोंको एकबार उतार फेंकना चाहिए, जिन्हें वे ॠषियों-मुनियों और शास्त्रों द्वारा दिए गए कंठहार समझते रहे है.” (४/प्रु८)

डॉ. आनंद तेलतुम्बडे नावाच्या बुद्धिजीवी या प्राध्यापकाला यापेक्षा वा बाबासाहेबांच्या उद्धेशपुर्तीशिवाय वेगळे काय म्हणायचे आहे? पण कांशीराम भक्तांना तसे वाटते का? त्यासाठी त्यांचे कोणते प्रयोग सुरु आहेत? “१५% विरुद्ध ८५%” च्या प्रयोगात ते पास झालेत कि फेल? हा कांशीरामचा प्रयोग धम्मनीतीला पुरक होता का? त्या प्रयोगात कांशीराम फेल झाले म्हणून त्यालाही फेकावे लागले. यात कांशीराम किती बुद्धिमान, बुद्धीजीवी होते? ते दिसूनच पडते. जातींच्या आधारे व्यक्तींचे मूल्यमापन करण्याऐवजी बुद्धीच्या आधारे मूल्यमापन केले पाहिजे, ते कार्य ९०% भारतीय गरिब शोषित/पीडितांच्या कल्याणासाठीच डॉ. आनंद तेलतुंबडे या प्राध्यापकाने प्रामाणिकपणे केले म्हणून त्यांचे आभार!
............................................................................................................
संदर्भ : -
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अनुभव आणि आठवणी; लेखक- नानक चंद रत्तू, भाषांतर- भास्कर लक्ष्मण भोळे; साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९८
२. पुणे करार: उज्वल भविष्याचा प्रारंभ; एन. जी. कांबळे;  कौसल्या प्रकाशन, औरंगाबाद, २००९
३. डॉ. अम्बेडकर और भारतीय संविधान; एल.आर. बाली; भीम पत्रिका प्रकाशन, जालंधर, पंजाब, १९९१
४. जाती : इतिहास और स्वरूप; डॉ. सुरेंद्र अज्ञात, सम्यक प्रकाशन, नई दिल्ली, २००९  
............................................................................................................

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें